Monday, May 12, 2025
Homeब्लॅक अँड व्हाईट31 हजार गाव-खेड्यांना...

31 हजार गाव-खेड्यांना मिळणार 4 जी इंटरनेट सेवा

आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत 4 जी सॅच्युरेशन प्रोजेक्ट मिशन 500च्या माध्यमातून मोबाईल नेटवर्क नसणाऱ्या देशातल्या 31 हजार गाव-खेड्यांना 4 जी सेवा देण्याचे काम (बीएसएनएल) BSNLवर सोपविले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत जलद इंटरनेट सेवा पुरवून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा जनतेला लाभ मिळावा यासाठी BSNL प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती BSNL महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक रोहित शर्मा यांनी काल नागपूरमध्ये एका पत्रकार परिषदेत दिली.

केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्या अधीन सार्वजनिक उपक्रम असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड-बीएसएनएलच्या नागपूर कार्यालयाद्वारे कालपासून 15 फेब्रुवारीदरम्यान 20व्या अखिल भारतीय बीएसएनएल कॅरम आणि कल्चरल टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन आमदार निवास परिसरात रोहित शर्मा यांच्या हस्ते झाल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी कोअर नेटवर्क पश्चिम क्षेत्राचे मुख्य महाव्यवस्थापक प्रशांत पाटील, बीएसएनएल नागपूरचे प्रधान महाव्यवस्थापक यश पान्हेकर उपस्थित होते.

महाराष्ट्रातील 5200 नेटवर्क नसलेली खेडी 2751 नवीन टॉवर उभारून 4जी मोबाईल नेटवर्कयुक्त बनविणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले. सी डॉट, टिसीएस, तेजस या संस्थाच्या साहाय्याने स्वदेशी 4जी तंत्रज्ञान विकसित केले असून स्वतःचे मोबाईल नेटवर्क तंत्रज्ञान असणारा भारत हा जगातील 5वा देश ठरला आहे. स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ही 4जी सेवाही 5जीपर्यंत सुद्धा विकसित करता येत असल्याचे त्यांनी सांगितले. येणाऱ्या काळात BSNLचे सर्व टॉवर हे 4जीमध्ये रुपांतरीत करणार असून महाराष्ट्रात याची सुरुवात झाली आहे. भारतनेट फेज 2मार्फत देशातील ग्राम पंचायत आणि ग्रामीण संस्था यांना BSNLमार्फत निरंतर इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क पुरवून यांना अजून मजबूत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

VSAT उपग्रहाच्या माध्यमातून अजून उत्कृष्ट आणि दर्जेदार सुविधा देण्यावर  BSNLचा भर असून पर्वतीय आणि ग्रामीण प्रदेशात सोलर पॅनल वापरून 4जी सेवा देणार असल्याचे शर्मा यांनी यावेळी स्पष्ट केले. व्यावसायिक ग्राहकांकरिता असलेल्या कॉपर केबलचे पूर्णपणे फायबर ऑप्टिकमध्ये रूपांतर केले जात असून त्याद्वारे बँडविथ आणि अद्यावत नेटवर्क ग्राहकांना मिळत असल्याचेदेखील शर्मा यांनी सांगितले.

Continue reading

मंगळवारी ठाण्याच्या डॉ. घाणेकर नाट्यगृहात ‘प्री-वेडिंग’!

लव मॅरेज की अरेंज मॅरेज? लग्न करून पाहवं की लग्न करूच नये? पती-पत्नी यांचं नातं कल्पनेत आणि प्रत्यक्षात कसं असतं? अलीकडचे लग्नाच्या वयाचे तरुण-तरुणी या गुंत्यामध्ये अडकलेले असतात. नेमकं काय करावं? त्यांचा गोंधळ उडतो. निर्णय होत नाही. वय वाढत जातं.. आणि मग ठरतं.. 'प्री-वेडिंग'! .....

अडसूळ ट्रस्ट राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत एमडीसी अजिंक्य

महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत विनाशुल्क शालेय खेळाडूंच्या राज्यस्तरीय सुपर लीग कॅरम स्पर्धेत राज्य ख्यातीचे कॅरमपटू रत्नागिरीची स्वरा मोहिरे, सार्थक केरकर, अमेय जंगम, वेदिका पोमेंडकर यांच्या एमडीसी ज्वेलर्स संघाने अजिंक्यपद पटकाविले. चुरशीच्या अंतिम सामन्यात...

भारताविरोधात पाकिस्तान युद्ध पुकारणार?

पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना उखडून टाकण्यासाठी भारताने सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर अजूनही चालूच असून पाकिस्तानचा एकूण पवित्रा पाहता लवकरच पाक भारताविरोधात युद्ध पुकारण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एखाद्या राष्ट्राविरोधात युद्ध पुकारण्याचे पाप आपल्या माथी येऊ नये, मात्र युद्ध पुकारण्यासाठी पाकला भाग...
error: Content is protected !!
Skip to content