Homeहेल्थ इज वेल्थ'केईएम'मध्ये काल गोळा...

‘केईएम’मध्ये काल गोळा झाले १८० बाटल्या रक्त

हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १११व्या जयंतीनिमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका आणि केसुला बंजारा सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीने मुंबईतल्या केईएम रुग्णालयाच्या सहकार्याने काल रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १८०पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

केसुला बंजारा सामाजिक सेवा संस्था ही मुंबई महापालिकेमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांची संस्था आहे. संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, गुणगौरव सोहळा तसेच अन्य सामाजिक कार्यक्रमांचा समावेश असतो. दिनांक १ जुलै

रोजी वसंतराव नाईक यांची जयंती साजरी केली जाते. याच पार्श्वभूमीवर पालिकेच्या मुख्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पालिका सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) सुनील धामणे, प्रमुख अभियंता (विकास नियोजन) सुनील राठोड, प्रमुख कामगार अधिकारी सुनील जांगळे यांच्या हस्ते झाले.

यावेळी केसुला बंजारा सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष धर्मा राठोड, उपाध्यक्ष डॉ. व्यंकटेश राठोड, खजिनदार विजय जाधव, विभागीय कामगार व कल्याण अधिकारी दिलीप राठोड, अविनाश राठोड, विशाल राठोड, मिनाक्षी राठोड, सरला राठोड, देविदास चव्हाण, विशाल जाधव, वसंत राठोड, डी. डी. नाईक, अमोल राठोड, निरंजन मुढे, गोकुळ राठोड यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी तसेच केईएम रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content