Homeएनसर्कलमहामार्गांच्या भूसंपादनाचे 1467...

महामार्गांच्या भूसंपादनाचे 1467 प्रकल्प भूमी राशी पोर्टलखाली!

भारतातील महामार्ग पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी तसेच भूसंपादनाची नुकसानभरपाई देण्यासाठी, भूसंपादनाच्या अधिसूचनांच्या ऑनलाईन प्रक्रिया एकाच प्लॅटफॉर्म वर करता याव्यात, यासाठी भूमी राशी पोर्टल तयार करण्यात आले आहे. आतापर्यंत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) 1467 प्रकल्प भूमी राशी पोर्टल अंतर्गत आणण्यात आले आहेत. 1 एप्रिल 2018 पासून, भूसंपादनाशी संबंधित सर्व प्रस्ताव या पोर्टलवरुन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

भूसंपादनासाठी, सक्षम प्राधिकरण म्हणून नियुक्त केलेल्या राज्य सरकारच्या संबंधित महसूल अधिकाऱ्याद्वारे सर्व भूसंपादनाच्या सूचना ऑनलाईन सादर केल्या जातात आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या मान्यतेनंतर त्या ई-राजपत्राद्वारे भारत सरकारच्या प्रसारमाध्यमांना ऑनलाईन पाठवल्या जातात. भूसंपादनाची नुकसानभरपाईही भूमी राशी पोर्टलद्वारे दिली जात आहे. पोर्टलमुळे अधिसूचना जारी करण्याचा कालावधी कमी झाला असून, संपूर्ण प्रक्रियेत कार्यक्षमता तसेच पारदर्शकता आणली आहे.

या प्रकल्पांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. https://bhoomirashi.gov.in/auth/revamp/search_proj.cshtml 

Continue reading

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...

फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीबीआयचे ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’!

आंतरराष्ट्रीय पातळीवर फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच जगभरातील पोलीस दलांसोबत रिअल-टाइममध्ये समन्वय साधण्याकरीता सीबीआयने नुकतेच ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’ स्थापन केले आहे. फरारी गुन्हेगारांचा मुद्दा केवळ देशाचे सार्वभौमत्व, आर्थिक स्थैर्य आणि कायदा आणि सुव्यवस्थेशीच नव्हे तर देशाच्या सुरक्षेशीदेखील संबंधित आहे. परदेशात...

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...
Skip to content