HomeArchive५ ऑक्टोबरपासून राज्यात...

५ ऑक्टोबरपासून राज्यात हॉटेल सुरू

Details
  
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com 
 
“राज्यात पाचव्या अनलॉकसाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे (गाईडलाईन्स) जारी करण्यात आल्या आहेत. पाचव्या अनलॉकमध्ये सरकारने अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. त्यानुसार येत्या 5 ऑक्टोबरपासून 50% क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरू करता येणार आहेत.
 
यादरम्यान मात्र सोशल डिस्टंन्सिग पाळणे तसेच थर्मल स्क्रिनिंग आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असणार आहे.
 
अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादनाचे उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा सुरू करायला परवानगी देण्यात आली असून ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर कसलेही निर्बंध राहणार नाहीत. डब्बेवाल्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील लोकल फेऱ्या वाढवण्याचे तसेच पुणे विभागातील लोकल ट्रेन सुरू होणार आहेत. मात्र, शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्था, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क बंद राहणार आहेत.
 
राज्यांतर्गत रेल्वे सेवा सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने काढल्यानंतर मध्य रेल्वे कामाला लागली आहे. महाराष्ट्रातील इंटरसिटी एक्सप्रेस, मुंबई-पुणे मार्गावरील डेक्कन क्वीन, सिंहगड, प्रगती, डेक्कन एक्सप्रेस यांच्यासह, मुंबई-नागपूर, मुंबई-सोलापूर, मुंबई-अमरावती, मुंबई-कोल्हापूर, मुंबई-औरंगाबाद, यासह सर्व महत्त्वाच्या एक्सप्रेस सुरू होणार आहेत. यासाठी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने थेट पत्र न लिहिता, आदेश जारी केल्याने हे आदेश विनंतीपत्र मानून रेल्वे सुरू करण्यासाठी आवश्यक ते काम करण्यास सुरूवात करण्यात आल्याचे कळते.”

Continue reading

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...
Skip to content