HomeArchiveहाऊसफुल्ल आणि डॉ....

हाऊसफुल्ल आणि डॉ. काशिनाथ घाणेकर

Details
हाऊसफुल्ल आणि डॉ. काशिनाथ घाणेकर

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

मुलाखतकार – संजय मिस्त्री (व्यंगचित्रकार)

मराठी रंगभूमीला, चित्रपटसृष्टीला इतिहास आहे. परंपरा आहे. बाल गंधर्व, दीनानाथ मंगेशकर, नानासाहेब पाठक, केशवराव दाते यांनी ती समृद्ध केली. त्यानंतर मा. दत्ताराम, बाळ कोल्हटकर, चित्तरंजन कोल्हटकर, प्रभाकर पणशीकर यांनी ती अधिक समृद्ध केली. याच पंक्तीतले आणखी एक जबरदस्त नाव आणि ते म्हणजे डॉ. काशिनाथ घाणेकर. व्यवसायाने डॉक्टर, गोल्डमेडल विजेते असतानाही अभिनयाच्या वेडापायी त्यांनी स्वतःला नाट्यक्षेत्रात झोकून दिले. अफाट कीर्ती, वलय प्राप्त केले. चित्रपटामुळे दुरावलेला नाट्यरसिक त्यांनी नाट्यगृहात आणला. नाटके हाऊसफुल्ल, दिवसाला तीन शोज होऊ लागले. अशा जबरदस्त ताकदीच्या कलावंतावरील एक मराठी चित्रपट गाजतोय – आणि डॉ. काशिनाथ घाणेकर. अभिजित शिरीष देशपांडे यांनी या चित्रपटाचे अप्रतिम दिग्दर्शन केले आहे. त्यांच्याशी केलेली छोटीशी बातचीत…

सुबोध भावेंनी यात केलेली भूमिका लाजवाब आहे. घाणेकरांचा दिलखुलास स्वभाव, भूमिकेत झोकून देण्याची तयारी. पण सुबोध भावेंनी एके ठिकाणी म्हटलंय की, मला भूमिका करायला अजिबात त्रास झाला नाही, दिग्दर्शक अभिजितने जसं दाखवलं तसं केलं मी, असे असेल तर ती भूमिका तुम्ही स्वतः का केली नाही?

आमचे सहकारी विक्रम गायकवाड यांना मी जेव्हा प्रथम भेटलो. त्यावेळी त्यांनी हाच प्रश्न विचारला, जो तुम्ही विचारतायं. पण नंतर सुबोधचं नाव डोळ्यासमोर आलं आणि त्याने भूमिकेचं सोनं केलं. अभिनय ही वेगळी गोष्ट आहे. सुबोधनं हे म्हटलंय, हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे. मी त्या भूमिकेने झपाटलो होतो. हे खरं कारण आहे. 

तुम्ही सुबोधला घाणेकरांविषयी काही वाचू नका, असंही सांगितलं…

हो, चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम असल्यामुळे संपूर्ण चित्रपट माझ्या डोळ्यासमोर होता. बऱ्याच वर्षांपासून ह्या विषयावर चित्रपट बनविण्याचे ठरविले होते. त्यासाठी वाचन, अभ्यास केला. 

तुमचं वाचन चांगलं असेल….

मी आतापर्यंत फक्त सतराच पुस्तके वाचलीत. पण ह्या विषयावरच्या चित्रपटावर चिंतन, मनन खूप केलं.

राजेश खन्नाचं आयुष्यही जवळपास असंच आहे, मग तुम्ही त्या विषयाला का हात नाही घातला? तुम्हाला राजेश खन्ना – काका कसा वाटतो?

राजेश खन्ना हा माजा आवडता नट आहे. माझी ही आवड लक्षात घेऊन मला घऱी राजेश खन्नाला म्हणतात तेच म्हणजे काका म्हणतात. पण माझ्या लक्षात आले की, राजेश खन्ना हा तीन तासांत मावणारा नाही आणि राजेश खन्नाच्या अगोदरही मराठीत एक सुपर स्टार होऊन गेला. डॉ. काशिनाथ घाणेकर. बऱ्याच लोकांना राजेश खन्नाच भारतातील पहिला सुपरस्टार वाटतो. मला हा मुद्दा खोडून काढायचा होता. राजेश खन्ना 1970 मध्ये सुपरस्टार पदाला पोहोचला. त्या अगोदर 1966 मध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यरसिकांची गर्दी खेचत होते. त्यांची नाटके हाऊसफुल्ल होत होती. दिवसाला तीन–तीन शोज होत होते. म्हणून मराठीतल्या आणि देशातला पहिल्या सुपरस्टारवर मी चित्रपट बनविण्याचे नक्की केले.

बऱ्याच वेळा आपण चित्रपटातल्या प्रमुख कलाकारांचीच तारीफ करतो. पण चित्रपट बनवताना अनेकांचा त्यात हातभार असतो. या चित्रपटाचे कला दिग्दर्शन, मेकअप, सेट्स खूप छान आहे. त्या काळातली मुंबई खूप छान वाटते तर या पडद्यामागच्या कलावंतांविषयी काही सांगू शकाल का?

हो, विक्रम गायकवाड, नचिकेत बर्वे यांनी खूप परिश्रम घेतले. प्रसाद सुतारने तर नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून जुनी मुंबई अफलातून उभी केली आहे. या सुताराने मुंबई अक्षरशः बांधलीय.

गांधी, टिळक, बालगंधर्व, संजू असे आलेले बरेचसे चरित्रपट चालले. म्हणून हा चरित्रपट बनवला का?

नाही. मला पडद्यामागची दुनिया दाखवायची होती. परदेशात चित्रपट कसा बनतो. त्यामागे काय असतं, हेही दाखवितात. तिथे ते दाखविणारा एक गाईड असतो. तसं मला नाट्यसृष्टीत पडद्यामागे, विंगेत, मेकअप रूममध्ये, गाडीत काय चालतं, ते वेगळं विश्व दाखवायचं होतं. खूप रंजक विश्व आहे ते.

चित्रपटाला एवढं यश मिळण्याचं कारण डॉ. काशिनाथ घाणेकर यांचं वलय आहे का?      

यश मराठी रसिकांमुळे मिळालंय. मराठी माणूस नाटकवेडा आहे हे मला माहीत होतं. चांगलं लेखन, चांगला अभिनय, चांगलं दिग्दर्शन, चांगलं संकलन असेल तर तो ती कलाकृती उचलून धरतो. या चित्रपटाचं यश त्यात आहे. टीमवर्कचं हे यश आहे. आणि अर्थातच डॉ. काशिनाथ घाणेकर यांचं….”
 
“मुलाखतकार – संजय मिस्त्री (व्यंगचित्रकार)

मराठी रंगभूमीला, चित्रपटसृष्टीला इतिहास आहे. परंपरा आहे. बाल गंधर्व, दीनानाथ मंगेशकर, नानासाहेब पाठक, केशवराव दाते यांनी ती समृद्ध केली. त्यानंतर मा. दत्ताराम, बाळ कोल्हटकर, चित्तरंजन कोल्हटकर, प्रभाकर पणशीकर यांनी ती अधिक समृद्ध केली. याच पंक्तीतले आणखी एक जबरदस्त नाव आणि ते म्हणजे डॉ. काशिनाथ घाणेकर. व्यवसायाने डॉक्टर, गोल्डमेडल विजेते असतानाही अभिनयाच्या वेडापायी त्यांनी स्वतःला नाट्यक्षेत्रात झोकून दिले. अफाट कीर्ती, वलय प्राप्त केले. चित्रपटामुळे दुरावलेला नाट्यरसिक त्यांनी नाट्यगृहात आणला. नाटके हाऊसफुल्ल, दिवसाला तीन शोज होऊ लागले. अशा जबरदस्त ताकदीच्या कलावंतावरील एक मराठी चित्रपट गाजतोय – आणि डॉ. काशिनाथ घाणेकर. अभिजित शिरीष देशपांडे यांनी या चित्रपटाचे अप्रतिम दिग्दर्शन केले आहे. त्यांच्याशी केलेली छोटीशी बातचीत…

सुबोध भावेंनी यात केलेली भूमिका लाजवाब आहे. घाणेकरांचा दिलखुलास स्वभाव, भूमिकेत झोकून देण्याची तयारी. पण सुबोध भावेंनी एके ठिकाणी म्हटलंय की, मला भूमिका करायला अजिबात त्रास झाला नाही, दिग्दर्शक अभिजितने जसं दाखवलं तसं केलं मी, असे असेल तर ती भूमिका तुम्ही स्वतः का केली नाही?

आमचे सहकारी विक्रम गायकवाड यांना मी जेव्हा प्रथम भेटलो. त्यावेळी त्यांनी हाच प्रश्न विचारला, जो तुम्ही विचारतायं. पण नंतर सुबोधचं नाव डोळ्यासमोर आलं आणि त्याने भूमिकेचं सोनं केलं. अभिनय ही वेगळी गोष्ट आहे. सुबोधनं हे म्हटलंय, हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे. मी त्या भूमिकेने झपाटलो होतो. हे खरं कारण आहे. 

तुम्ही सुबोधला घाणेकरांविषयी काही वाचू नका, असंही सांगितलं…

हो, चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम असल्यामुळे संपूर्ण चित्रपट माझ्या डोळ्यासमोर होता. बऱ्याच वर्षांपासून ह्या विषयावर चित्रपट बनविण्याचे ठरविले होते. त्यासाठी वाचन, अभ्यास केला. 

तुमचं वाचन चांगलं असेल….

मी आतापर्यंत फक्त सतराच पुस्तके वाचलीत. पण ह्या विषयावरच्या चित्रपटावर चिंतन, मनन खूप केलं.

राजेश खन्नाचं आयुष्यही जवळपास असंच आहे, मग तुम्ही त्या विषयाला का हात नाही घातला? तुम्हाला राजेश खन्ना – काका कसा वाटतो?

राजेश खन्ना हा माजा आवडता नट आहे. माझी ही आवड लक्षात घेऊन मला घऱी राजेश खन्नाला म्हणतात तेच म्हणजे काका म्हणतात. पण माझ्या लक्षात आले की, राजेश खन्ना हा तीन तासांत मावणारा नाही आणि राजेश खन्नाच्या अगोदरही मराठीत एक सुपर स्टार होऊन गेला. डॉ. काशिनाथ घाणेकर. बऱ्याच लोकांना राजेश खन्नाच भारतातील पहिला सुपरस्टार वाटतो. मला हा मुद्दा खोडून काढायचा होता. राजेश खन्ना 1970 मध्ये सुपरस्टार पदाला पोहोचला. त्या अगोदर 1966 मध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यरसिकांची गर्दी खेचत होते. त्यांची नाटके हाऊसफुल्ल होत होती. दिवसाला तीन–तीन शोज होत होते. म्हणून मराठीतल्या आणि देशातला पहिल्या सुपरस्टारवर मी चित्रपट बनविण्याचे नक्की केले.

बऱ्याच वेळा आपण चित्रपटातल्या प्रमुख कलाकारांचीच तारीफ करतो. पण चित्रपट बनवताना अनेकांचा त्यात हातभार असतो. या चित्रपटाचे कला दिग्दर्शन, मेकअप, सेट्स खूप छान आहे. त्या काळातली मुंबई खूप छान वाटते तर या पडद्यामागच्या कलावंतांविषयी काही सांगू शकाल का?

हो, विक्रम गायकवाड, नचिकेत बर्वे यांनी खूप परिश्रम घेतले. प्रसाद सुतारने तर नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून जुनी मुंबई अफलातून उभी केली आहे. या सुताराने मुंबई अक्षरशः बांधलीय.

गांधी, टिळक, बालगंधर्व, संजू असे आलेले बरेचसे चरित्रपट चालले. म्हणून हा चरित्रपट बनवला का?

नाही. मला पडद्यामागची दुनिया दाखवायची होती. परदेशात चित्रपट कसा बनतो. त्यामागे काय असतं, हेही दाखवितात. तिथे ते दाखविणारा एक गाईड असतो. तसं मला नाट्यसृष्टीत पडद्यामागे, विंगेत, मेकअप रूममध्ये, गाडीत काय चालतं, ते वेगळं विश्व दाखवायचं होतं. खूप रंजक विश्व आहे ते.

चित्रपटाला एवढं यश मिळण्याचं कारण डॉ. काशिनाथ घाणेकर यांचं वलय आहे का?      

यश मराठी रसिकांमुळे मिळालंय. मराठी माणूस नाटकवेडा आहे हे मला माहीत होतं. चांगलं लेखन, चांगला अभिनय, चांगलं दिग्दर्शन, चांगलं संकलन असेल तर तो ती कलाकृती उचलून धरतो. या चित्रपटाचं यश त्यात आहे. टीमवर्कचं हे यश आहे. आणि अर्थातच डॉ. काशिनाथ घाणेकर यांचं….”

Continue reading

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...
Skip to content