HomeArchiveस्वातंत्र्यवीरांच्या जयघोषात रंगले...

स्वातंत्र्यवीरांच्या जयघोषात रंगले राज्यस्तरीय कवीसंमेलन!

Details
स्वातंत्र्यवीरांच्या जयघोषात रंगले राज्यस्तरीय कवीसंमेलन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 136 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येवर आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय कवी संमेलन रंगले ते स्वातंत्र्यवीरांच्या जयघोषांनी. काव्यप्रेमी शिक्षक मंचाचा यासाठी विशेष सहभाग होता. स्वातंत्र्यवीरांचे शौर्य, पराक्रम, साहित्यसंपदा, समाजसुधारणा अशा वैविध्यपूर्ण व्यक्तिमत्वांना उपस्थितांनी कवितेच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे सादर केले आणि उपस्थितांना एक वेगळाच अनुभव मिळाला. कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार संजय मंडलिक यांचीदेखील विशेष उपस्थिती होती.

 

स्मारकाच्या मादाम कामा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, या कार्यक्रमाचे संयोजक गुरूदत्त वाकदेकर, खुमासदार निवेदन करणारे सूत्रसंचालक पत्रकार पंकज दळवी, काव्यप्रेमी शिक्षक मंचाचे जया नेरे, प्रमोद बाविस्कर, राजेश साबळे, मुकेश विशे, मंजु सराटे, वंदना म्हात्रे, कल्पना देशमुख, कल्पना म्हापुसकर, किशोरी पाटील, शारदा कंधारे, विजय फडणीस, सचिन बागुल, धनाजी गुठे, आरोशी दाते यांची यावेळी उपस्थिती होती. स्वातंत्र्यवीरांची वेगवेगळी रूपं विविध माध्यमातून व्यक्त होणे आणि ती अनुभवणे हे विशेष आहे. त्याचबरोबर याठिकाणी आल्यानंतर एक वेगळीच राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळते, असे विचार खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केले.

 

यावेळी झालेल्या काव्यस्पर्धेतील विजेत्यांची नावे अशी- प्रथम- सलोनी बोरकर, द्वितीय- इशांत संगमनेरकर, तृतीय- चिंतामणी पावसे, उत्तेजनार्थ- काशीनाथ महाजन व सरला साळुंखे. या कार्यक्रमाचा प्रतिसाद विचारात घेता यापुढे विविध राज्यांमध्ये तसेच बहुभाषिक स्वरूपाचे कवीसंमेलन घेण्याचा मनोदय स्मारकाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 136 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येवर आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय कवी संमेलन रंगले ते स्वातंत्र्यवीरांच्या जयघोषांनी. काव्यप्रेमी शिक्षक मंचाचा यासाठी विशेष सहभाग होता. स्वातंत्र्यवीरांचे शौर्य, पराक्रम, साहित्यसंपदा, समाजसुधारणा अशा वैविध्यपूर्ण व्यक्तिमत्वांना उपस्थितांनी कवितेच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे सादर केले आणि उपस्थितांना एक वेगळाच अनुभव मिळाला. कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार संजय मंडलिक यांचीदेखील विशेष उपस्थिती होती.

 

स्मारकाच्या मादाम कामा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, या कार्यक्रमाचे संयोजक गुरूदत्त वाकदेकर, खुमासदार निवेदन करणारे सूत्रसंचालक पत्रकार पंकज दळवी, काव्यप्रेमी शिक्षक मंचाचे जया नेरे, प्रमोद बाविस्कर, राजेश साबळे, मुकेश विशे, मंजु सराटे, वंदना म्हात्रे, कल्पना देशमुख, कल्पना म्हापुसकर, किशोरी पाटील, शारदा कंधारे, विजय फडणीस, सचिन बागुल, धनाजी गुठे, आरोशी दाते यांची यावेळी उपस्थिती होती. स्वातंत्र्यवीरांची वेगवेगळी रूपं विविध माध्यमातून व्यक्त होणे आणि ती अनुभवणे हे विशेष आहे. त्याचबरोबर याठिकाणी आल्यानंतर एक वेगळीच राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळते, असे विचार खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केले.

 

यावेळी झालेल्या काव्यस्पर्धेतील विजेत्यांची नावे अशी- प्रथम- सलोनी बोरकर, द्वितीय- इशांत संगमनेरकर, तृतीय- चिंतामणी पावसे, उत्तेजनार्थ- काशीनाथ महाजन व सरला साळुंखे. या कार्यक्रमाचा प्रतिसाद विचारात घेता यापुढे विविध राज्यांमध्ये तसेच बहुभाषिक स्वरूपाचे कवीसंमेलन घेण्याचा मनोदय स्मारकाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.”
 
 

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content