HomeArchiveस्वातंत्र्यवीरांच्या जयघोषात रंगले...

स्वातंत्र्यवीरांच्या जयघोषात रंगले राज्यस्तरीय कवीसंमेलन!

Details
स्वातंत्र्यवीरांच्या जयघोषात रंगले राज्यस्तरीय कवीसंमेलन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 136 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येवर आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय कवी संमेलन रंगले ते स्वातंत्र्यवीरांच्या जयघोषांनी. काव्यप्रेमी शिक्षक मंचाचा यासाठी विशेष सहभाग होता. स्वातंत्र्यवीरांचे शौर्य, पराक्रम, साहित्यसंपदा, समाजसुधारणा अशा वैविध्यपूर्ण व्यक्तिमत्वांना उपस्थितांनी कवितेच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे सादर केले आणि उपस्थितांना एक वेगळाच अनुभव मिळाला. कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार संजय मंडलिक यांचीदेखील विशेष उपस्थिती होती.

 

स्मारकाच्या मादाम कामा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, या कार्यक्रमाचे संयोजक गुरूदत्त वाकदेकर, खुमासदार निवेदन करणारे सूत्रसंचालक पत्रकार पंकज दळवी, काव्यप्रेमी शिक्षक मंचाचे जया नेरे, प्रमोद बाविस्कर, राजेश साबळे, मुकेश विशे, मंजु सराटे, वंदना म्हात्रे, कल्पना देशमुख, कल्पना म्हापुसकर, किशोरी पाटील, शारदा कंधारे, विजय फडणीस, सचिन बागुल, धनाजी गुठे, आरोशी दाते यांची यावेळी उपस्थिती होती. स्वातंत्र्यवीरांची वेगवेगळी रूपं विविध माध्यमातून व्यक्त होणे आणि ती अनुभवणे हे विशेष आहे. त्याचबरोबर याठिकाणी आल्यानंतर एक वेगळीच राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळते, असे विचार खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केले.

 

यावेळी झालेल्या काव्यस्पर्धेतील विजेत्यांची नावे अशी- प्रथम- सलोनी बोरकर, द्वितीय- इशांत संगमनेरकर, तृतीय- चिंतामणी पावसे, उत्तेजनार्थ- काशीनाथ महाजन व सरला साळुंखे. या कार्यक्रमाचा प्रतिसाद विचारात घेता यापुढे विविध राज्यांमध्ये तसेच बहुभाषिक स्वरूपाचे कवीसंमेलन घेण्याचा मनोदय स्मारकाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 136 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येवर आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय कवी संमेलन रंगले ते स्वातंत्र्यवीरांच्या जयघोषांनी. काव्यप्रेमी शिक्षक मंचाचा यासाठी विशेष सहभाग होता. स्वातंत्र्यवीरांचे शौर्य, पराक्रम, साहित्यसंपदा, समाजसुधारणा अशा वैविध्यपूर्ण व्यक्तिमत्वांना उपस्थितांनी कवितेच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे सादर केले आणि उपस्थितांना एक वेगळाच अनुभव मिळाला. कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार संजय मंडलिक यांचीदेखील विशेष उपस्थिती होती.

 

स्मारकाच्या मादाम कामा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, या कार्यक्रमाचे संयोजक गुरूदत्त वाकदेकर, खुमासदार निवेदन करणारे सूत्रसंचालक पत्रकार पंकज दळवी, काव्यप्रेमी शिक्षक मंचाचे जया नेरे, प्रमोद बाविस्कर, राजेश साबळे, मुकेश विशे, मंजु सराटे, वंदना म्हात्रे, कल्पना देशमुख, कल्पना म्हापुसकर, किशोरी पाटील, शारदा कंधारे, विजय फडणीस, सचिन बागुल, धनाजी गुठे, आरोशी दाते यांची यावेळी उपस्थिती होती. स्वातंत्र्यवीरांची वेगवेगळी रूपं विविध माध्यमातून व्यक्त होणे आणि ती अनुभवणे हे विशेष आहे. त्याचबरोबर याठिकाणी आल्यानंतर एक वेगळीच राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळते, असे विचार खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केले.

 

यावेळी झालेल्या काव्यस्पर्धेतील विजेत्यांची नावे अशी- प्रथम- सलोनी बोरकर, द्वितीय- इशांत संगमनेरकर, तृतीय- चिंतामणी पावसे, उत्तेजनार्थ- काशीनाथ महाजन व सरला साळुंखे. या कार्यक्रमाचा प्रतिसाद विचारात घेता यापुढे विविध राज्यांमध्ये तसेच बहुभाषिक स्वरूपाचे कवीसंमेलन घेण्याचा मनोदय स्मारकाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.”
 
 

Continue reading

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...
Skip to content