HomeArchiveसुशील मुरकर ठरला...

सुशील मुरकर ठरला `सावरकरश्री’!

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
“मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि स्लीमवेलने अलीकडेच आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत सुशील मुरकर याने “सावरकर श्री २०२०”चा किताब पटकावला तर उपविजेतेपदी उमेश गुप्ताने स्थान पटकावले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात उत्तरोत्तर अटीतटीच्या रंगत गेलेल्या या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी आपले कसब पणाला लावले. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी खासदार गजानन किर्तिकर, स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्निल सावरकर, विश्वस्त शैलेंद्र चिखलकर, स्लीमवेलचे संचालक व बृहन्मुंबई शरीर सौष्ठव संघटनेचे ज्येष्ठ संघटक पपी पाटील, योगिनी आशिष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.”
 
“आंतरराष्ट्रीय पातळीवरील शरीरसौष्ठवपटूंशी स्पर्धा करण्याइतकी क्षमता भारतीय स्पर्धकांमध्ये आहे. त्यामुळे त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने अशाप्रकारचा उपक्रम सुरू करून त्या दिशेने प्रयत्न केले आहेत, ही एक चांगली बाब आहे, असे विचार खासदार किर्तिकर यांनी स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केले. विविध गटांमधील स्पर्धकांचे कसब वाखाणण्याजोगे होते. अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची ही लढत ठरत होती. त्यानंतर जाहीर झालेल्या विजेत्यांना पारितोषिके तसेच स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.”
 
 
 

Continue reading

नाशिकमध्ये झाला ग्लॅमर आणि सांस्कृतिक वारशाचा मिलाफ!

महाराष्ट्राच्या सुवर्ण परंपरेचा वारसा जपणाऱ्या पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स (पीएनजीजेएल)ने आपल्या विस्ताराचा अश्वमेध सुरूच ठेवला असून, मुंबईसह आता नाशिकमध्ये आपले नवीन भव्य दालन सुरू केले आहे. नाशिकच्या वाढत्या बाजारपेठेची गरज आणि ग्राहकांचा वाढता ओढा लक्षात घेऊन कंपनीने हे पाऊल...

तीन-चार महिन्यांनंतर वाढणार साखरेची ‘गोडी’!

जागतिक बाजारात सध्या साखरेच्या दराबाबत मोठी खळबळ उडाली आहे. 2026च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत (एप्रिल ते सप्टेंबर) साखरेचे भाव तेजीत राहतील, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. याला केवळ मागणी कारणीभूत नसून, त्यामागे पॅसिफिक महासागरातील हवामान बदल, ऊर्जेची भूक आणि...

सुटीच्या रविवारी दिवशी २०७ शासननिर्णयांची आतषबाजी!

काल रविवार, २९ मार्चचा सुटीचा दिवस असला तरी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयातील संगणक टायपिंग मात्र थांबले नाही. आर्थिक वर्षाचा शेवट (३१ मार्च) जवळ येत असताना, महायुती सरकारने रविवारी (२९ मार्च २०२६) एकाच दिवसात तब्बल २०७ शासननिर्णय (जीआर) निर्गमित करून प्रशासकीय...
Skip to content