HomeArchiveश्री साईबाबांचा पुण्यतिथी...

श्री साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव ७ ऑक्टोबरपासून!

Details
श्री साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव ७ ऑक्टोबरपासून!

    02-Oct-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था (शिर्डी) च्या वतीने सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर २०१९ ते गुरूवार दिनांक १० ऑक्टोबर २०१९ या काळात १०१वा श्री पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येणार असून उत्सवाच्या मुख्य दिवशी दिनांक ८ ऑक्टोबर रोजी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार आहे. साईभक्तांनी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.
 
 
श्री साईबाबांनी १०० वर्षांपूर्वी दसऱ्याच्यास दिवशी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी शिर्डी येथे आपला देह ठेवला. त्यादिवशी मंगळवार होता. १९१९ साली तिथीप्रमाणे बाबांची पहिली पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यानंतर आजतागायत हा पुण्यतिथी उत्सव नव्या उत्साहात साजरा केला जात आहे. विजयादशमी म्हाणजे श्री साईबाबांची पुण्यितिथी अशी एक नवी ओळख या सणाची निर्माण झाली आहे. देशभरातील व जगातील साईभक्त हा उत्स व साजरा करतात. त्यानुसार दिनांक ७ ऑक्टोबर २०१९ ते दिनांक १० ऑक्टोबर २०१९ या काळात १०१वा श्री पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येत असून उत्सवानिमित्त चार दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
उत्सवाच्या पहिल्या दिवशी सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.३० वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ५.०० वाजता श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे ५.१५ वाजता व्दारकामाईत श्री साईसच्चिरिताचे अखंड पारायण, पहाटे ५.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व नंतर दर्शन, दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ४.०० ते ६.०० यावेळेत कीर्तन कार्यक्रम समाधी मंदिराच्या शेजारील स्टेजवर होणार आहे. सायंकाळी ६.१५ वाजता धुपारती होणार आहे. रात्रौ ७.०० ते १०.०० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्रौ ९.१५ वाजता गावातून पालखीची मिरवणूक होणार आहे. रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होणार आहे. उत्सवाचा हा पहिला दिवस असल्यामुळे अखंड पारायणासाठी द्वारकामाई मंदिर रात्रभर उघडे राहील.
 
 
मंगळवार, दिनांक ८ ऑक्टोबर हा उत्सवाचा मुख्य दिवस आहे. यादिवशी पहाटे ४.३० वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ५.०० वाजता अखंड पारायण समाप्ती श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे ५.२० वाजता श्रींचे मंगल स्नान व नंतर दर्शन, सकाळी ९.०० वाजता भीक्षा झोळी कार्यक्रम, सकाळी १०.०० वाजता कीर्तनाचा कार्यक्रम होऊन सकाळी १०.३० वाजता समाधी मंदिरासमोरील मुख दर्शन हॉल स्टेजवर आराधना विधीचा कार्यक्रम होईल. दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद तर सायंकाळी ५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सीमोल्लंघन व मिरवणूक कार्यक्रम, सायंकाळी ६.१५ वाजता धुपारती होईल. रात्रौ ७.०० ते १०.०० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्रौ ९.१५ वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक काढण्यात येईल. उत्सवाचा हा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहील. रात्रौ ११.०० ते पहाटे ५.०० यावेळेत श्रींसमोर कलाकारांची हजेरी कार्यक्रम होईल.
 
 
बुधवार, दिनांक ९ ऑक्टोबर उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी ५.२० वाजता श्रींचे मंगल स्नान व नंतर दर्शन, दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ४.०० ते ६.०० यावेळेत कीर्तन कार्यक्रम होईल. सायंकाळी ६.१५ वाजता श्रींची धुपारती, रात्रौ ७.०० ते १०.०० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्रौ १०.३० वाजता शेजारती होईल.
 
 
उत्सवाच्या सांगता दिवशी गुरूवार, दिनांक १० ऑक्टोबर रोजी पहाटे ०४.३० वाजता काकड आरती, सकाळी ५.२० वाजता श्रींचे मंगल स्नान व नंतर दर्शन, सकाळी ६.४५ वाजता गुरूस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा होईल. सकाळी १०.०० वाजता गोपाळकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम होणार असून दुपारी १२.१० वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ६.१५ वाजता श्रींची धुपारती, रात्रौ ७.०० ते १०.०० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्रौ १०.३० वाजता शेजारती होईल.
 
 
हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.”

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
“श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था (शिर्डी) च्या वतीने सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर २०१९ ते गुरूवार दिनांक १० ऑक्टोबर २०१९ या काळात १०१वा श्री पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येणार असून उत्सवाच्या मुख्य दिवशी दिनांक ८ ऑक्टोबर रोजी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार आहे. साईभक्तांनी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.”
 
 
श्री साईबाबांनी १०० वर्षांपूर्वी दसऱ्याच्यास दिवशी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी शिर्डी येथे आपला देह ठेवला. त्यादिवशी मंगळवार होता. १९१९ साली तिथीप्रमाणे बाबांची पहिली पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यानंतर आजतागायत हा पुण्यतिथी उत्सव नव्या उत्साहात साजरा केला जात आहे. विजयादशमी म्हाणजे श्री साईबाबांची पुण्यितिथी अशी एक नवी ओळख या सणाची निर्माण झाली आहे. देशभरातील व जगातील साईभक्त हा उत्स व साजरा करतात. त्यानुसार दिनांक ७ ऑक्टोबर २०१९ ते दिनांक १० ऑक्टोबर २०१९ या काळात १०१वा श्री पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येत असून उत्सवानिमित्त चार दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
“उत्सवाच्या पहिल्या दिवशी सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.३० वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ५.०० वाजता श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे ५.१५ वाजता व्दारकामाईत श्री साईसच्चिरिताचे अखंड पारायण, पहाटे ५.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व नंतर दर्शन, दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ४.०० ते ६.०० यावेळेत कीर्तन कार्यक्रम समाधी मंदिराच्या शेजारील स्टेजवर होणार आहे. सायंकाळी ६.१५ वाजता धुपारती होणार आहे. रात्रौ ७.०० ते १०.०० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्रौ ९.१५ वाजता गावातून पालखीची मिरवणूक होणार आहे. रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होणार आहे. उत्सवाचा हा पहिला दिवस असल्यामुळे अखंड पारायणासाठी द्वारकामाई मंदिर रात्रभर उघडे राहील.”
 
 
“मंगळवार, दिनांक ८ ऑक्टोबर हा उत्सवाचा मुख्य दिवस आहे. यादिवशी पहाटे ४.३० वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ५.०० वाजता अखंड पारायण समाप्ती श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे ५.२० वाजता श्रींचे मंगल स्नान व नंतर दर्शन, सकाळी ९.०० वाजता भीक्षा झोळी कार्यक्रम, सकाळी १०.०० वाजता कीर्तनाचा कार्यक्रम होऊन सकाळी १०.३० वाजता समाधी मंदिरासमोरील मुख दर्शन हॉल स्टेजवर आराधना विधीचा कार्यक्रम होईल. दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद तर सायंकाळी ५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सीमोल्लंघन व मिरवणूक कार्यक्रम, सायंकाळी ६.१५ वाजता धुपारती होईल. रात्रौ ७.०० ते १०.०० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्रौ ९.१५ वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक काढण्यात येईल. उत्सवाचा हा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहील. रात्रौ ११.०० ते पहाटे ५.०० यावेळेत श्रींसमोर कलाकारांची हजेरी कार्यक्रम होईल.”
 
 
“बुधवार, दिनांक ९ ऑक्टोबर उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी ५.२० वाजता श्रींचे मंगल स्नान व नंतर दर्शन, दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ४.०० ते ६.०० यावेळेत कीर्तन कार्यक्रम होईल. सायंकाळी ६.१५ वाजता श्रींची धुपारती, रात्रौ ७.०० ते १०.०० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्रौ १०.३० वाजता शेजारती होईल.”
 
 
“उत्सवाच्या सांगता दिवशी गुरूवार, दिनांक १० ऑक्टोबर रोजी पहाटे ०४.३० वाजता काकड आरती, सकाळी ५.२० वाजता श्रींचे मंगल स्नान व नंतर दर्शन, सकाळी ६.४५ वाजता गुरूस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा होईल. सकाळी १०.०० वाजता गोपाळकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम होणार असून दुपारी १२.१० वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ६.१५ वाजता श्रींची धुपारती, रात्रौ ७.०० ते १०.०० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्रौ १०.३० वाजता शेजारती होईल.”
 
 
“हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.”

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थाशिर्डीसमाधी मंदिरदीपक मुगळीकरपुण्यतिथीविजयादशमीपालखीमिरवणूकद्वारकामाई मंदिर

Continue reading

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...
Skip to content