HomeArchive“वतन को जानो”...

“वतन को जानो” – काश्मिरी युवा आदान-प्रदान कार्यक्रम सुरू!

Details
“वतन को जानो” – काश्मिरी युवा आदान-प्रदान कार्यक्रम सुरू!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल ब्युरो

नेहरू युवा केंद्र, मुंबई, युवा कार्यक्रम व केंद्रीय क्रीडा मंत्रालयद्वारा मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, यांच्या सहकार्याने २४ ते २९ डिसेंबर, २०१८ दरम्यान “काश्मिरी युवा आदान-प्रदान” कार्यक्रमाचे आयोजन गोरेगाव पूर्वेच्या न्यूझीलंड होस्टेल येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना भातखळकर म्हणाले की, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आपला भारत देश एक आहे. आपले वतन – भारत देशाला जाणून घेण्यासाठी एकमेकांमध्ये जाऊन मिसळण्याची आवश्यकता आहे, जे आपण आज करीत आहात. आमची संस्कृती भिन्नभिन्न असली तरी आम्ही सर्व एक आहोत. सर्व गोष्टींमध्ये माणुसकी सर्वात श्रेष्ठ आहे. भारताच्या एकात्मतेचा आधार आमचे संविधान आहे. संविधानाने पूर्ण देश एका सूत्रामध्ये बांधला आहे.
राजीव अग्रवाल, मोनिका सिंह, अनिल मुरारका, फिरोज मासुलदार, उस्मान खान, राम पाल, रसिका अणेराव, रियाझ अहमद, अभिजित राणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

अशाप्रकारचे कार्यक्रम देशभरातील निवडक मुख्य शहरांमध्ये आयोजित करण्यात आले आहेत, त्यामध्ये मुंबईचा सुद्धा समावेश आहे. काश्मीर खोऱ्यातील युवांना देशाच्या विविध भागातील, विविध क्षेत्रातील प्रगती जाणून घेता यावी, देशातील सांस्कृतिक, औद्योगिक, ऐतिहासिक, धार्मिक आणि शैक्षणिक रूची असलेल्या विविध ठिकाणी भेट देण्यासाठी सहभागींना संधी प्रदान करणे, अनुकूल सहभागी ज्ञान विकसित करण्यासाठी मदत करणे, देशाच्या विविध राज्यामध्ये पर्यटन, अन्न, सांस्कृतिक, हस्तकला आणि काश्मिर खोऱ्याच्या इतर उत्पादनावरील माहिती सामाहिक करणे, सामजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक आणि पर्यावरणीय परिस्थितीत एकमेकांना समजून घेण्यास, प्रशंसा करण्यास आणि तुलना करण्यास संधी प्रदान करणे, भारतीय संविधानावरील माहिती आणि ज्ञान प्राप्त करणे, नागरिकांचे कर्तव्य आणि जबाबदारी, राष्ट्रीय एकत्रीकरण, देशभक्ती आणि राष्ट्र विकास यावर संवाद व चर्चा करणे, युवांनी असामाजिक तत्त्व व गुन्हेगारीकडे न वळता समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे, सामाजिक सौहार्द, राष्ट्रीय एकात्मता या भावना वृद्धींगत व्हाव्यात, हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश आहेत.

मुंबई येथील कार्यक्रमात प्रामुख्याने जम्मू आणि काश्मीर राज्यातील अनंतनाग, कुपवाडा, बारामुल्ला, बडगाम, श्रीनगर व पुलवामा या जिल्हयातील १३२ युवक–युवती सहभागी झाले आहेत. २४ ते २९ डिसेंबर २०१८ दरम्यान विविध शैक्षणिक, विकासात्मक विषयांवर मान्यवरांची सत्रे, मुंबई शहरातील विविध शैक्षणिक व ऐतिहासिक स्थळांना भेटी, सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रम, प्रदर्शनी, फूड फेस्टिवल इ. भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.”
 
“केएचएल ब्युरो

नेहरू युवा केंद्र, मुंबई, युवा कार्यक्रम व केंद्रीय क्रीडा मंत्रालयद्वारा मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, यांच्या सहकार्याने २४ ते २९ डिसेंबर, २०१८ दरम्यान “काश्मिरी युवा आदान-प्रदान” कार्यक्रमाचे आयोजन गोरेगाव पूर्वेच्या न्यूझीलंड होस्टेल येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना भातखळकर म्हणाले की, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आपला भारत देश एक आहे. आपले वतन – भारत देशाला जाणून घेण्यासाठी एकमेकांमध्ये जाऊन मिसळण्याची आवश्यकता आहे, जे आपण आज करीत आहात. आमची संस्कृती भिन्नभिन्न असली तरी आम्ही सर्व एक आहोत. सर्व गोष्टींमध्ये माणुसकी सर्वात श्रेष्ठ आहे. भारताच्या एकात्मतेचा आधार आमचे संविधान आहे. संविधानाने पूर्ण देश एका सूत्रामध्ये बांधला आहे.
राजीव अग्रवाल, मोनिका सिंह, अनिल मुरारका, फिरोज मासुलदार, उस्मान खान, राम पाल, रसिका अणेराव, रियाझ अहमद, अभिजित राणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

अशाप्रकारचे कार्यक्रम देशभरातील निवडक मुख्य शहरांमध्ये आयोजित करण्यात आले आहेत, त्यामध्ये मुंबईचा सुद्धा समावेश आहे. काश्मीर खोऱ्यातील युवांना देशाच्या विविध भागातील, विविध क्षेत्रातील प्रगती जाणून घेता यावी, देशातील सांस्कृतिक, औद्योगिक, ऐतिहासिक, धार्मिक आणि शैक्षणिक रूची असलेल्या विविध ठिकाणी भेट देण्यासाठी सहभागींना संधी प्रदान करणे, अनुकूल सहभागी ज्ञान विकसित करण्यासाठी मदत करणे, देशाच्या विविध राज्यामध्ये पर्यटन, अन्न, सांस्कृतिक, हस्तकला आणि काश्मिर खोऱ्याच्या इतर उत्पादनावरील माहिती सामाहिक करणे, सामजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक आणि पर्यावरणीय परिस्थितीत एकमेकांना समजून घेण्यास, प्रशंसा करण्यास आणि तुलना करण्यास संधी प्रदान करणे, भारतीय संविधानावरील माहिती आणि ज्ञान प्राप्त करणे, नागरिकांचे कर्तव्य आणि जबाबदारी, राष्ट्रीय एकत्रीकरण, देशभक्ती आणि राष्ट्र विकास यावर संवाद व चर्चा करणे, युवांनी असामाजिक तत्त्व व गुन्हेगारीकडे न वळता समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे, सामाजिक सौहार्द, राष्ट्रीय एकात्मता या भावना वृद्धींगत व्हाव्यात, हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश आहेत.

मुंबई येथील कार्यक्रमात प्रामुख्याने जम्मू आणि काश्मीर राज्यातील अनंतनाग, कुपवाडा, बारामुल्ला, बडगाम, श्रीनगर व पुलवामा या जिल्हयातील १३२ युवक–युवती सहभागी झाले आहेत. २४ ते २९ डिसेंबर २०१८ दरम्यान विविध शैक्षणिक, विकासात्मक विषयांवर मान्यवरांची सत्रे, मुंबई शहरातील विविध शैक्षणिक व ऐतिहासिक स्थळांना भेटी, सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रम, प्रदर्शनी, फूड फेस्टिवल इ. भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.”
 

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content