HomeArchive'वंदे भारत'वरील हल्ले...

‘वंदे भारत’वरील हल्ले रोखण्याचे मोठे आव्हान!

Details
‘वंदे भारत’वरील हल्ले रोखण्याचे मोठे आव्हान!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
देशातील पहिली देशी कोच कारखान्यात बनलेली ही वेगवान गाडी. गेल्याच महिन्यात पंतप्रधान मोदींनी झेंडा दाखवून सुरू केली. ट्रेन १८ चं नामकरण केलं गेलं, कारण २०१८च्या अखेर सुरू करणं उद्दिष्ट ठेवूनही ते साध्य होऊ शकलं नाही. सर्वप्रकारच्या सुरक्षा चाचण्यांना झालेला विलंब हे कारण पुढे येत आहे. सेमी हायस्पीड दर्जाची ही गाडी दिल्ली-वाराणसी मार्गावर चालू झाली. दोनशे किमी वेगाने जाणारी ही गाडी आठ तासात ७५५ कि.मी.चं अंतर पार करते. तर अन्य एका गाडीला यासाठी साडेअकरा तास लागतात. १५ फेब्रुवारीला, पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पध्दतीने पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवून तिला रवाना केली. उत्तर रेल्वे हिची जबाबदारी सांभाळणार असून ती सध्या १६० किमी वेगाने धावते.
चेन्नई कोच फॅक्टरीत तयार झालेली ही गाडी इतरही मार्गावर चालवली जाणार आहे. या गाडीची वेगवेगळी स्वरूपं तयार केली जात आहेत. रेल्वेच्या निर्णयानुसार चेन्नई इंटिग्रल कोच फॅक्टरीने कामास सुरूवात केली आहे. तेथील महाप्रबंधक सुधांशू मणी यांच्यानुसार, मार्चअखेरीस दोन सेट येतील. त्याचबरोबर या गाडीचे ७-८ सेट ते पण खुर्ची-डब्याचे करणे हे उद्दिष्ट आहे. याच गाडीच्या शयनिका (स्लीपर) आवृत्तीवरही काम चालू आहे. थोडक्यात सांगायचं तर राजधानी धर्तीवर ती असेल आणि या गाडीची मोठी बहीण म्हणता येईल. एक जास्तीचं टॉयलेट देण्याचाही विचार होतोय. हिच्या मर्यादित चाचण्या होतील, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. स्लिपरसाठी एसी फर्स्ट, एसी सेकंड, थर्ड एसी यावर अभ्यास चालू आहे. सध्याच्या त्रुटी जाणून घेणे झाल्यावर याच्या डिझाईनच काम सुरू होईल. आपली सध्याची मार्गयंत्रणा सक्षम आहे का, त्यावर याच ट्रॅकवरून त्या धावतील असं त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा यात आहेत.

 

दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार या गाडीची वैशिष्ट्ये पाहून पेरू, इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया तसेच पश्चिम आशियातील काही देशांनी आयातीसाठी यात रूची दाखवली आहे, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे राजेश अग्रवाल यांनी दिली. स्वदेशी उत्पादनाला अशी विचारणा झाल्याने निश्चितच आम्हाला अभिमान वाटतो. जगभरात रोलिंग स्टॉक बाजार सुमारे दोनशे अब्ज डॉलर इतका आहे यात आम्हाला भागीदारी, हिस्सा हवा असल्याने ही गाडी सफलतेने चालविण्याचा पुरेपूर प्रयत्न आहे, असं त्यांनी स्पष्ट केले.

जगभरात या दर्जाच्या गाडीची किंमत सुमारे अडीचशे कोटी रुपये असताना चेन्नईच्या कोच कारखान्याने अवघ्या शंभर कोटी रूपयांच्या खर्चात ती बनवली. सेमी हायस्पीड क्लबमध्ये सामील होणारा भारत हा नवा देश आहे. या गाडीची निर्मिती चेन्नईत झाली असली तरी ती देखभाल-कार्यानवीत करण्याचे काम रिसर्च डिझाईन अँड स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशन, लखनऊ यांनी केलं आहे. चाचणीत १८० कि.मी. गतीने गाडी पळाली असली तरी ती दोनशेच्या गतीनं धावू शकते. ती मेट्रो ट्रेनप्रमाणे इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवर चालते. पुढील काळात बहुधा ती शताब्दीची जागा घेईल अस म्हंटलं जातं. येणाऱ्या वर्षभरात, २०२० पर्यंत अशा १५ गाडयांचा ताफा सेवेत आणण्याचा विचार आहे. आयसीएफचे मुख्य अभियंता प्राचार्य शुभांशूकुमारनुसार जास्त गाडया बनवण्याने निर्मितीमूल्यात घट होईल. ३० गाडया पूर्ण केल्यावर अन्य सविधा विकासाकडे लक्ष पुरवले जाईल. गेल्याच महिन्यात बोलताना पियुष गोयल यांनी पुढे शंभर ट्रेन तयार करण्याबरोबरच भारतीय रेल्वेत होऊ घातलेल्या या बदलासाठी इतर देशांनी यात रूची दाखवली आहे. चिली, बांगला देश आदींनी विचारणा केली असून ट्रेन निर्यात वाढविण्याचं सांगितलं. ट्रॅक अपग्रेडेशन नंतरच १८० कि.मी.ची गती पकडता येईल. एका डब्याची किंमत सहा कोटी रूपयेवरून ५.५० कोटी रूपयांपर्यंत घटविण्याचा मानस आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

 

ही वंदे भारत ट्रेन भारत गाडी देशाच्या जवळपास सर्वच भागात चालवली जाईल असे संकेत आहेत. बुलेट ट्रेनचा खर्च पाहता सेमी हायस्पीड आधुनिक गाडी अधिक किफायतशीर आहे. यातून “मेक इन इंडिया”ला प्रोत्साहन मिळणार असून विश्वस्तरीय दर्जाचा अनुभव देण्यास कटिबद्ध असल्याचं रेल्वेच्या वरिष्ठांनी सांगितलं. नजीकच्या काळात बेंगळुरू-मंगळुरू, चेन्नई-मंगळुरू, हैदराबाद-मंगळुरू या गाडया चालू होतील. इंजिनरहित अशा या गाडीत शताब्दीपेक्षा गतीबरोबरच इतरही सुविधा आहेत. एक्झिक्युटिव्ह डब्यात ५६ तर नॉन एक्सझिकुटिव्ह डब्यात ७८ लोकांची बसण्याची व्यवस्था आहे. टीव्ही संच, १८० कोनात फिरणारी सीट, आटोमॅटिक दरवाजे दर्जेदार खाणे (भाड्यानुसार), याचाही अंतर्भाव आहे.

दगडफेक

दिल्ली मार्गावरील तुंडला स्थानकाजवळ या गाडीवर दगडफेक झाली. यापूर्वी डिसेम्बरमध्ये चाचणीच्या वेळी या घटना झाल्या. वाढत्या दगडफेकीच्या घटनांमुळे कणखर काचेचा वापर दुसऱ्या गाडीपासून केला जात आहे. अलीकडच्या काळात तर यापूर्वी चाचणी काळात अशा घटना घडल्या आहेत. गेल्यावर्षी कोकण मार्गावर उदघाटन झालेल्या ‘तेजस’वरही दगडफेक अनेकदा झाली, नव्हे आधुनिक सामानही चोरीला गेलं. त्यात कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळला. नॉन ब्रेकेबल प्रकारच्या काचा उपयोगात येतील, बसण्याच्या जागेतही बदल करून प्रवासी सीटच्या जागेत पाच इंच वाढ करू शकतील अशी युरोपीयन धर्तीवर सुधारणा होत आहे. मात्र यामुळे जेवणाच्या टेबलाच्या जागेत घट होईल. भारतीय जनतेला सुविधा हव्या आहेत. पण बऱ्याच सुशिक्षित लोकांना त्या वापरण्याची अक्कल नाही किंवा बाहेर त्यांची गुंडगिरी उफाळून येत असावी. ‘पैसे मोजून सुविधा’ अनेकांच्या पचनी नाही पडत, असं काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वातानुकूलित डब्यातील ब्लँकेट चोरीच्या घटनांत प्रवासी कर्मचारी आढळतात, हे बरेच बोलकं आहे. दिलेल्या सुविधा नीट मिळतील याची रेल्वेनेही घ्यावी जेणेकरून तोडफोड होणार नाही.”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
देशातील पहिली देशी कोच कारखान्यात बनलेली ही वेगवान गाडी. गेल्याच महिन्यात पंतप्रधान मोदींनी झेंडा दाखवून सुरू केली. ट्रेन १८ चं नामकरण केलं गेलं, कारण २०१८च्या अखेर सुरू करणं उद्दिष्ट ठेवूनही ते साध्य होऊ शकलं नाही. सर्वप्रकारच्या सुरक्षा चाचण्यांना झालेला विलंब हे कारण पुढे येत आहे. सेमी हायस्पीड दर्जाची ही गाडी दिल्ली-वाराणसी मार्गावर चालू झाली. दोनशे किमी वेगाने जाणारी ही गाडी आठ तासात ७५५ कि.मी.चं अंतर पार करते. तर अन्य एका गाडीला यासाठी साडेअकरा तास लागतात. १५ फेब्रुवारीला, पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पध्दतीने पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवून तिला रवाना केली. उत्तर रेल्वे हिची जबाबदारी सांभाळणार असून ती सध्या १६० किमी वेगाने धावते.
चेन्नई कोच फॅक्टरीत तयार झालेली ही गाडी इतरही मार्गावर चालवली जाणार आहे. या गाडीची वेगवेगळी स्वरूपं तयार केली जात आहेत. रेल्वेच्या निर्णयानुसार चेन्नई इंटिग्रल कोच फॅक्टरीने कामास सुरूवात केली आहे. तेथील महाप्रबंधक सुधांशू मणी यांच्यानुसार, मार्चअखेरीस दोन सेट येतील. त्याचबरोबर या गाडीचे ७-८ सेट ते पण खुर्ची-डब्याचे करणे हे उद्दिष्ट आहे. याच गाडीच्या शयनिका (स्लीपर) आवृत्तीवरही काम चालू आहे. थोडक्यात सांगायचं तर राजधानी धर्तीवर ती असेल आणि या गाडीची मोठी बहीण म्हणता येईल. एक जास्तीचं टॉयलेट देण्याचाही विचार होतोय. हिच्या मर्यादित चाचण्या होतील, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. स्लिपरसाठी एसी फर्स्ट, एसी सेकंड, थर्ड एसी यावर अभ्यास चालू आहे. सध्याच्या त्रुटी जाणून घेणे झाल्यावर याच्या डिझाईनच काम सुरू होईल. आपली सध्याची मार्गयंत्रणा सक्षम आहे का, त्यावर याच ट्रॅकवरून त्या धावतील असं त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा यात आहेत.

 

दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार या गाडीची वैशिष्ट्ये पाहून पेरू, इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया तसेच पश्चिम आशियातील काही देशांनी आयातीसाठी यात रूची दाखवली आहे, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे राजेश अग्रवाल यांनी दिली. स्वदेशी उत्पादनाला अशी विचारणा झाल्याने निश्चितच आम्हाला अभिमान वाटतो. जगभरात रोलिंग स्टॉक बाजार सुमारे दोनशे अब्ज डॉलर इतका आहे यात आम्हाला भागीदारी, हिस्सा हवा असल्याने ही गाडी सफलतेने चालविण्याचा पुरेपूर प्रयत्न आहे, असं त्यांनी स्पष्ट केले.

जगभरात या दर्जाच्या गाडीची किंमत सुमारे अडीचशे कोटी रुपये असताना चेन्नईच्या कोच कारखान्याने अवघ्या शंभर कोटी रूपयांच्या खर्चात ती बनवली. सेमी हायस्पीड क्लबमध्ये सामील होणारा भारत हा नवा देश आहे. या गाडीची निर्मिती चेन्नईत झाली असली तरी ती देखभाल-कार्यानवीत करण्याचे काम रिसर्च डिझाईन अँड स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशन, लखनऊ यांनी केलं आहे. चाचणीत १८० कि.मी. गतीने गाडी पळाली असली तरी ती दोनशेच्या गतीनं धावू शकते. ती मेट्रो ट्रेनप्रमाणे इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवर चालते. पुढील काळात बहुधा ती शताब्दीची जागा घेईल अस म्हंटलं जातं. येणाऱ्या वर्षभरात, २०२० पर्यंत अशा १५ गाडयांचा ताफा सेवेत आणण्याचा विचार आहे. आयसीएफचे मुख्य अभियंता प्राचार्य शुभांशूकुमारनुसार जास्त गाडया बनवण्याने निर्मितीमूल्यात घट होईल. ३० गाडया पूर्ण केल्यावर अन्य सविधा विकासाकडे लक्ष पुरवले जाईल. गेल्याच महिन्यात बोलताना पियुष गोयल यांनी पुढे शंभर ट्रेन तयार करण्याबरोबरच भारतीय रेल्वेत होऊ घातलेल्या या बदलासाठी इतर देशांनी यात रूची दाखवली आहे. चिली, बांगला देश आदींनी विचारणा केली असून ट्रेन निर्यात वाढविण्याचं सांगितलं. ट्रॅक अपग्रेडेशन नंतरच १८० कि.मी.ची गती पकडता येईल. एका डब्याची किंमत सहा कोटी रूपयेवरून ५.५० कोटी रूपयांपर्यंत घटविण्याचा मानस आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

 

ही वंदे भारत ट्रेन भारत गाडी देशाच्या जवळपास सर्वच भागात चालवली जाईल असे संकेत आहेत. बुलेट ट्रेनचा खर्च पाहता सेमी हायस्पीड आधुनिक गाडी अधिक किफायतशीर आहे. यातून “मेक इन इंडिया”ला प्रोत्साहन मिळणार असून विश्वस्तरीय दर्जाचा अनुभव देण्यास कटिबद्ध असल्याचं रेल्वेच्या वरिष्ठांनी सांगितलं. नजीकच्या काळात बेंगळुरू-मंगळुरू, चेन्नई-मंगळुरू, हैदराबाद-मंगळुरू या गाडया चालू होतील. इंजिनरहित अशा या गाडीत शताब्दीपेक्षा गतीबरोबरच इतरही सुविधा आहेत. एक्झिक्युटिव्ह डब्यात ५६ तर नॉन एक्सझिकुटिव्ह डब्यात ७८ लोकांची बसण्याची व्यवस्था आहे. टीव्ही संच, १८० कोनात फिरणारी सीट, आटोमॅटिक दरवाजे दर्जेदार खाणे (भाड्यानुसार), याचाही अंतर्भाव आहे.

दगडफेक

दिल्ली मार्गावरील तुंडला स्थानकाजवळ या गाडीवर दगडफेक झाली. यापूर्वी डिसेम्बरमध्ये चाचणीच्या वेळी या घटना झाल्या. वाढत्या दगडफेकीच्या घटनांमुळे कणखर काचेचा वापर दुसऱ्या गाडीपासून केला जात आहे. अलीकडच्या काळात तर यापूर्वी चाचणी काळात अशा घटना घडल्या आहेत. गेल्यावर्षी कोकण मार्गावर उदघाटन झालेल्या ‘तेजस’वरही दगडफेक अनेकदा झाली, नव्हे आधुनिक सामानही चोरीला गेलं. त्यात कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळला. नॉन ब्रेकेबल प्रकारच्या काचा उपयोगात येतील, बसण्याच्या जागेतही बदल करून प्रवासी सीटच्या जागेत पाच इंच वाढ करू शकतील अशी युरोपीयन धर्तीवर सुधारणा होत आहे. मात्र यामुळे जेवणाच्या टेबलाच्या जागेत घट होईल. भारतीय जनतेला सुविधा हव्या आहेत. पण बऱ्याच सुशिक्षित लोकांना त्या वापरण्याची अक्कल नाही किंवा बाहेर त्यांची गुंडगिरी उफाळून येत असावी. ‘पैसे मोजून सुविधा’ अनेकांच्या पचनी नाही पडत, असं काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वातानुकूलित डब्यातील ब्लँकेट चोरीच्या घटनांत प्रवासी कर्मचारी आढळतात, हे बरेच बोलकं आहे. दिलेल्या सुविधा नीट मिळतील याची रेल्वेनेही घ्यावी जेणेकरून तोडफोड होणार नाही.”
 
 

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content