HomeArchiveरितेश आणि जेनेलिया...

रितेश आणि जेनेलिया बनले ब्रँड इन्फ्ल्यूंसर!

Details

 
 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
तुझे मेरी कसमपासून चर्चेत आलेले आणि पुढे एकमेकांचे बनलेले चित्रपटसृष्टीतील जोडपे रितेश आणि जेनेलिया देशमुख हे ब्रँड इन्फ्लुएन्सर म्हणून नवीन ओळख निर्माण करत आहेत. ठाणे येथील काव्या नामक गृहनिर्माण प्रकल्पाचे ब्रँड इन्फ्लुएन्सर म्हणून हे जोडपे एकत्र काम करणार आहे. चित्रपटसृष्टीतील कपल म्हणून हे जोडपे ओळखले जाते. काव्या ग्रँड्योरच्या माध्यमातून हे जोडपे पहिल्यांदाच भारतात रिअल इस्टेट प्रकल्पच्या माध्यमातून एकत्र दिसणार आहे.
 
 
“अभिनेते रितेश देशमुख म्हणाले की, “काव्या ग्रुप””शी जोडले जाण्यात मला खूप आनंद होत आहे. काव्याला नवीनतम सुविधांसह लोकाच्या स्वप्नांतील घरे बांधण्याचा एक प्रदीर्घ असा वारसा आहे. त्यामुळे आपले स्वत:चे ‘ड्रीम हाऊस’ खरेदी करण्याचे स्वप्न साकार होईल. ग्रँड्योर आपल्याला केवळ जीवनशैली आणि सुविधाच देत नाही तर हे मध्यवर्ती वसलेले शहर आपल्याला शहराच्या उर्वरित भागासोबत चांगले जुळवून ठेवतो. तसेच हे एक सुविधपूर्ण असा परिवार बनवते आणि प्रत्येक महिलेच्या स्वप्नातील घर याठिकाणी असल्याचे रितेश देशमुख याने सांगितले. यावेळी बोलताना जेनेलिया डिसूझा-देशमुख यांनी सांगितले की, ”प्रत्येक कुटुंबासाठी हे एक अतिशय योग्य आणि प्रत्येक स्त्रीसाठी एक स्वप्नवत असे घर आहे.”””
 
 

 

Continue reading

‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!

देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी 'जेईई ॲडव्हान्स्ड २०२६' ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात...

येत्या शनिवार/रविवारी पायात बेड्या घालून फिरवा कौलू!

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली...

आज हनुमान जयंती! जाणून घ्या मारुतीच्या उपासनेमागील शास्त्र!! 

आज हनुमान (मारुती) जयंती! मनोजवम् मारुततुल्यवेगञ्, जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम्।। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये।। अर्थात् मनोवेगाने जाणारा, वाऱ्याप्रमाणे वेगवान, जितेंद्रिय, बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ, वायुपुत्र, वानरसमुदायाचा अधिपती आणि श्रीरामाचा दूत, अशा मारुतीला मी शरण आलो आहे. मारुतीच्या अतुलनीय गुणवैशिष्ट्यांची ओळख या एका श्लोकावरून होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जवळचा वाटणारा...
Skip to content