HomeArchiveमुंब्र्यात कब्रस्थानला आणखी...

मुंब्र्यात कब्रस्थानला आणखी जागा उपलब्ध करा – हाजी अरफात शेख!

Details
मुंब्र्यात कब्रस्थानला आणखी जागा उपलब्ध करा – हाजी अरफात शेख!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

मुंब्र्यात लवकरच अत्याधुनिक कत्तलखाना आणि उर्दूघर

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या मृतदेहाच्या अंत्यविधीचे सोपस्कार योग्य पद्धतीने व्हावेत, तो मानवी अधिकाराचा भाग आहे, असे मत राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी व्यक्त केले.

गुरूवारी त्यांनी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील कब्रस्तानला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. मुंब्रा येथील मुस्लिम समाजाच्या काही लोकांनी एमएम व्हॅली येथील नवीन कब्रस्तानबद्दल तक्रारी करत सदर कब्रस्तान दफन करण्यास योग्य नसल्याचे सांगितले होते. आज स्वतः आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात यांनी या कब्रस्तानला महापालिका अधिकाऱ्यांसह भेट देऊन तेथील माती जेसीबीने बाहेर काढून पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ठाणे पालिका आयुक्त, कार्यकारी अभियंता यांची पाठ थोपटत त्यांच्या कामाचे कौतुकही केले. याच जागेत आणखी दोन ते चार फूट भराव टाकावा, महिलांसाठी बसण्यासाठी योग्य जागा, ज्यावर छत्र आणि वझु करण्यासाठी योग्य व्यवस्था असावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

 

मुंब्रा शहरांमध्ये वेगाने सुरू असलेल्या नागरीकरणाच्या तुलनेत अंत्यविधीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्मशानभूमींची संख्या फारच तोकडी पडू लागली असून नागरी सुविधांचा महत्त्वाचा भाग असलेली ही व्यवस्था अपुरी पडू लागल्याचे वास्तव ठाणे महापालिकेस उशिरा का होईना लक्षात येऊ लागले आहे. मुंब्रा-कौसा भागातील जुन्या कब्रस्तानमध्ये भराव टाकून तेदेखील सुरू करत आणखी एखादा प्लॉट देण्यात यावा अशी मागणीदेखील त्यांनी केली.

 

अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांच्या दौऱ्यावेळी तांबोळी समाजाने निवेदन देत मुलींसाठी वसतिगृहाची मागणी केली. तीदेखील लवकरच पूर्ण करू, असे आश्वासन हाजी अरफात शेख यांनी कासीम तांबोळी यांना दिले. लवकरच मुंब्र्यात उच्च दर्जाचे स्लॉटर हाऊसदेखील तयार करणार असल्याचे आश्वासनदेखील त्यांनी दिले. या दौऱ्यात ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त मनीष जोशी, प्लानिंग एक्सिक्युटिव्ह श्रीकांत देशमुख, कार्यकारी अभियंता धनंजय गोसावी, शरीफ देशमुख, सरफराज अहमद, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या रिदा रशीद समवेत स्थानिक मुस्लिम समाज मोठया संख्येने उपस्थित होता.”
 
“मुंब्र्यात लवकरच अत्याधुनिक कत्तलखाना आणि उर्दूघर

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या मृतदेहाच्या अंत्यविधीचे सोपस्कार योग्य पद्धतीने व्हावेत, तो मानवी अधिकाराचा भाग आहे, असे मत राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी व्यक्त केले.

गुरूवारी त्यांनी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील कब्रस्तानला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. मुंब्रा येथील मुस्लिम समाजाच्या काही लोकांनी एमएम व्हॅली येथील नवीन कब्रस्तानबद्दल तक्रारी करत सदर कब्रस्तान दफन करण्यास योग्य नसल्याचे सांगितले होते. आज स्वतः आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात यांनी या कब्रस्तानला महापालिका अधिकाऱ्यांसह भेट देऊन तेथील माती जेसीबीने बाहेर काढून पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ठाणे पालिका आयुक्त, कार्यकारी अभियंता यांची पाठ थोपटत त्यांच्या कामाचे कौतुकही केले. याच जागेत आणखी दोन ते चार फूट भराव टाकावा, महिलांसाठी बसण्यासाठी योग्य जागा, ज्यावर छत्र आणि वझु करण्यासाठी योग्य व्यवस्था असावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

 

मुंब्रा शहरांमध्ये वेगाने सुरू असलेल्या नागरीकरणाच्या तुलनेत अंत्यविधीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्मशानभूमींची संख्या फारच तोकडी पडू लागली असून नागरी सुविधांचा महत्त्वाचा भाग असलेली ही व्यवस्था अपुरी पडू लागल्याचे वास्तव ठाणे महापालिकेस उशिरा का होईना लक्षात येऊ लागले आहे. मुंब्रा-कौसा भागातील जुन्या कब्रस्तानमध्ये भराव टाकून तेदेखील सुरू करत आणखी एखादा प्लॉट देण्यात यावा अशी मागणीदेखील त्यांनी केली.

 

अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांच्या दौऱ्यावेळी तांबोळी समाजाने निवेदन देत मुलींसाठी वसतिगृहाची मागणी केली. तीदेखील लवकरच पूर्ण करू, असे आश्वासन हाजी अरफात शेख यांनी कासीम तांबोळी यांना दिले. लवकरच मुंब्र्यात उच्च दर्जाचे स्लॉटर हाऊसदेखील तयार करणार असल्याचे आश्वासनदेखील त्यांनी दिले. या दौऱ्यात ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त मनीष जोशी, प्लानिंग एक्सिक्युटिव्ह श्रीकांत देशमुख, कार्यकारी अभियंता धनंजय गोसावी, शरीफ देशमुख, सरफराज अहमद, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या रिदा रशीद समवेत स्थानिक मुस्लिम समाज मोठया संख्येने उपस्थित होता.”
 
 

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content