HomeArchiveमुंबईत नौदलाच्या बोटींना...

मुंबईत नौदलाच्या बोटींना `कारगिल’ भेट?

Details
मुंबईत नौदलाच्या बोटींना `कारगिल’ भेट?

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
कारगिल विजयदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना नि शालेय विद्यार्थ्यांना भारतीय नौदलाच्या आघाडीच्या विनाशिका आयएनएस चेन्नई आणि आयएनएस मुंबई यांना पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. २६-२७ जुलै रोजी नेव्हल डॉकयार्ड येथे ही भेट मिळेल. मागील वेळी, ऐनवेळी सुरक्षेच्या नावाखाली ही भेट रद्द झाली होती हे लक्षात घेऊन संबंधितांनी भेटीचं नियोजन करावे. या दोन दिवसांत पहिला दिवस शालेय विद्यार्थ्यांना दिला असून त्यात इयत्ता पाचवी आणि त्यावरील विद्यार्थ्यांना या बोटी पाहता येतील तर दुसरा दिवस सर्वसामान्य जनतेला दिला आहे.

 
यासाठी कोणतेही सरकारी ओळखपत्र, आधारकार्ड फोटोसह ग्राह्य धरले जाणार आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची बॅग, मोबाईल, कॅमेरा जवळ बाळगण्याची परवानगी नाही. प्रवेश मुंबईच्या नेहमीच्या बलार्ड पिअर, टायगर गेट येथून दिला जाईल. सकाळी ९ ते ५ या काळात दोन बोटी पाहता येतील. बरोबर वीस वर्षांपूर्वी पाकिस्तानने तीन मेला द्रास, कारगिल भागात आक्रमण करून युद्ध छेडलं. मेंढपालांनी या डोंगरी भागात पाकडे बसल्याचे सांगितल्यावर युद्धाला सुरूवात झाली. त्यांना हुसकावण्यासाठी त्यानंतर जवळपास तीन महिन्यांनी २६ जुलैला ते संपुष्टात आले. १८ हजार फूट डोक्यावर असलेल्या शत्रूला पराभवाची धूळ चारताना ५२७ वीरांना आपण गमावलं तर १३०० जणांना जखमी अवस्थेत जगावं लागलं. काही अपंगही झाले तर ३५७ पाकडे ठार तर ६६५ जखमी झाले. भारतीय अहवालात १२०० मारले गेले. ते पाकिस्तान नाकारत आला आहे शेवटच्या टप्प्यात भारतीय वायूदलाच्या हल्ल्याने पाकचे कंबरडे मोडले नि विजय मिळाला. दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात भयानक युद्ध असे त्याचे वर्णन करतात, त्या शहीद वीरांच्या स्मरणार्थ हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
कारगिल विजयदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना नि शालेय विद्यार्थ्यांना भारतीय नौदलाच्या आघाडीच्या विनाशिका आयएनएस चेन्नई आणि आयएनएस मुंबई यांना पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. २६-२७ जुलै रोजी नेव्हल डॉकयार्ड येथे ही भेट मिळेल. मागील वेळी, ऐनवेळी सुरक्षेच्या नावाखाली ही भेट रद्द झाली होती हे लक्षात घेऊन संबंधितांनी भेटीचं नियोजन करावे. या दोन दिवसांत पहिला दिवस शालेय विद्यार्थ्यांना दिला असून त्यात इयत्ता पाचवी आणि त्यावरील विद्यार्थ्यांना या बोटी पाहता येतील तर दुसरा दिवस सर्वसामान्य जनतेला दिला आहे.

 
यासाठी कोणतेही सरकारी ओळखपत्र, आधारकार्ड फोटोसह ग्राह्य धरले जाणार आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची बॅग, मोबाईल, कॅमेरा जवळ बाळगण्याची परवानगी नाही. प्रवेश मुंबईच्या नेहमीच्या बलार्ड पिअर, टायगर गेट येथून दिला जाईल. सकाळी ९ ते ५ या काळात दोन बोटी पाहता येतील. बरोबर वीस वर्षांपूर्वी पाकिस्तानने तीन मेला द्रास, कारगिल भागात आक्रमण करून युद्ध छेडलं. मेंढपालांनी या डोंगरी भागात पाकडे बसल्याचे सांगितल्यावर युद्धाला सुरूवात झाली. त्यांना हुसकावण्यासाठी त्यानंतर जवळपास तीन महिन्यांनी २६ जुलैला ते संपुष्टात आले. १८ हजार फूट डोक्यावर असलेल्या शत्रूला पराभवाची धूळ चारताना ५२७ वीरांना आपण गमावलं तर १३०० जणांना जखमी अवस्थेत जगावं लागलं. काही अपंगही झाले तर ३५७ पाकडे ठार तर ६६५ जखमी झाले. भारतीय अहवालात १२०० मारले गेले. ते पाकिस्तान नाकारत आला आहे शेवटच्या टप्प्यात भारतीय वायूदलाच्या हल्ल्याने पाकचे कंबरडे मोडले नि विजय मिळाला. दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात भयानक युद्ध असे त्याचे वर्णन करतात, त्या शहीद वीरांच्या स्मरणार्थ हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.”
 

Continue reading

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...
Skip to content