HomeArchiveमुंबईत नौदलाच्या बोटींना...

मुंबईत नौदलाच्या बोटींना `कारगिल’ भेट?

Details
मुंबईत नौदलाच्या बोटींना `कारगिल’ भेट?

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
कारगिल विजयदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना नि शालेय विद्यार्थ्यांना भारतीय नौदलाच्या आघाडीच्या विनाशिका आयएनएस चेन्नई आणि आयएनएस मुंबई यांना पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. २६-२७ जुलै रोजी नेव्हल डॉकयार्ड येथे ही भेट मिळेल. मागील वेळी, ऐनवेळी सुरक्षेच्या नावाखाली ही भेट रद्द झाली होती हे लक्षात घेऊन संबंधितांनी भेटीचं नियोजन करावे. या दोन दिवसांत पहिला दिवस शालेय विद्यार्थ्यांना दिला असून त्यात इयत्ता पाचवी आणि त्यावरील विद्यार्थ्यांना या बोटी पाहता येतील तर दुसरा दिवस सर्वसामान्य जनतेला दिला आहे.

 
यासाठी कोणतेही सरकारी ओळखपत्र, आधारकार्ड फोटोसह ग्राह्य धरले जाणार आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची बॅग, मोबाईल, कॅमेरा जवळ बाळगण्याची परवानगी नाही. प्रवेश मुंबईच्या नेहमीच्या बलार्ड पिअर, टायगर गेट येथून दिला जाईल. सकाळी ९ ते ५ या काळात दोन बोटी पाहता येतील. बरोबर वीस वर्षांपूर्वी पाकिस्तानने तीन मेला द्रास, कारगिल भागात आक्रमण करून युद्ध छेडलं. मेंढपालांनी या डोंगरी भागात पाकडे बसल्याचे सांगितल्यावर युद्धाला सुरूवात झाली. त्यांना हुसकावण्यासाठी त्यानंतर जवळपास तीन महिन्यांनी २६ जुलैला ते संपुष्टात आले. १८ हजार फूट डोक्यावर असलेल्या शत्रूला पराभवाची धूळ चारताना ५२७ वीरांना आपण गमावलं तर १३०० जणांना जखमी अवस्थेत जगावं लागलं. काही अपंगही झाले तर ३५७ पाकडे ठार तर ६६५ जखमी झाले. भारतीय अहवालात १२०० मारले गेले. ते पाकिस्तान नाकारत आला आहे शेवटच्या टप्प्यात भारतीय वायूदलाच्या हल्ल्याने पाकचे कंबरडे मोडले नि विजय मिळाला. दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात भयानक युद्ध असे त्याचे वर्णन करतात, त्या शहीद वीरांच्या स्मरणार्थ हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
कारगिल विजयदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना नि शालेय विद्यार्थ्यांना भारतीय नौदलाच्या आघाडीच्या विनाशिका आयएनएस चेन्नई आणि आयएनएस मुंबई यांना पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. २६-२७ जुलै रोजी नेव्हल डॉकयार्ड येथे ही भेट मिळेल. मागील वेळी, ऐनवेळी सुरक्षेच्या नावाखाली ही भेट रद्द झाली होती हे लक्षात घेऊन संबंधितांनी भेटीचं नियोजन करावे. या दोन दिवसांत पहिला दिवस शालेय विद्यार्थ्यांना दिला असून त्यात इयत्ता पाचवी आणि त्यावरील विद्यार्थ्यांना या बोटी पाहता येतील तर दुसरा दिवस सर्वसामान्य जनतेला दिला आहे.

 
यासाठी कोणतेही सरकारी ओळखपत्र, आधारकार्ड फोटोसह ग्राह्य धरले जाणार आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची बॅग, मोबाईल, कॅमेरा जवळ बाळगण्याची परवानगी नाही. प्रवेश मुंबईच्या नेहमीच्या बलार्ड पिअर, टायगर गेट येथून दिला जाईल. सकाळी ९ ते ५ या काळात दोन बोटी पाहता येतील. बरोबर वीस वर्षांपूर्वी पाकिस्तानने तीन मेला द्रास, कारगिल भागात आक्रमण करून युद्ध छेडलं. मेंढपालांनी या डोंगरी भागात पाकडे बसल्याचे सांगितल्यावर युद्धाला सुरूवात झाली. त्यांना हुसकावण्यासाठी त्यानंतर जवळपास तीन महिन्यांनी २६ जुलैला ते संपुष्टात आले. १८ हजार फूट डोक्यावर असलेल्या शत्रूला पराभवाची धूळ चारताना ५२७ वीरांना आपण गमावलं तर १३०० जणांना जखमी अवस्थेत जगावं लागलं. काही अपंगही झाले तर ३५७ पाकडे ठार तर ६६५ जखमी झाले. भारतीय अहवालात १२०० मारले गेले. ते पाकिस्तान नाकारत आला आहे शेवटच्या टप्प्यात भारतीय वायूदलाच्या हल्ल्याने पाकचे कंबरडे मोडले नि विजय मिळाला. दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात भयानक युद्ध असे त्याचे वर्णन करतात, त्या शहीद वीरांच्या स्मरणार्थ हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.”
 

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content