Details
देशातल्या लहान व्यापाऱ्यांच्या तसेच शेतकऱ्यांच्या मुळावर उठणाऱ्या आरसीईपी करारावर भारताने सह्या करू नये या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली सोमवारी मुंबईत मंत्रालयाच्या दारावरच आंदोलन करण्यात आले.
आमदार देवेंद्र भुयार तसेच इतर नेते यात सहभागी झाले होते. इकडे मुंबईत आंदोलन होत असले तरी तिकडे बँकॉकच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या करारावर सह्या करण्यास नकार दिला. भारतीय समाजाचा यात विचार करण्यात आला नसल्याचे कारण देत त्यांनी भारताला यापासून दूर ठेवले.
छायाचित्रेः भूषण कोयंडे

