HomeArchive'प्लांट अ होप'...

‘प्लांट अ होप’ मोहीम वृक्षारोपणाची चळवळ ठरेल – राहुल शेवाळे

Details
‘प्लांट अ होप’ मोहीम वृक्षारोपणाची चळवळ ठरेल – राहुल शेवाळे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांइतके वृक्ष लावण्याच्या, खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतील मोहिमेचा शुभारंभ बुधवारी चेंबूर येथे पदाधिकारी आणि सामान्य नागरिकांच्या उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाची नवी आशा जागृत करणाऱ्या ‘प्लांट अ होप’ नावाच्या या वृक्षारोपण मोहिमेत खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने एकूण 4 लाख 24 हजार 913 वृक्षांची लागवड येत्या 5 वर्षांत केली जाणार आहे. या अनोख्या मोहिमेत सर्व नागरिकांनी सामील होण्याचे आवाहन शेवाळे यांनी केले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 4 लाख 24 हजार 913 मतांसह खासदार राहुल शेवाळे पुन्हा एकदा विजयी झाले. आपला हा विजय साजरा करण्यासाठी आणि मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खासदार शेवाळे यांनी, जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, मिळालेल्या मतांइतके वृक्ष लावण्याचा संकल्प केला. यानुसार बुधवारी सकाळी चेंबूरच्या पंजारापोळ परिसरातील शनी मंदिराजवळील मोकळ्या जागेत सुमारे 70 वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी खासदार राहुल शेवाळे यांच्यासोबत विभागप्रमुख मंगेश सातमकर, आमदार तुकाराम काते, बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर, नगरसेविका वैशाली नवीन शेवाळे, निधी शिंदे, उपविभागप्रमुख प्रमोद शिंदे, विधानसभा संघटक निमिष भोसले आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. पुढील पाच वर्षांत शिवसेना पदाधिकारी, विविध सेवाभावी संस्था, महाविद्यालये, खासगी कार्यालये, गृहनिर्माण सोसायट्या यांच्या माध्यमातून वेळोवेळी वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतले जाणार असून या मोहिमेला यशस्वी केले जाणार आहे.

 

दक्षिण-मध्य मुंबईतील जनतेने दाखविलेल्या विश्वासामुळेच पुन्हा एकदा या मतदारसंघात महायुतीचा भगवा फडकावता आला. या मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वृक्षारोपण हा सर्वोत्तम मार्ग मला वाटला. ‘प्लँट अ होप’ या मोहिमेमुळे मतदारसंघातील वायू प्रदूषणाची तीव्रता काहीशी कमी होऊ शकेल. जनतेनेही या मोहिमेत सहभागी व्हावे. ही मोहीम वृक्षारोपणाची नवी चळवळ व्हावी, अशी आशा करतो, असे राहुल शेवाळे म्हणाले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांइतके वृक्ष लावण्याच्या, खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतील मोहिमेचा शुभारंभ बुधवारी चेंबूर येथे पदाधिकारी आणि सामान्य नागरिकांच्या उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाची नवी आशा जागृत करणाऱ्या ‘प्लांट अ होप’ नावाच्या या वृक्षारोपण मोहिमेत खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने एकूण 4 लाख 24 हजार 913 वृक्षांची लागवड येत्या 5 वर्षांत केली जाणार आहे. या अनोख्या मोहिमेत सर्व नागरिकांनी सामील होण्याचे आवाहन शेवाळे यांनी केले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 4 लाख 24 हजार 913 मतांसह खासदार राहुल शेवाळे पुन्हा एकदा विजयी झाले. आपला हा विजय साजरा करण्यासाठी आणि मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खासदार शेवाळे यांनी, जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, मिळालेल्या मतांइतके वृक्ष लावण्याचा संकल्प केला. यानुसार बुधवारी सकाळी चेंबूरच्या पंजारापोळ परिसरातील शनी मंदिराजवळील मोकळ्या जागेत सुमारे 70 वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी खासदार राहुल शेवाळे यांच्यासोबत विभागप्रमुख मंगेश सातमकर, आमदार तुकाराम काते, बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर, नगरसेविका वैशाली नवीन शेवाळे, निधी शिंदे, उपविभागप्रमुख प्रमोद शिंदे, विधानसभा संघटक निमिष भोसले आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. पुढील पाच वर्षांत शिवसेना पदाधिकारी, विविध सेवाभावी संस्था, महाविद्यालये, खासगी कार्यालये, गृहनिर्माण सोसायट्या यांच्या माध्यमातून वेळोवेळी वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतले जाणार असून या मोहिमेला यशस्वी केले जाणार आहे.

 

दक्षिण-मध्य मुंबईतील जनतेने दाखविलेल्या विश्वासामुळेच पुन्हा एकदा या मतदारसंघात महायुतीचा भगवा फडकावता आला. या मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वृक्षारोपण हा सर्वोत्तम मार्ग मला वाटला. ‘प्लँट अ होप’ या मोहिमेमुळे मतदारसंघातील वायू प्रदूषणाची तीव्रता काहीशी कमी होऊ शकेल. जनतेनेही या मोहिमेत सहभागी व्हावे. ही मोहीम वृक्षारोपणाची नवी चळवळ व्हावी, अशी आशा करतो, असे राहुल शेवाळे म्हणाले.”
 

Continue reading

माऊलींच्या कृपेने आळंदीतच विठ्ठल दर्शन घडले!

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, आळंदी यांच्या वतीने काल आयोजित दिवाळी पहाट संगीत महोत्सवात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित राहून पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनसेवेचा आस्वाद घेतला. याप्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, भाऊबीजेला विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला...

आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ३ हेक्टरपर्यंत आर्थिक मदत

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्यशासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी शासनाने मान्यता दिली होती. आता या शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१...

खारपाड जमीनीवरचा खजूर लागवडीचा प्रयोग कोकणातही उपयोगी?

गुजरातच्या सौराष्ट्रमधील अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील एका शेतकऱ्याने खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. हा अनोखा पॅटर्न कोकणातील अन् राज्यातील क्षारयुक्त, खारट शेतजमीनधारकांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. सावरकुंडला येथील या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे- घनश्यामभाई चोडवडिया. त्यांच्या...
Skip to content