HomeArchiveतांडा सुधार समितीच्या...

तांडा सुधार समितीच्या गोर बंजारा संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

Details
तांडा सुधार समितीच्या गोर बंजारा संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
अखिल भारतीय तांडा सुधार समितीतर्फे आयोजित करण्यात आलेले पहिले अखिल भारतीय गोर बंजारा भजनकरी/शाहीर संमेलन, नागपूरमध्ये नुकतेच मोठ्या दिमाखात साजरे झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रेमदास महाराज वलोनीकर होते. संमेलनाचे उद्घाटन श्याम गुडे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रस्ताविक भाषणात प्रा. डॉ. प्रकाश राठोड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भजनकरी/शाहीरांनी समाजात प्रबोधन करताना विज्ञानवाद तसेच शिक्षणाचं महत्त्व समाजाला प्रबोधनाच्या माध्यमातून प्रचार करून समाजाला जागृत करण्याचे काम केले पाहिजे. संत सेवाभाया यांचे विचार विज्ञानवादी असून समाजाला दिशा देणारे होते व समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी सेवाभाया बरोबरच संत कबीर, संत तुकाराम महाराज, गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार भजनकरी शाहीरांच्या प्रबोधनाने झाले पाहिजे. त्याचाच धागा पकडून बंजारा समाजातील भजनकरी/शाहीर यांनी अशा पद्धतीने समाजात प्रबोधन केले पाहिजे.

 

मुख्य संयोजक नामा बंजारा यांनीदेखील अखिल भारतीय गोर बंजारा भजनकरी/शाहीर संमेलन घेण्यामागचे ध्येय व उद्देश सांगत ज्या पद्धतीने प्रत्येक समाजात शाहीर लोकांना शासनाच्या वतीने मानधन मिळत आहे, त्याच धर्तीवर बंजारा समाजातील भजनकरी मंडळींनादेखील या समितीच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले.

 

उदघाटक श्याम मुडे यांनी स्पष्टपणे सांगताना समाजाला शिक्षित करण्याचे काम जर कोणी करत असतील तर ते फक्त भजनकरी मंडळी करत आली आले आहे आणि या संमेलनाच्या माध्यमातून येणाऱ्या नविन पीढीला दिशा देण्याचे काम या भजनकरी मंडळींकडून अपेक्षित आहे, असा आशावाद व्यक्त केला.

 

अध्यक्षीय भाषणात प्रेमदास महाराज यांनी अत्यंत आनंद व्यक्त करताना सांगितले की, समाजात गेल्या कित्येक वर्षांपासून भजनकरी मंडळी प्रबोधनाचं काम समाजात करत आहेत आणि त्या अनुषंगाने समाजाला जागृत करण्याचे काम आतापर्यंत करत आले आहेत. पण या अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या माध्यमातून अखिल भारतीय गोर बंजारा भजनकरी/शाहीर यांना गठीत करून शासनाकडे पाठपुरावा करून ही समिती समाजात प्रबोधन करणाऱ्या भजनकरी मंडळीना शासनाकडून मानधन मिळावे यासाठी पाठपुरावा करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. ७०० ते ७५० भजनकरी तसेच भजनी रसिक यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आलेल्या भजनकरींनी गायलेल्या भजनांचा आनंद घेतला.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
अखिल भारतीय तांडा सुधार समितीतर्फे आयोजित करण्यात आलेले पहिले अखिल भारतीय गोर बंजारा भजनकरी/शाहीर संमेलन, नागपूरमध्ये नुकतेच मोठ्या दिमाखात साजरे झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रेमदास महाराज वलोनीकर होते. संमेलनाचे उद्घाटन श्याम गुडे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रस्ताविक भाषणात प्रा. डॉ. प्रकाश राठोड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भजनकरी/शाहीरांनी समाजात प्रबोधन करताना विज्ञानवाद तसेच शिक्षणाचं महत्त्व समाजाला प्रबोधनाच्या माध्यमातून प्रचार करून समाजाला जागृत करण्याचे काम केले पाहिजे. संत सेवाभाया यांचे विचार विज्ञानवादी असून समाजाला दिशा देणारे होते व समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी सेवाभाया बरोबरच संत कबीर, संत तुकाराम महाराज, गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार भजनकरी शाहीरांच्या प्रबोधनाने झाले पाहिजे. त्याचाच धागा पकडून बंजारा समाजातील भजनकरी/शाहीर यांनी अशा पद्धतीने समाजात प्रबोधन केले पाहिजे.

 

मुख्य संयोजक नामा बंजारा यांनीदेखील अखिल भारतीय गोर बंजारा भजनकरी/शाहीर संमेलन घेण्यामागचे ध्येय व उद्देश सांगत ज्या पद्धतीने प्रत्येक समाजात शाहीर लोकांना शासनाच्या वतीने मानधन मिळत आहे, त्याच धर्तीवर बंजारा समाजातील भजनकरी मंडळींनादेखील या समितीच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले.

 

उदघाटक श्याम मुडे यांनी स्पष्टपणे सांगताना समाजाला शिक्षित करण्याचे काम जर कोणी करत असतील तर ते फक्त भजनकरी मंडळी करत आली आले आहे आणि या संमेलनाच्या माध्यमातून येणाऱ्या नविन पीढीला दिशा देण्याचे काम या भजनकरी मंडळींकडून अपेक्षित आहे, असा आशावाद व्यक्त केला.

 

अध्यक्षीय भाषणात प्रेमदास महाराज यांनी अत्यंत आनंद व्यक्त करताना सांगितले की, समाजात गेल्या कित्येक वर्षांपासून भजनकरी मंडळी प्रबोधनाचं काम समाजात करत आहेत आणि त्या अनुषंगाने समाजाला जागृत करण्याचे काम आतापर्यंत करत आले आहेत. पण या अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या माध्यमातून अखिल भारतीय गोर बंजारा भजनकरी/शाहीर यांना गठीत करून शासनाकडे पाठपुरावा करून ही समिती समाजात प्रबोधन करणाऱ्या भजनकरी मंडळीना शासनाकडून मानधन मिळावे यासाठी पाठपुरावा करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. ७०० ते ७५० भजनकरी तसेच भजनी रसिक यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आलेल्या भजनकरींनी गायलेल्या भजनांचा आनंद घेतला.”
 
 
 

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content