HomeArchiveचक दे इंडिया!

चक दे इंडिया!

Details
चक दे इंडिया!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
`चक दे इंडिया’ हे पंजाबी भाषेतील वाक्य आहे. या वाक्याचा स्वैर अनुवाद असा की `विजयासाठी लढा’. आज इंगल्डच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे भारत विरूद्ध न्यूझीलंड असा सध्याच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतला पहिला उपांत्य फेरीतील सामना होणार आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज आहेत. 1976 साली विश्वचषकाचा पहिला सामना भारतीय संघ खेळला तो इंग्लंडविरूद्ध. त्यावेळी 60 षटकांचा डाव असायचा. भारताचा सलामीचा फलंदाज सुनील गावसकर हा पहिल्या सामन्यात सलामीला आला आणि 60 षटके होईपर्यंत तो नाबाद राहिला. पण त्याने धावा किती केल्या? नाबाद 36!

आज या गोष्टीवर कोणाचा विश्वास बसणार नाही. कारण गेल्या चार दशकांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. बचावात्मक खेळणारा, वेगवान गोलंदाजांपुढे कोसळणारा आणि फक्त फिरकीवर भिस्त असणारा भारतीय संघ पूर्णपणे बदलला आहे. तो जबरदस्त आक्रमक झाला आहे. आता रोहित शर्माचेच उदाहरण पाहा. रोहितने या स्पर्धेत पाच शतके ठोकीत आठ डावांत 647 धावा फटकावल्या आहेत. कर्णधार विराट कोहलीने पाच अर्धशतके ठोकली आहेत. मुळात आक्रमक असलेला विराट हा रोहितच्या खेळीने कमालीचा आनंदी दिसतो आहे. विराटवरील भार रोहितने हलका केला आहे. डावाच्या मध्यावर खेळावयास आल्यानंतर फलंदाजाची जबाबदारी अधिक वाढलेली असते. संघाची परिस्थिती काय आहे हे पाहून खेळावे लागते. भारतीय फलंदाज आपली जबाबदारी चांगली जाणतात.

 
आजच्या सामन्यात रोहित न्यूझीलंडच्या विरोधात मैदानात उतरेल तेव्हा त्याने लागोपाठ तीन शतके ठोकली असून त्याच्या गाठिशी के. एल. राहुल याच्यासह 180 हून अधिक धावांची भागीदारी केल्याचे दोन डाव जमा आहेत, हे न्यूझीलंडला विसरून चालणार नाही. रोहित शर्माची फलंदाजी सुसाट वेगात चालली आहे. त्याने आणखी दोन शतके ठोकून स्पर्धेत नवा विक्रम करावा ही प्रत्येक भारतीयाची सदिच्छा आहे. एकदिवसीय सामन्यातील तो जगातील आजचा टॉपचा फलंदाज आहे.

इंग्लंड ही क्रिकेटची पंढरी असल्यामुळे येथे क्रिकेट रसिकांचा सदैव जोरदार प्रतिसाद लाभतो. क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने सामन्यांना उपस्थित राहतात. विशेषत: भारताचा सामना असला की, तिरंगे फडकवीत भारतीय क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. आजदेखील तेच चित्र दिसेल यात शंका नाही. विश्वचषक म्हणजे विविध क्रिकेट संघांची मोठी परीक्षा असते. भारताने यापूर्वी 1983 आणि 2011 मध्ये विश्वचषक जिंकला आहे. त्या दोन संघांच्या तुलनेत यावेळचा भारतीय संघ फारच बलाढ्य आहे. पण इंग्रजीत एक म्हण आहे : ‘Cricket is the game of uncertainty’. मैदानात कधी काय होईल ते सांगता येत नाही. 1983 साली क्लाइव्ह लॉइडच्या बलाढ्य वेस्ट इंडीज संघाच्या तुलनेत कपिल देवचा भारतीय संघ कस्पटासमान होता. पण या संघाने वेस्ट इंडीजला धूळ चारली. ते सुवर्ण क्षण आजदेखील नजरेसमोरून हलता हलत नाहीत. आजच्या सामन्यातील भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही अनुभवी संघ आहेत. भारत सातवेळा तर न्यूझीलंड आठवेळा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे आजचा सामना हा दोन्ही संघांसाठी `करो या मरो’ अशा प्रकारात मोडणारा आहे. क्रिकेटवर आणि भारतावर प्रेम करणारा एक भारतीय नागरीक म्हणून आजच्या सामन्यानिमित्त आम्ही म्हणतो, `चक दे इंडिया’!”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
`चक दे इंडिया’ हे पंजाबी भाषेतील वाक्य आहे. या वाक्याचा स्वैर अनुवाद असा की `विजयासाठी लढा’. आज इंगल्डच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे भारत विरूद्ध न्यूझीलंड असा सध्याच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतला पहिला उपांत्य फेरीतील सामना होणार आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज आहेत. 1976 साली विश्वचषकाचा पहिला सामना भारतीय संघ खेळला तो इंग्लंडविरूद्ध. त्यावेळी 60 षटकांचा डाव असायचा. भारताचा सलामीचा फलंदाज सुनील गावसकर हा पहिल्या सामन्यात सलामीला आला आणि 60 षटके होईपर्यंत तो नाबाद राहिला. पण त्याने धावा किती केल्या? नाबाद 36!

आज या गोष्टीवर कोणाचा विश्वास बसणार नाही. कारण गेल्या चार दशकांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. बचावात्मक खेळणारा, वेगवान गोलंदाजांपुढे कोसळणारा आणि फक्त फिरकीवर भिस्त असणारा भारतीय संघ पूर्णपणे बदलला आहे. तो जबरदस्त आक्रमक झाला आहे. आता रोहित शर्माचेच उदाहरण पाहा. रोहितने या स्पर्धेत पाच शतके ठोकीत आठ डावांत 647 धावा फटकावल्या आहेत. कर्णधार विराट कोहलीने पाच अर्धशतके ठोकली आहेत. मुळात आक्रमक असलेला विराट हा रोहितच्या खेळीने कमालीचा आनंदी दिसतो आहे. विराटवरील भार रोहितने हलका केला आहे. डावाच्या मध्यावर खेळावयास आल्यानंतर फलंदाजाची जबाबदारी अधिक वाढलेली असते. संघाची परिस्थिती काय आहे हे पाहून खेळावे लागते. भारतीय फलंदाज आपली जबाबदारी चांगली जाणतात.

 
आजच्या सामन्यात रोहित न्यूझीलंडच्या विरोधात मैदानात उतरेल तेव्हा त्याने लागोपाठ तीन शतके ठोकली असून त्याच्या गाठिशी के. एल. राहुल याच्यासह 180 हून अधिक धावांची भागीदारी केल्याचे दोन डाव जमा आहेत, हे न्यूझीलंडला विसरून चालणार नाही. रोहित शर्माची फलंदाजी सुसाट वेगात चालली आहे. त्याने आणखी दोन शतके ठोकून स्पर्धेत नवा विक्रम करावा ही प्रत्येक भारतीयाची सदिच्छा आहे. एकदिवसीय सामन्यातील तो जगातील आजचा टॉपचा फलंदाज आहे.

इंग्लंड ही क्रिकेटची पंढरी असल्यामुळे येथे क्रिकेट रसिकांचा सदैव जोरदार प्रतिसाद लाभतो. क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने सामन्यांना उपस्थित राहतात. विशेषत: भारताचा सामना असला की, तिरंगे फडकवीत भारतीय क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. आजदेखील तेच चित्र दिसेल यात शंका नाही. विश्वचषक म्हणजे विविध क्रिकेट संघांची मोठी परीक्षा असते. भारताने यापूर्वी 1983 आणि 2011 मध्ये विश्वचषक जिंकला आहे. त्या दोन संघांच्या तुलनेत यावेळचा भारतीय संघ फारच बलाढ्य आहे. पण इंग्रजीत एक म्हण आहे : ‘Cricket is the game of uncertainty’. मैदानात कधी काय होईल ते सांगता येत नाही. 1983 साली क्लाइव्ह लॉइडच्या बलाढ्य वेस्ट इंडीज संघाच्या तुलनेत कपिल देवचा भारतीय संघ कस्पटासमान होता. पण या संघाने वेस्ट इंडीजला धूळ चारली. ते सुवर्ण क्षण आजदेखील नजरेसमोरून हलता हलत नाहीत. आजच्या सामन्यातील भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही अनुभवी संघ आहेत. भारत सातवेळा तर न्यूझीलंड आठवेळा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे आजचा सामना हा दोन्ही संघांसाठी `करो या मरो’ अशा प्रकारात मोडणारा आहे. क्रिकेटवर आणि भारतावर प्रेम करणारा एक भारतीय नागरीक म्हणून आजच्या सामन्यानिमित्त आम्ही म्हणतो, `चक दे इंडिया’!”
 

Continue reading

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...
Skip to content