Friday, October 18, 2024
HomeArchiveक्रीडा प्रशिक्षकांशी आता...

क्रीडा प्रशिक्षकांशी आता चार वर्षांचा करार!

Details

 

 
“केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
नवी दिल्लीः 2024 आणि 2028 च्या ऑलिम्पिकवर केंद्र शासनाने लक्ष केंद्रित केले असताना, ऑलिम्पिकशी बांधिलकी असलेले खेळाडू सातत्याने एका प्रशिक्षकाबरोबर प्रशिक्षण घेतील, त्यासाठी त्यांच्या कामगिरीत सुधारणा घडवून आणण्यासाठी, परदेशी आणि भारतीय प्रशिक्षक आता चार वर्षं ऑलिम्पिक चक्रासह त्यांच्या करारांची आखणी करणार आहेत. टोकियो 2020 ऑलिम्पिक पुढे ढकलण्यात आल्यामुळे सर्व परदेशी प्रशिक्षकांचे करार 30 सप्टेंबर 2021पर्यंत वाढविण्यात येतील.
 
या निर्णयाबद्दल बोलताना, केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू म्हणाले की, क्रीडा क्षेत्रात प्रशिक्षक हा कणा असतो आणि अॅथलिटसाठी योग्य प्रशिक्षण निश्चित करणे, हे ऑलिम्पिकसह सर्व प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताची संधी सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हा निर्णय 2024 आणि 2028च्या ऑलिम्पिक स्पर्धांच्या तयारीसाठी भारताच्या दीर्घकालीन आराखड्याचा एक भाग आहे. प्रशिक्षकांची कामगिरी आणि संबंधित एनएसएफच्या शिफारशीच्या आधारे प्रशिक्षकांचा चार वर्षांचा करार केला जाईल. हा करार जरी चार वर्षांचा असला, तरी या कराराचा दरवर्षी आढावा घेतला जाईल आणि प्रमुख आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमधील खेळाडूच्या कामगिरीद्वारे प्रशिक्षकांच्या सर्वंकष कामगिरीनुसार त्यांच्या करारामध्ये वाढ करण्यात येईल.
 

 
 
सरकारच्या निर्णयावर भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. नरिंदर ध्रुव बत्रा म्हणाले की, अलिकडेच क्रीडामंत्री, एनएसएफचे संबंधित अधिकारी यांच्यासह झालेल्या बैठकीत मुद्दा मांडण्यात आला होता की परदेशी प्रशिक्षकांसह दीर्घकालीन करार करण्यात यावेत. विशेषत्वाने सध्याच्या काही महिन्यांच्या सक्तीच्या मिळालेल्या खंडानंतर या निर्णयामुळे खेळाडूंना आपल्या कारकिर्दीचा मोठा पल्ला गाठण्यास मदत होईल. विद्यमान प्रशिक्षक या खेळाडूंना ओळखतात आणि त्यामुळे ते त्यांना उत्तमरितीने घडवू शकतील. प्रशिक्षकांचे वारंवार बदलणे म्हणजे खेळाडूला नवीन प्रशिक्षकांच्या सिद्धांताशी सातत्याने जुळवून घ्यावे लागते आणि प्रशिक्षकांच्या बाबतीतही तसेच घडते. काहीवेळा याचा खेळाडूंच्या कामगिरीवरही परिणाम होतो. या निर्णयामुळे 2022च्या आशियाई क्रीडा स्पर्धांवर आणि 2023मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धांवरही सकारात्मक परिणाम होऊ शकेल. सर्व प्रशिक्षक निश्चितच खेळाडूंची कामगिरी वृद्धींगत करतील आणि भारतासाठी अधिक पदके मिळवण्याचा प्रयत्न करतील.
 “

Continue reading

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...

प्रेम, नुकसान आणि उपचार म्हणजेच जिंदगीनामा!

जिंदगीनामा, सोनी लिव्हवरील सहा भागांचा काव्यसंग्रह, शक्तिशाली कथनातून मानसिक आरोग्याच्या गुंतागुंतीचा शोध घेतो, ज्यातील प्रत्येक अद्वितीय आव्हाने हाताळते. मालिका सहानुभूती वाढवण्याचा आणि अनेकदा न बोललेल्या विषयांबद्दल संभाषण वाढवण्याचा प्रयत्न करते. प्रिया बापटसाठी, हा प्रकल्प फक्त दुसऱ्या भूमिकेपेक्षा अधिक होता–...

20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान! 23ला निकाल!!

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार असून त्याचकरीता येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होईल. मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार असून त्याचदिवशी निकाल जाहीर केले जातील. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या...
Skip to content