HomeArchiveकाँग्रेसने माज दाखवू...

काँग्रेसने माज दाखवू नये..

Details
काँग्रेसने माज दाखवू नये..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान

[email protected]

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते की,‘ज्याने यशाचे श्रेय घेतले त्यालाच अपयशाचे श्रेयही घ्यावे लागेल.’ जरआता आपण राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड याराज्यांमधील निकालाचा कौल बघितला की सहज लक्षात येतं की आता पराभवाचे श्रेयही भाजपाला,चाणक्यांना आणि चंद्रगुप्त यांना घ्यावे लागणार आहे. आताच मेसेज व्हायरल होत आहेत की ‘चंद्रगुप्त  कुठे गेले, चाणक्य कुठे गेले?’  पप्पू कोण ठरले? अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसने राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखाली यश खेचून आणले म्हणून हुरळून जाऊ नये. राजस्थानात, मध्य प्रदेशमध्ये दररोज प्रचारा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात घमासान रंगत होती, जे आरोप प्रत्यारोप सुरू होते, ते अवघ्या देशाने पाहिले आहेत, ऐकले आहेत, अनुभवले आहेत. मात्र, निकालाच्या वेळी प्रचारातील या मुद्द्यांपेक्षा सर्वात महत्त्वाचा ठरला तो जनतेमधील असंतोष. भाजपाच्या शासनाविषयीचा असंतोष, भाजपाच्या सत्ताकारणा विषयीचा असंतोष, भाजपाच्या उन्मादाविषयीचा असंतोष, शेतकर्‍यांचा असंतोष, मध्यमवर्गी यांचा असंतोष, सर्व सामान्यांचा असंतोषच भाजपाला या पराभवाच्या खाईत घेऊन गेला आहे. या निवडणुकांना लोकसभेची मिनी निवडणूक म्हटले जात होते. ही मिनी निवडणूक होती की नाही हे येणार्‍या काही महिन्यांतच ठरणार आहे. पण जेव्हाही मिनी निवडणूक म्हटली  जाते, तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय चित्र असू शकते, समोर काय वाढून ठेवले आहे? काय आव्हान आहे? याचा विचार आता काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या धुरीणांनी करायला हवा.

 

राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारले, त्याला एक वर्षपूर्ण होत असतानाच त्यांनाही आगळीभेट मिळावी हा एक योगायोगच आहे. मात्र या योगायोगावर हुरळून न जाता काँग्रेसने कार्यकर्त्यांच्या सबलीकरणाकडे, कार्यकर्त्यांना पुढे आणण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. राहुल गांधी यांनी निदान आता तरी विचाराने तीच पावले उचलली आहेत असे दिसत आहे.

मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांत राजस्थानपेक्षाही मध्यप्रदेशच्या  झुंजीकडे फार लक्ष लागले होते. राजस्थानमध्ये एकहाती सत्तापालट होईल असा अंदाज विश्लेषक,इलेक्शन पंडित आधीच वर्तवत होते. मात्र मध्यप्रेदशमध्ये ही काँग्रेस यापद्धतीने बहुमताकडे झेपावेल असे वाटत नव्हते. शिवराज सिंग चौहान यांच्या विरोधात प्रत्यक्ष वैयक्तिक नाराजी नसल्यामुळे त्यांच्या प्रतिमेचा फायदा भाजपाला मिळू शकतो अशा प्रकारची चर्चा होती. मात्र ती चर्चाही आजच्या निवडणुकीत मतदारांनी फोल ठरवली. मतदार भाकरी फिरवू शकतात,  हेया निवडणुकीने दाखवून दिले आहे. ही निवडणूक एका वेगळ्या अर्थाने प्रत्येक पक्षाला काही तरी संदेश देणारी ठरली आहे. याआधी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली भाजपाला सक्षम पर्याय देण्यासाठी एकत्र आघाडी करायला विरोधी पक्ष नाखुश होते. त्यांच्या बोलण्यातून, नेत्यांच्या देहबोलीतून हे जाणवत होते. मात्र राहुल गांधी यांनी नेतृत्त्व करून एकहाती प्रचार करून नव्या रक्ताला वाव देत जुन्यांनाही समवेत घेत जो विजय खेचून आणला ते पाहता काँग्रेसचे नेतृत्त्व विरोधी पक्षांना मान्य करावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकजूट केल्याशिवाय पर्याय नाही हे आता विरोधी पक्षांनीही स्वीकारले पाहिजे. याचवेळी भाजपालाही आपला नेहमीचा जितं मया हा मार्ग सोडून आत्मरपरिक्षण करण्याची वेळ आली आहे. हे घडून येईल आणि  देशातील जनतेला, शेतकर्‍यांना, मध्यमवर्गीयांना, सामान्यांना अच्छे दिन येतील अशी आशा या निवडणुकांमुळे वाटू लागली आहे.”
 
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान

[email protected]

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते की,‘ज्याने यशाचे श्रेय घेतले त्यालाच अपयशाचे श्रेयही घ्यावे लागेल.’ जरआता आपण राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड याराज्यांमधील निकालाचा कौल बघितला की सहज लक्षात येतं की आता पराभवाचे श्रेयही भाजपाला,चाणक्यांना आणि चंद्रगुप्त यांना घ्यावे लागणार आहे. आताच मेसेज व्हायरल होत आहेत की ‘चंद्रगुप्त  कुठे गेले, चाणक्य कुठे गेले?’  पप्पू कोण ठरले? अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसने राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखाली यश खेचून आणले म्हणून हुरळून जाऊ नये. राजस्थानात, मध्य प्रदेशमध्ये दररोज प्रचारा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात घमासान रंगत होती, जे आरोप प्रत्यारोप सुरू होते, ते अवघ्या देशाने पाहिले आहेत, ऐकले आहेत, अनुभवले आहेत. मात्र, निकालाच्या वेळी प्रचारातील या मुद्द्यांपेक्षा सर्वात महत्त्वाचा ठरला तो जनतेमधील असंतोष. भाजपाच्या शासनाविषयीचा असंतोष, भाजपाच्या सत्ताकारणा विषयीचा असंतोष, भाजपाच्या उन्मादाविषयीचा असंतोष, शेतकर्‍यांचा असंतोष, मध्यमवर्गी यांचा असंतोष, सर्व सामान्यांचा असंतोषच भाजपाला या पराभवाच्या खाईत घेऊन गेला आहे. या निवडणुकांना लोकसभेची मिनी निवडणूक म्हटले जात होते. ही मिनी निवडणूक होती की नाही हे येणार्‍या काही महिन्यांतच ठरणार आहे. पण जेव्हाही मिनी निवडणूक म्हटली  जाते, तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय चित्र असू शकते, समोर काय वाढून ठेवले आहे? काय आव्हान आहे? याचा विचार आता काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या धुरीणांनी करायला हवा.

 

राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारले, त्याला एक वर्षपूर्ण होत असतानाच त्यांनाही आगळीभेट मिळावी हा एक योगायोगच आहे. मात्र या योगायोगावर हुरळून न जाता काँग्रेसने कार्यकर्त्यांच्या सबलीकरणाकडे, कार्यकर्त्यांना पुढे आणण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. राहुल गांधी यांनी निदान आता तरी विचाराने तीच पावले उचलली आहेत असे दिसत आहे.

मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांत राजस्थानपेक्षाही मध्यप्रदेशच्या  झुंजीकडे फार लक्ष लागले होते. राजस्थानमध्ये एकहाती सत्तापालट होईल असा अंदाज विश्लेषक,इलेक्शन पंडित आधीच वर्तवत होते. मात्र मध्यप्रेदशमध्ये ही काँग्रेस यापद्धतीने बहुमताकडे झेपावेल असे वाटत नव्हते. शिवराज सिंग चौहान यांच्या विरोधात प्रत्यक्ष वैयक्तिक नाराजी नसल्यामुळे त्यांच्या प्रतिमेचा फायदा भाजपाला मिळू शकतो अशा प्रकारची चर्चा होती. मात्र ती चर्चाही आजच्या निवडणुकीत मतदारांनी फोल ठरवली. मतदार भाकरी फिरवू शकतात,  हेया निवडणुकीने दाखवून दिले आहे. ही निवडणूक एका वेगळ्या अर्थाने प्रत्येक पक्षाला काही तरी संदेश देणारी ठरली आहे. याआधी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली भाजपाला सक्षम पर्याय देण्यासाठी एकत्र आघाडी करायला विरोधी पक्ष नाखुश होते. त्यांच्या बोलण्यातून, नेत्यांच्या देहबोलीतून हे जाणवत होते. मात्र राहुल गांधी यांनी नेतृत्त्व करून एकहाती प्रचार करून नव्या रक्ताला वाव देत जुन्यांनाही समवेत घेत जो विजय खेचून आणला ते पाहता काँग्रेसचे नेतृत्त्व विरोधी पक्षांना मान्य करावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकजूट केल्याशिवाय पर्याय नाही हे आता विरोधी पक्षांनीही स्वीकारले पाहिजे. याचवेळी भाजपालाही आपला नेहमीचा जितं मया हा मार्ग सोडून आत्मरपरिक्षण करण्याची वेळ आली आहे. हे घडून येईल आणि  देशातील जनतेला, शेतकर्‍यांना, मध्यमवर्गीयांना, सामान्यांना अच्छे दिन येतील अशी आशा या निवडणुकांमुळे वाटू लागली आहे.”
 

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content