Homeपब्लिक फिगरयुवकांना अजिंठा परिसरातल्या...

युवकांना अजिंठा परिसरातल्या भू-वारसा स्थळांची माहिती हवी!

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज अजिंठा येथे भू-वारसा शिबिराचे आयोजन केले होते. आपल्या परिसरातील भू-वारसा स्थळांची माहिती युवावर्गाला व्हावी त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे देशभर आयोजन करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 मध्ये विकसित भारताचे ध्येय दिले आहे. ते आपणा सर्वांना पूर्ण करायचे आहे. त्यादृष्टीने युवकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, असे रावसाहेब पाटील दानवे म्हणाले. अशाप्रकारची माहिती विद्यार्थ्यांना आयुष्यभर मोलाची ठरणारी असते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वारसा स्थळांची सहल घडवून आणावी, असे आवाहन मंत्र्यांनी केले.

देशात प्रथमच विकसित भारताचे ध्येय पूर्ण करण्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद करुन ठेवली आहे. भारताचा विकासाचा वेग पाहून जग भारताकडे आकर्षित होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे वाढते महत्त्व हे भारताची विकसित देशाकडे असलेली वाटचाल दर्शवते, असे ते म्हणाले. 

पुढे बोलताना राज्यमंत्री दानवे म्हणाले की, दळणवळणाची साधने आणि संपर्कव्यवस्था वाढल्याने विकासाला चालना मिळते. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परिसरात रेल्वेमार्गाच्या विकासाचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी भू-वारसा स्थळांसंबंधी आयोजित करण्यात आलेल्या विविध प्रश्नमंजूषेतील विद्यार्थ्यांना पारितोषकं प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार, खाण मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार शकील आलम, भारतीय भू-वैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेचे अधिकारी उपस्थित होते. 

Continue reading

पुण्यात मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मोदी सरकारची मंजुरी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने काल दिल्लीत झालेल्या एका बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मार्गिका क्र. 4 ए (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांच्या कार्याला मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गिका क्र....

ठाण्यात २ ते ४ डिसेंबरमध्ये रंगणार विभागीय खो-खोचा महासंग्राम

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि दी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे यांच्या आयोजनाखाली, श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त जे. पी. कोळी यांच्या स्मरणार्थ निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन येत्या २ ते ४ डिसेंबरदरम्यान ठाण्यातल्या युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर...

एकीकृत पेन्शन योजनेच्या पर्यायासाठी उरले फक्त ४ दिवस

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025. रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे (एफएक्स-1/3/2024-पीआर) पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना स्वीकारण्याच्या पर्यायाबाबत (यूपीएस) अधिसूचित केले आहे. यासाठी पात्र कर्मचारी आणि एनपीएस सदस्यांना सीआरए प्रणालीद्वारे किंवा प्रत्यक्ष अर्जाद्वारे नोडल अधिकाऱ्यांकडे विनंती दाखल...
Skip to content