Homeटॉप स्टोरीउद्धव ठाकरे आज...

उद्धव ठाकरे आज पुन्हा काढणार मुख्यमंत्रीपदाचा विषय?

माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात दुपारी ३ वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या वतीने संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीतल्या महाविकास आघाडीचा चेहरा जाहीर करण्याचा आग्रह धरतात का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

उद्धव

महाविकास आघाडीच्या याच षण्मुखानंद सभागृहात नुकत्याच झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यावेळी मंचावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद्चंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार उपस्थित होते. पहिलेच भाषण करताना ठाकरे यांनी पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा नामोल्लेख करत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी केली. पवार आणि चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, मी इथल्या इथे पाठिंबा जाहीर करतो, असे ते म्हणाले. पण, ठाकरे यांच्या मागणीला कोणीही प्रतिसाद दिला नाही.

उद्धव

आजच्या या मेळाव्याला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीच्या पवार गटाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, विधान परिषद गटनेते सतेज पाटील यांच्यासह प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

आजच्या या मेळाव्याला काँग्रेसचे नेते राहुल गांधी येणार होते. पण, ऐनवेळी त्यांनी आपला मुंबई दौरा रद्द केला.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content