Tuesday, February 4, 2025
Homeटॉप स्टोरीउद्धव ठाकरे आज...

उद्धव ठाकरे आज पुन्हा काढणार मुख्यमंत्रीपदाचा विषय?

माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात दुपारी ३ वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या वतीने संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीतल्या महाविकास आघाडीचा चेहरा जाहीर करण्याचा आग्रह धरतात का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

उद्धव

महाविकास आघाडीच्या याच षण्मुखानंद सभागृहात नुकत्याच झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यावेळी मंचावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद्चंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार उपस्थित होते. पहिलेच भाषण करताना ठाकरे यांनी पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा नामोल्लेख करत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी केली. पवार आणि चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, मी इथल्या इथे पाठिंबा जाहीर करतो, असे ते म्हणाले. पण, ठाकरे यांच्या मागणीला कोणीही प्रतिसाद दिला नाही.

उद्धव

आजच्या या मेळाव्याला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीच्या पवार गटाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, विधान परिषद गटनेते सतेज पाटील यांच्यासह प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

आजच्या या मेळाव्याला काँग्रेसचे नेते राहुल गांधी येणार होते. पण, ऐनवेळी त्यांनी आपला मुंबई दौरा रद्द केला.

Continue reading

श्री मावळी मंडळाच्या खो-खो स्पर्धेत ज्ञानविकास,विहंग विजयी

ठाण्यातील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रथम विभागीय खो-खो स्पर्धेच्या महिला गटात ज्ञानविकास फाउंडेशन संघ (ठाणे) व पुरुष गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे) या संघांनी विजेतेपद पटकावले. महिला गटातील अंतिम सामन्यात ठाण्याच्या ज्ञानविकास फाउंडेशन संघाने ठाण्याच्या रा....

महाराष्ट्रात सुरू होणार देशातले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ

महाराष्ट्रात देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असे राज्याचे तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. नवे विद्यापीठ AI आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला...

शेअर बाजारात पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी पाण्यात!

बजेटनंतरच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या व्यवहारात पहिल्या अवघ्या पाच मिनिटांत सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला. त्यामुळे या पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटींचे नुकसान झाले. कार्पोरेट क्षेत्राची बजेटने निराशा केल्याचे मानले जात आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अपेक्षित गुंतवणूक न...
Skip to content