Homeएनसर्कलदक्षिण मुंबईतल्या हिंदू...

दक्षिण मुंबईतल्या हिंदू मंदिरांचे जतन होणार?

मुंबईतल्या गिरगाव/दक्षिण मुंबईतील हिंदू मंदिरांचे जतन, संरक्षण व संवर्धन व्हावे, गिरगावचा सांस्कृतिक वारसा जतन केला जावा यासाठी मुंबई हिंदू मंदिर, जतन, संरक्षण, संवर्धन अभियान, गिरगाव सांस्कृतिक वारसा जतन अभियान, मुंबई विकास परिषद, मुंबई भाडेकरू संघर्ष समितीचे निमंत्रक व संयोजक राघवेंद्र कौलगी यांनी काल मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याशी त्यांच्या दालनात चर्चा केली.

या बैठकीला दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून परिमंडळ-३चे पोलीस उपायुक्त, व्हि. पी. रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंबई महानगरपालिकेच्या डी वॉर्डचे

सहाय्यक आयुक्त, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाच्या उपसचिव, पर्यटन विभागाचे उपसचिव, महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक, महालक्ष्मी देवस्थानच्या व्यवस्थापक व आमदार डॉ. मनीषा कायंदे उपस्थित होते.

या बैठकीत गिरगाव, दक्षिण मुंबईतील प्राचीन देवळांचे संरक्षण होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. या विषयांतर्गत श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, वैद्यवाडी, ठाकूरद्वार, या मंदिराचे जतन, संरक्षण व संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा तसेच या मंदिराच्या प्राचीनतेची साक्ष असलेल्या व गायब झालेल्या शिलालेखाचा पोलीस तपास करण्यात यावा अशी मागणी कौलगी यांनी या बैठकीत केली. ती मान्य करण्यात आली. सर्व कायदेशीर बाजू तपासून व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गिरगाव/दक्षिण मुंबईतील सर्व मंदिरांचे जतन, संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सर्व विभागांनी सकारात्मक प्रयत्न करावेत, असे निर्देश उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content