Homeटॉप स्टोरीविधान परिषदेतल्या दोघा...

विधान परिषदेतल्या दोघा आमदारांचे भवितव्य आज निश्चित?

महाराष्ट्र विधान परिषदेचे १५ सदस्य याच महिन्यात निवृत्त होत असून यातल्या तीन सदस्यांचा सभागृहातला प्रवेश निश्चित झाला असून दोघांचे भवितव्य आज निश्चित होण्याची शक्यता आहे. निवृत्त होणारे दोन आमदार, काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. याच निवडणुकीत उमेदवारीअर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे. त्यावर या दोन्ही सदस्यांच्या विधान परिषदेतल्या पुनर्प्रवेश अवलंबून आहे.

विधानपरिषदेतील सदस्य विलास पोतनीस, निरंजन डावखरे, किशोर दराडे आणि कपिल पाटील येत्या सात जुलैला निवृत्त होत आहेत. अनिल परब, महादेव जानकर, डॉ. मनीषा कायंदे, विजय ऊर्फ भाई गिरकर, बाबाजानी दुर्राणी, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील, डॉ. मिर्झा वजाहत, डॉ. प्रज्ञा सातव आणि जयंत पाटील येत्या २७ जुलैला निवृत्त होत आहेत. यातले निरंजन डावखरे, किशोर दराडे आणि अनिल परब पुन्हा निवडून आले आहेत. त्यामुळे या सदस्यांचा विधान परिषदेतला पुनर्प्रवेश निश्चित झाला आहे. डॉ. प्रज्ञा सातव तसेच जयंत पाटील यांनी विधानसभा सदस्यांद्वारे विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या मतदारसंघातून उमेदवारीअर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघातून ११ सदस्य निवडून जायचे आहेत. त्याकरीता आताच्या घडीला १२ उमेदवार रिंगणात आहेत. आहेत. आज उमेदवारीअर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. जर या दोघांव्यतिरिक्त कोणी उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला तर हे दोन्ही सदस्य पुन्हा विधान परिषदेत दिसतील.

या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून पाच तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येकी दोन उमेदवार देण्यात आले आहेत. विरोधकांकडून डॉ. प्रज्ञा सातव, जयंत पाटील यांच्याबरोबरच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. सत्ताधारी महायुतीचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवार मागे घेणार नसल्याचे ठासून सांगितले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने एक उमेदवार मागे घेतला तरच ही निवडणूक बिनविरोध होईल. नाही तर १२ जुलैला होणाऱ्या निवडणुकीनंतरच प्रज्ञा सातव आणि जयंत पाटील यांचा विधान परिषदेतला पुन्हा प्रवेश निश्चित होईल.

निवृत्त होणाऱ्या सदस्यांची कामगिरी होणार इतिहास – एकनाथ शिंदे

दरम्यान, काल विधान परिषदेत पुढच्या अधिवेशनाआधी निवृत्त होणाऱ्या या १५ सदस्यांना निरोप देण्यात आला. विधान परिषद महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने वरिष्ठ सभागृह आहे. त्याचा नावलौकिक उंचावणारी कामगिरीच आज निवृत्त होणाऱ्या सदस्यांनी केली आहे. या कामगिरीची दखल विधिमंडळाच्या कामकाजाच्या रुपाने इतिहास म्हणून नोंदवली गेली आहे. येणाऱ्या पिढ्यांना या सदस्यांचे काम या कामकाजाच्या नोंदीवरून अभ्यासता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

ही नव्या कार्यकाळाची सुरूवात – देवेंद्र फडणवीस

विधान परिषदेतील कार्यकाळ पूर्ण झालेल्या सदस्यांची ही निवृत्ती नाही किंवा त्यांना निरोप नाही तर त्यांचा एक कार्यकाळ संपतोय आणि ते दुसऱ्या वेगळ्या कार्यकाळाची सुरूवात करताहेत असे मी मानतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.

जनमानसांना न्याय देण्याचे कार्य – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या की, सर्व सदस्यांनी जनतेच्या समस्या मांडण्यासाठी प्रश्न, लक्षवेधीसह विविध संसदीय आयुधे वापरली. त्यांचे समाजकारण पुढेही असेच सुरू राहवे.

यानंतर विधिमंडळात विधानसभेचे अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधान परिषदेच्या उपसभापती यांच्यासमवेत सदस्यांचे एकत्रित छायाचित्र काढण्यात आले. यावेळी सतेज पाटील, शशिकांत शिंदे, अनिल परब, कपिल पाटील, भाई गिरकर, मनीषा कायंदे, डॉ. वजाहत मिर्झा, किशोर दराडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

Continue reading

बाळासाहेबांच्या लवचिक राजकारणाच्या गुणाचा वापर 2019 सालीच!

मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या. या महापालिकांमध्ये सभागृह अस्तित्त्वात येण्यापासून महापौर निवडीपर्यंतच्या अनेक प्रक्रिया सध्या सुरू आहेत. यातलाच एक भाग म्हणून 22 जानेवारीला कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गातील महापौर असावा यासाठी आरक्षणाची घोषित करण्यात आले. त्यानुसार आता...

रडारड पक्षकार्यकर्त्यांची! अगदी संजय राऊतांसह!!

महाराष्ट्रात मुंबईसह 29 महानगरपालिकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी उमेदवारीअर्ज दाखल करण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. आता माघारीचे पर्व सुरू झाले आहे. यामध्ये कोणाची, कुठे आणि कोणाबरोबर, कोणत्या पातळीवर, युती किंवा आघाडी झाली हे हळूहळू स्पष्ट होईलच,...

मुंबईत मिळतील तितक्या जागांवर राज ठाकरे समाधानी?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल एका पत्रकार परिषदेत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत युती केल्याचे जाहीर केले असले तरीही कोण किती जागा लढवणार याचा पेच अद्यापही कायम असल्याचे समजते....
Skip to content