Homeमुंबई स्पेशलमीरा जगन्नाथ आणि...

मीरा जगन्नाथ आणि स्नेहामध्ये होणार का भांडण?

बिग बॉस मराठी सिझन ३ची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली.. स्पर्धक कोण असतील? घर कसे असेल? याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात होती. आणि रविवारी संध्याकाळी ७ वाजता महेश मांजरेकर यांची धमाकेदार एन्ट्री झाली. सोबत सिद्धार्थ जाधवने उत्तम साथ देत पुन्हा एकदा सगळ्याची मने जिंकली..

स्नेहा वाघ, मीनल शाह, अक्षय वाघमारे, मीरा जगन्नाथ, विकास पाटील, सुरेखा कुडची, गायत्री दातार यांचे एकापेक्षा एक परफॉर्मन्स सादर झाले. याचसोबत बिग बॉस मराठीच्या घरात सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेड संस्थेच्या संस्थापिका तृप्ती देसाई यांची एंट्री झाली.

सोनाली पाटील यांची बिग बॉस मराठी सिझन ३च्या घरात पहिली एन्ट्री झाली आणि त्यानंतर एक एक करून १४ सदस्य बिग बॉस मराठीच्या घरात गेले. बिग बॉस मराठीचे आलीशान घर बघून सगळेच अवाक झाले..

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पाहिल्याच दिवशी झालं मीरा आणि जय यांच्यात होणारं भांडण.. तसंच मीरा आणि स्नेहामध्ये झालेली बाचाबाची. मीराने जयला सुनावले “जय, मला डोकं आहे”, तर स्नेहाने मीराला खडसावले “ही काय पद्धत आहे का बोलायची”?

घरामध्ये झालेला वाद असो वा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये झालेली पहिली नॉमिनेशन प्रक्रिया असो.. सगळेच चर्चेत असणार आहे. मीरा आणि स्नेहा तसेच मीरा आणि जयमध्ये वाद कशावरून झाला? पुढे काय झालं? हे आजच्या भागामध्ये कळेल..

पहिल्या नॉमिनेशनद्वारेच लढाईला प्रारंभ होणार आहे. सदस्यांचा पहिला दिवस कसा होता? पहिल्या नॉमिनेशन प्रक्रीयेमध्ये कोण कोण नॉमिनेट झाले, हे बघणं रंजक ठरणार आहे.. तेव्हा नक्की बघुया बिग बॉस मराठी सिझन ३, रात्री ९.३० वा., कलर्स मराठीवर..

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content