Homeटॉप स्टोरीअनेक साखर कारखान्यांचे...

अनेक साखर कारखान्यांचे गाळप यंदा लवकरच ठप्प?

यंदा अनेक साखर कारखान्यांचा गाळप हंगाम लवकर बंद होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र, कर्नाटकातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम साधारणतः मार्चअखेरीस बंद व्हायला सुरुवात होते. काही कारखाने मात्र ऊसाच्या उपलब्धतेनुसार उशिरापर्यंत सुरू राहतात. यंदा मात्र फेब्रुवारी मध्यातच 20-25 कारखान्यांना गाळप हंगाम बंद करावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत. यावर्षी ऊस लागवड उशिरा सुरू झाल्याने साखर उत्पादनावर परिणाम होण्याच्या शक्यतेला “श्री रेणुका शुगर्स”चे चेअरमन अतुल चतुर्वेदी यांनीही दुजोरा दिला आहे.

2023-2024 गाळप हंगामामध्ये 319 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. 2024-2025 म्हणजे यंदाच्या हंगामात मात्र साखरेचे उत्पादन 270 ते 280 लाख टन राहण्याचा इस्मा

साखर

अन् नॅशनल शुगर फेडरेशनचा अंदाज आहे. दुसरीकडे, गेल्या काही काळात ऊसाच्या उपलब्धतेबरोबरच गुणवत्ताही खालावत चालली आहे. त्यामुळे सरासरी साखर उतारा 9.37%वरून 8.81%पर्यंत खालावला आहे.

यंदा गेल्या 8 वर्षांत प्रथमच देशांतर्गत मागणीपेक्षा साखर उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यातच साखर कारखानदारांच्या दबावामुळे मोदी सरकारने दहा लाख टन साखरेच्या निर्यातीस परवानगी दिली आहे. त्यामुळे बफर स्टॉक गृहीत धरला तरीही दिवाळीनंतरच्या काही महिन्यांत खुल्या बाजारात साखरेचे दर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. “श्री रेणुका”चे चतुर्वेदी यांनी मात्र साखरेची टंचाई तसेच दरवाढीची शक्यता फेटाळून लावली आहे. भारतात अगोदरच साखरेचे दर खालावलेले होते. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी साखर निर्यातीचा केंद्राने घेतलेला निर्णय योग्यच असल्याचेही चतुर्वेदी यांनी सांगितले.

Continue reading

ट्रम्प नरमले! भारतावरचे आयातशुल्क घटणार?

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध हे एका हाय-स्टेक डिप्लोमॅटिक ड्रामासारखे झाले आहेत, जिथे राष्ट्रीय हित आणि वैयक्तिक प्रतिष्ठा समोरासमोर आली होती. काही महिन्यांपूर्वी ट्रम्प प्रशासनाने भारतीय निर्यातीवर तब्बल 50% आयातशुल्क लादले होते, ज्यात 25% शुल्क व्यापार संतुलनासाठी आणि...

रशियाकडून युक्रेनमधील पायाभूत सुविधांवर ड्रोन्स, मिसाईल हल्ले

गेल्या 24 तासांत जागतिक पटलावर महत्त्वपूर्ण घडामोडींनी वेग घेतला असून अनेक देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियाने युक्रेनवर रात्रभरात शेकडो ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून मोठे हल्ले केले आहेत. आंतरराष्ट्रीय संघर्ष, वाढता राजनैतिक तणाव आणि गंभीर आर्थिक आव्हाने...

राज्यगीत मिळवून देणारे ‘मिस्टर डिपेंडेबल’ करताहेत ‘पार्थ घोटाळ्या’ची चौकशी!

₹ 1800 कोटींच्या सरकारी जमिनीची कवडीमोल भावाने विक्री? महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या याच प्रश्नावरून वादळ उठले आहे. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेल्या कंपनीला विकण्यात आलेला सरकारी भूखंड. या उच्चस्तरीय प्रकरणाच्या तपासासाठी...
Skip to content