Homeन्यूज अँड व्ह्यूज'महानंदा'च्या जागेवर उभे...

‘महानंदा’च्या जागेवर उभे राहणार टोलेजंग टॉवर?

मुंबईत गोरेगावच्या (पू) आरे कॉलनीला लागूनच महानंदा दुग्ध प्रकल्पाचे मुख्य कार्यालय व दूध डेअरी आहे. गेली अनेकवर्षे या आवारात असलेल्या दूध केंद्रावरून महानंदाची विविध दुग्धउत्पादने मिळत आहेत. दूधही तेथे मिळते. गोरेगाव (पू) नागरी वस्तीही वाढली असून सकाळी फेरफटका मारायला जाणारी मंडळी या केंद्रातूनच दूध घेऊन जाणे पसंत करतात. कारण बाहेरच्या कुणाला दूध घरी टाकायला सांगितले तर ती व्यक्ती दरपिशवीमागे किमान एक ते दीड रुपया जास्त चार्ज करते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या मुख्य प्रकल्पातून घेतलेले दूध नासत असल्याच्या (खराब होते) नागरिकांच्या तक्रारी आहेत. दूध नासल्याची तक्रार घेऊन केंद्रावर गेले असता नेहमीप्रमाणे केंद्रचालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर गिऱ्हाईकाने कार्यालयात जाऊन तक्रार करण्याचे सांगितल्यानंतर तो केंद्रचालक वरमला व त्याने दूध बदलून दिले.

योगायोगाची गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसांपासून हे दूधकेंद्र परप्रांतीयाने चालवायला घेतल्याचे बोलले जात आहे. याचबरोबर महानंदामध्ये टप्प्याटप्प्याने VRS / स्वेच्छानिवृत्ती देण्यात येत असल्याने कर्मचारी-कामगारवर्गात असंतोष आहे. त्यातच राज्यातल्या एका बड्या नेत्याने आपल्या अनुयायांना महानंदाचा कामगार वा कपातीचा प्रश्न माझ्याकडे आणू नका असे सूचित केल्याने कामगार हतबल झाले आहेत. संतापाची बाब म्हणजे कोणतीच कामगार संघटना याप्रकरणी आवाज उठवण्यास राजी नाही. येत्या एक-दोन वर्षात हा दुग्धप्रकल्प हळूहळू बंद पाडून त्याजागी टोलेजंग टॉवर्स उभे राहिले तर आश्चर्य वाटायला नको असे तेथील नागरिकांनी सांगितले.

छायाचित्र मांडणीः सोनाली वऱ्हाडे

Continue reading

मराठी पाऊल.. किती काळ गाणार ही रुदाली?

या आठवड्याच्या प्रारंभी कविवर्य महेश केळुस्कर यांच्या 'जय भवानी, जय शिवाजी' या राजकीय कादंबरीचे ऍड. राजेंद्र पै यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यानिमित्ताने डिम्पल प्रकाशन व बोधगया यांनी 'मराठी पाऊल पडते पुढे-मागे' या नेहमीच्याच विषयावर चर्चा ठेवली हॊती. कादंबरी प्रकाशित...

‘राडा’ संस्कृतीवरचा मुख्यमंत्र्यांचा उतारा होईल का पुरेसा?

कालच्या गुरुवारी राज्य विधिमंडळ परिसरात व नंतर विधिमंडळाच्या लॉबीत दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली झटापट तसेच हाणामारी लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर आमदारांचे 'कान' टोचावेच लागले. 'जनता म्हणते की, आमदार माजले आहेत' हे आपण आपल्या वर्तनावरून जनतेला दाखवून...

पुन्हा छत्रपतींचा एक नवा पुतळा प्रस्तावित!

दोनच दिवसांपूर्वी राज्य विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (पूर्वीचे बोरीबंदर) या रेल्वेसंकुलात छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार असल्याची घोषणा केली. बोरींबंदर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास होत आहे, अनेक नवीन गोष्टी उभ्या राहत आहेत हे मान्य आहे व...
Skip to content