Homeन्यूज अँड व्ह्यूजठाण्यातल्या धोबी आळीच्या...

ठाण्यातल्या धोबी आळीच्या तोंडावरील बेवारस गाडी कोणाची?

ठाणे शहराच्या (प) कोर्टनाका परिसर व टेम्भी नाका परिसराच्या आसपास धोबी आळी नावाची अगदी चिंचोळी गल्ली असल्याचे नवीन ठाणेकरांना माहीतच नसते. अगदी जुन्या म्हणजे ज्यांची वये पन्नासच्या वर आहेत त्यांना मात्र धोबी आळी आणि तेथील वेगळ्या प्रकारचा दंगा नक्की माहीतच असणार! जुन्या जमान्यातल्या ‘भाई’ लोकांना मात्र ही आळी नक्कीच ओळखीची वाटणार यात शंका नाही. भाईगिरी सोडून व्हाईट कॉलरवाले बनून काहींनी खाऊ गल्लीत टपऱ्या तर काहींना नशिबाने साथ दिली म्हणून बिल्डिंग लाईनमध्ये हात मारला आहे. (बिल्डिंग लाईनमध्ये आता हात मारणारे पूर्वीच्या भाईंकडे हरकाम्या होते हे सांगायला नकोच.) मात्र या बिल्डिंग लाईनला पैसा कोण पुरवतात हे मात्र उघड गुपित आहे.

तर अशा या चिंचोळ्या गल्लीत अगदी चिंचोळे उद्यान आहे आणि हे उद्यान ठाणे महापालिकेचे आहे. या उद्यानात जाण्यासाठी आळीच्या आकारमानाच्या दृष्टीने विचार केल्यास रस्ताही अगदीच बारकूडा आहे. उद्यानाची अवस्था अत्यन्त खराब आहे. खराब कसली दुर्दशाच आहे. अनेक ठिकाणी कचरा आहे. उद्यानात माती तर गेल्या अनेक वर्षांत टाकलेली नाही, असे एका नजरेतच समजते. मात्र, मातीचे भरमसाठ बिल दीड वर्षांनी नियमित अदा केले जाते असे समजले. संताप आणणारी गोष्ट पुढेच आहे. या उद्यानात कुणीही जाऊ नये वा ते प्रवेशद्वार कुणाला दिसू नये म्हणून एका महाभागाने टोपडं घालून एक मोटारगाडीच येथे उभी करून ठेवलेली आहे. थोडीथोडकी नाही तर तब्बल दीड-दोन वर्षे ही गाडी येथेच पार्क करून ठेवलेली आहे.. या गाडीबाबत विचारणा केली असता कुणीही बोलायला तयार नव्हते. ही बेवारस गाडी असल्यास ती सरकार दरबारी जप्त करून टाकावी व ज्या खात्याकडे गाडयांची कमी असेल त्यांना ही गाडी वापरू द्यावी, असे सुचवावेसे वाटते.

Continue reading

वर्णमुद्राचे ‘मोहोळ’- कौशल्य सारे रचनेत आहे!

ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले 'मोहोळ' हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती भेटल्या आणि 'भिडल्या' त्यांचे व्यक्तीचित्रण या पुस्तकात रेखाटलेले आहे. 'मोहोळ' वाचताना काही माणसांच्या आयुष्यात आपण...

अंबरीश मित्रा, दुर्गाबाईंच्या नावाने ‘हुंदका’ काढलास म्हणून….

अंबरीश मिश्रा, ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, अभ्यासू माणूस!आतापर्यंत कधीच कोणत्या वादात पडला नाही, पडण्याची गरजही नाही. माझ्या माहितीप्रमाणे तो काही काळ करंजिया यांच्या 'डेली' या इंग्रजी दैनिकात पत्रकारिता करत होता त्यावेळेपासून ओळख व मैत्री आहे. तो मुंबई महापालिकेत यायचा...

बांगलादेशींना हाकलायचंय? मग, वंदे भारतने दिल्ली गाठा…

सध्या मुंबई विभागीय विकास प्राधिकरणात म्हणेच MMRA मध्ये हो, बिचकून जाऊ नका; बांगलादेशी बेकायदा नागरिकांच्या विषयाला नको इतके महत्त्व दिले जात असल्याचे वाटत आहे. नको इतके इतक्यासाठीच म्हटले की, जी मंडळी बांगलादेशींविरुद्ध आवाज उठवत आहेत त्यांचेच सरकार केंद्रात व...
Skip to content