Homeन्यूज अँड व्ह्यूजठाण्यातल्या धोबी आळीच्या...

ठाण्यातल्या धोबी आळीच्या तोंडावरील बेवारस गाडी कोणाची?

ठाणे शहराच्या (प) कोर्टनाका परिसर व टेम्भी नाका परिसराच्या आसपास धोबी आळी नावाची अगदी चिंचोळी गल्ली असल्याचे नवीन ठाणेकरांना माहीतच नसते. अगदी जुन्या म्हणजे ज्यांची वये पन्नासच्या वर आहेत त्यांना मात्र धोबी आळी आणि तेथील वेगळ्या प्रकारचा दंगा नक्की माहीतच असणार! जुन्या जमान्यातल्या ‘भाई’ लोकांना मात्र ही आळी नक्कीच ओळखीची वाटणार यात शंका नाही. भाईगिरी सोडून व्हाईट कॉलरवाले बनून काहींनी खाऊ गल्लीत टपऱ्या तर काहींना नशिबाने साथ दिली म्हणून बिल्डिंग लाईनमध्ये हात मारला आहे. (बिल्डिंग लाईनमध्ये आता हात मारणारे पूर्वीच्या भाईंकडे हरकाम्या होते हे सांगायला नकोच.) मात्र या बिल्डिंग लाईनला पैसा कोण पुरवतात हे मात्र उघड गुपित आहे.

तर अशा या चिंचोळ्या गल्लीत अगदी चिंचोळे उद्यान आहे आणि हे उद्यान ठाणे महापालिकेचे आहे. या उद्यानात जाण्यासाठी आळीच्या आकारमानाच्या दृष्टीने विचार केल्यास रस्ताही अगदीच बारकूडा आहे. उद्यानाची अवस्था अत्यन्त खराब आहे. खराब कसली दुर्दशाच आहे. अनेक ठिकाणी कचरा आहे. उद्यानात माती तर गेल्या अनेक वर्षांत टाकलेली नाही, असे एका नजरेतच समजते. मात्र, मातीचे भरमसाठ बिल दीड वर्षांनी नियमित अदा केले जाते असे समजले. संताप आणणारी गोष्ट पुढेच आहे. या उद्यानात कुणीही जाऊ नये वा ते प्रवेशद्वार कुणाला दिसू नये म्हणून एका महाभागाने टोपडं घालून एक मोटारगाडीच येथे उभी करून ठेवलेली आहे. थोडीथोडकी नाही तर तब्बल दीड-दोन वर्षे ही गाडी येथेच पार्क करून ठेवलेली आहे.. या गाडीबाबत विचारणा केली असता कुणीही बोलायला तयार नव्हते. ही बेवारस गाडी असल्यास ती सरकार दरबारी जप्त करून टाकावी व ज्या खात्याकडे गाडयांची कमी असेल त्यांना ही गाडी वापरू द्यावी, असे सुचवावेसे वाटते.

Continue reading

ठाणे शाहरातल्या व्यापाऱ्यांचा देवपिता आहे तरी कोण?

ठाणे शहरातील सर्व सरकारी व नीमसरकारी यंत्रणानी राममारुती रोडवरील व्यापारी संघ तसेच ठाण्याच्या समस्त व्यापाऱ्यांना राममारुती रोडवरील पदपथ 'आंदण' दिलेले आहेत काय? हे जाहीरच करून टाकले तर बरे होईल. कारण, उठसुठ काही नियम आले की बंडाचा झेंडा हातात घेणारे...

तुमचे श्रीराम तर माझी सीतामैय्या! नितीशबाबूही लागले भजनी!!

सुमारे दोन वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीने उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे भव्यदिव्य राममंदिर बांधून देशातील मतदारांचे डोळे दिपवले होते, हे सर्वजण जाणतात! आता काही दिवसांतच बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहेत. नेमका हाच मुहूर्त साधून बिहारचे मुख्यमंत्री नितीशबाबूंनी 'जानकी जन्मस्थल...

‘त्या’ बेवारस बोटीबाबत जाबजबान्या झाल्या तरी कुणाच्या?

आजकाल राज्यात वा केंद्रात जरा काही खुट्ट वाजले की उच्चस्तरीय चौकशी वा विशेष दक्षता पथकाकडून चौकशी केली जावी, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांकडून केली जाते. याच धर्तीवर सुमारे तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्याच्या समुद्रकिनारी सापडलेल्या बेवारस बोट व त्यातील...
Skip to content