Homeडेली पल्ससुलेखनकार अच्युत पालव...

सुलेखनकार अच्युत पालव यांना जीवनगौरव पुरस्कार

प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार सोहळा बनारस हिंदू विश्वविद्यालयात नुकताच संपन्न झाला. आयआयटी, आयडीसी आणि बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या डिपार्टमेंट ऑफ अप्लाइड आर्ट यांनी आयोजित केलेल्या ‘टायपो डे’ या आंतरराष्ट्रीय टायपोग्राफी सेमिनारमध्ये सुलेखनातील सेवेचा गौरव म्हणून अच्युत पालव यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आयडीसीचे प्रा. रवि पोवय्या, प्रा. श्रीकुमार, बीएचयुचे प्रा. मनीष अरोरा, अजंता सेन तसेच देशातील आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे टायपोग्राफर आणि कॅलिग्राफर उपस्थित होते.

अच्युत पालव यांनी 1973 साली शिरोडकर हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक परशुराम नाबर यांच्या मार्गदर्शनाखाली फलक लेखनाला सुरूवात केली. पुढे त्यांनी जेजे इन्स्टिटयूट ऑफ अप्लाइड आर्टमध्ये प्रवेश घेतला. एका लेक्चरदरम्यान त्यांची ज्येष्ठ सुलेखनकार र. कृ. जोशी यांची भेट झाली आणि पालवांची अक्षरांकडे पाहण्याची दृष्टी बदलून गेली. चौथ्या अन पाचव्या वर्षासाठी लेटरिंग टायपोग्राफी अन कॅलिग्राफी स्पेशल विषय घेऊन प्रथम वर्गात ते उत्तीर्ण झाले.

पुढे उल्का ऍडव्हर्टायझिंगची संशोधन करण्याकरीता असलेली शिष्यवृत्ती मिळाली. मोडी लिपीवर भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर, इतिहासतज्ज्ञ डॉ. ग. ह. खरे, ज्येष्ठ चित्रकार, इतिहासाचे अभ्यासक द. ग. गोडसे आणि र. कृ. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली 2 वर्षं अभ्यास करून ‘मोडी लिपी – 15 ते 18वे शतक’ असा प्रबंध त्यांनी सादर केला. देवनागरी आणि मोडी लिपी यांच्या समन्वयातून मुक्त लिपी निर्माण केली आणि महाराष्ट्र राज्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त प्रसिद्ध केलेल्या “आपला महाराष्ट्र” या पुस्तकासाठी वापरली. याच दरम्यान आयआयटी, आयडीसी, पवई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये प्रात्याक्षिक करण्याची संधी मिळाली आणि पालवांच्या कामाने जगाचे लक्ष वेधून घेतले.

देवनागरी आणि मोडी लिपी शिकविण्याकरिता जर्मनी, लंडन आणि नेंदरलँडमधून आमंत्रण मिळाली आणि आज जगभर देवनागरीची पताका घेऊन ते फिरत आहेत. 3 महिन्यांपूर्वी 80 रशियन मुलांना त्यांनी देवनागरीचे धडे दिले. मॉस्कोसारख्या शहरात प्रदर्शन घडवून आणलं. 2007 साली काश्मीर ते कन्याकुमारी असा दौरा करून देशभरात सुलेखनाचं महत्त्व पटवून देण्यात पालवांचा मोठा हात आहे. कॅलिफेस्टसारखे भारतीय लिप्यांचे उत्सव त्यांनी सुरू केले आणि देशातील सुलेखनकारांना एकत्र आणले. भारत हा शेतीप्रधान देश असला तरी तो लिपीप्रधानदेखील आहे याची जाणीव आजच्या तरुण पिढीला करुन दिली. त्यामुळे देशातील लिपी आणि अक्षरसौंदर्य जगाला दिसेल. अच्युत पालव यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार तसेच मानसन्मान मिळाले असून जगातल्या बऱ्याच म्युझियमने त्यांच्या कामाची दखल घेतली आहे.

Continue reading

महाराष्ट्रात भरदिवाळीत अवकाळी पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्र आणि केरळ-कर्नाटक किनाऱ्यावरील लक्षद्वीप क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. पुढील 24 तासांत ते पश्चिम-वायव्येकडे म्हणजेच बंगालच्या उपसागरावर सरकण्याची आणि कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात...

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...
Skip to content