Homeडेली पल्ससुलेखनकार अच्युत पालव...

सुलेखनकार अच्युत पालव यांना जीवनगौरव पुरस्कार

प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार सोहळा बनारस हिंदू विश्वविद्यालयात नुकताच संपन्न झाला. आयआयटी, आयडीसी आणि बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या डिपार्टमेंट ऑफ अप्लाइड आर्ट यांनी आयोजित केलेल्या ‘टायपो डे’ या आंतरराष्ट्रीय टायपोग्राफी सेमिनारमध्ये सुलेखनातील सेवेचा गौरव म्हणून अच्युत पालव यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आयडीसीचे प्रा. रवि पोवय्या, प्रा. श्रीकुमार, बीएचयुचे प्रा. मनीष अरोरा, अजंता सेन तसेच देशातील आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे टायपोग्राफर आणि कॅलिग्राफर उपस्थित होते.

अच्युत पालव यांनी 1973 साली शिरोडकर हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक परशुराम नाबर यांच्या मार्गदर्शनाखाली फलक लेखनाला सुरूवात केली. पुढे त्यांनी जेजे इन्स्टिटयूट ऑफ अप्लाइड आर्टमध्ये प्रवेश घेतला. एका लेक्चरदरम्यान त्यांची ज्येष्ठ सुलेखनकार र. कृ. जोशी यांची भेट झाली आणि पालवांची अक्षरांकडे पाहण्याची दृष्टी बदलून गेली. चौथ्या अन पाचव्या वर्षासाठी लेटरिंग टायपोग्राफी अन कॅलिग्राफी स्पेशल विषय घेऊन प्रथम वर्गात ते उत्तीर्ण झाले.

पुढे उल्का ऍडव्हर्टायझिंगची संशोधन करण्याकरीता असलेली शिष्यवृत्ती मिळाली. मोडी लिपीवर भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर, इतिहासतज्ज्ञ डॉ. ग. ह. खरे, ज्येष्ठ चित्रकार, इतिहासाचे अभ्यासक द. ग. गोडसे आणि र. कृ. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली 2 वर्षं अभ्यास करून ‘मोडी लिपी – 15 ते 18वे शतक’ असा प्रबंध त्यांनी सादर केला. देवनागरी आणि मोडी लिपी यांच्या समन्वयातून मुक्त लिपी निर्माण केली आणि महाराष्ट्र राज्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त प्रसिद्ध केलेल्या “आपला महाराष्ट्र” या पुस्तकासाठी वापरली. याच दरम्यान आयआयटी, आयडीसी, पवई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये प्रात्याक्षिक करण्याची संधी मिळाली आणि पालवांच्या कामाने जगाचे लक्ष वेधून घेतले.

देवनागरी आणि मोडी लिपी शिकविण्याकरिता जर्मनी, लंडन आणि नेंदरलँडमधून आमंत्रण मिळाली आणि आज जगभर देवनागरीची पताका घेऊन ते फिरत आहेत. 3 महिन्यांपूर्वी 80 रशियन मुलांना त्यांनी देवनागरीचे धडे दिले. मॉस्कोसारख्या शहरात प्रदर्शन घडवून आणलं. 2007 साली काश्मीर ते कन्याकुमारी असा दौरा करून देशभरात सुलेखनाचं महत्त्व पटवून देण्यात पालवांचा मोठा हात आहे. कॅलिफेस्टसारखे भारतीय लिप्यांचे उत्सव त्यांनी सुरू केले आणि देशातील सुलेखनकारांना एकत्र आणले. भारत हा शेतीप्रधान देश असला तरी तो लिपीप्रधानदेखील आहे याची जाणीव आजच्या तरुण पिढीला करुन दिली. त्यामुळे देशातील लिपी आणि अक्षरसौंदर्य जगाला दिसेल. अच्युत पालव यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार तसेच मानसन्मान मिळाले असून जगातल्या बऱ्याच म्युझियमने त्यांच्या कामाची दखल घेतली आहे.

Continue reading

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...

भारत-पाक-अफगाणिस्तानच्या डोक्यावर हजार किमीचा असामान्य पाऊसपट्टा!

भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली हवामानप्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचा एक सलग पाऊसपट्टा या तीन देशांवर पसरला असून हवामानतज्ज्ञांनी याला अत्यंत असामान्य घटना म्हणून संबोधले आहे. साधारणपणे अशा हवामानप्रणाली वक्राकार...

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...
Skip to content