Tuesday, September 17, 2024
Homeन्यूज ॲट अ ग्लांसआंतरराष्ट्रीय कुस्तीतली विनेश...

आंतरराष्ट्रीय कुस्तीतली विनेश फोगटची निवृत्ती मागे?

भारताची कुस्तीपटू विनेश फोगट, आपली आंतरराष्ट्रीय कुस्तीतून घेतलेली निवृत्ती मागे घेण्याची शक्यता असून ती आणखी दोन ऑलिम्पिक स्पर्धा खेळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १०० ग्रॅम वजन वाढल्यामुळे अंतीम सामन्यातून बाद ठरल्यानंतर विनेश फोगटने आंतरराष्ट्रीय कुस्तीतून निवृत्ती घोषित केली होती. मात्र, आज तिने एक्सवर एक पोस्ट

ऑलिम्पिक

टाकून ट्विट केले की, माझ्या शरीरात आजही कुस्ती जिवंत आहे आणि २०३२पर्यंत ती कधीही उफाळू शकेल. माझ्यातली कुस्ती जिवंत आहे आणि ती २०३२पर्यंत खेळू शकेल, असे तिने म्हटले आहे. तिच्या याच पोस्टमुळे ती आपल्या आंतरराष्ट्रीय कुस्तीतून घेतलेली निवृत्ती मागे घेऊन पुन्हा नव्या स्पर्धेची तयारी करेल, असे जाणकारांना वाटते.

निवृत्ती जाहीर केल्यानंतरही विनेशने आपण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकेपर्यंत ५० किलो वजनी गटात बसलो होतो, त्यामुळे आपल्याला संयुक्तपणे रौप्यपदक द्यावे, अशी मागणी आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे केली होती. मात्र, तिचे अपिल लवादाने फेटाळले. त्यानंतर लगेचच विनेशने, अजून आपल्यातली कुस्ती जिवंत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे कुस्तीशौकिनांना विनेश फोगटचा आंतरराष्ट्रीय संग्राम निश्चितच पाहयला मिळेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Continue reading

बुधवारी खुली राहणार भायखळ्यातली ‘राणीची बाग’!

मुंबईतल्या भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (म्हणजेच पूर्वीची राणीची बाग) येत्या बुधवारी, १८ सप्टेंबरला जनतेकरिता खुले राहणार आहे. त्याऐवजी हे उद्यान दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, १९ सप्टेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून प्रसिद्ध...

यापुढे ‘बाबू’ ठरवणार, सणवार कधी साजरे करायचे ते?

यापुढे मुहूर्त, रितीरिवाज, चालीरीती, परंपरा अशा सर्व बाबींना तिलांजली दिली जाणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या मनात येईल त्याप्रमाणे या महाराष्ट्रातील जनता सण, उत्सव साजरे करेल असे एकूण चित्र दिसते. आज होणारी ईद असो किंवा गणेशोत्सव, सरकारी बाबू म्हणतील त्याप्रमाणे हे...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोलांटउडी! 

दारू घोटाळ्यात अडकलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या अटींवर कोणतेही भाष्य न करता जनतेचा कौल मागण्यासाठी आपण मुख्यमंत्रीपद सोडत असल्याचा आव आणत त्यांनी जनतेच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी...
error: Content is protected !!
Skip to content