Homeन्यूज ॲट अ ग्लांसआंतरराष्ट्रीय कुस्तीतली विनेश...

आंतरराष्ट्रीय कुस्तीतली विनेश फोगटची निवृत्ती मागे?

भारताची कुस्तीपटू विनेश फोगट, आपली आंतरराष्ट्रीय कुस्तीतून घेतलेली निवृत्ती मागे घेण्याची शक्यता असून ती आणखी दोन ऑलिम्पिक स्पर्धा खेळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १०० ग्रॅम वजन वाढल्यामुळे अंतीम सामन्यातून बाद ठरल्यानंतर विनेश फोगटने आंतरराष्ट्रीय कुस्तीतून निवृत्ती घोषित केली होती. मात्र, आज तिने एक्सवर एक पोस्ट

ऑलिम्पिक

टाकून ट्विट केले की, माझ्या शरीरात आजही कुस्ती जिवंत आहे आणि २०३२पर्यंत ती कधीही उफाळू शकेल. माझ्यातली कुस्ती जिवंत आहे आणि ती २०३२पर्यंत खेळू शकेल, असे तिने म्हटले आहे. तिच्या याच पोस्टमुळे ती आपल्या आंतरराष्ट्रीय कुस्तीतून घेतलेली निवृत्ती मागे घेऊन पुन्हा नव्या स्पर्धेची तयारी करेल, असे जाणकारांना वाटते.

निवृत्ती जाहीर केल्यानंतरही विनेशने आपण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकेपर्यंत ५० किलो वजनी गटात बसलो होतो, त्यामुळे आपल्याला संयुक्तपणे रौप्यपदक द्यावे, अशी मागणी आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे केली होती. मात्र, तिचे अपिल लवादाने फेटाळले. त्यानंतर लगेचच विनेशने, अजून आपल्यातली कुस्ती जिवंत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे कुस्तीशौकिनांना विनेश फोगटचा आंतरराष्ट्रीय संग्राम निश्चितच पाहयला मिळेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content