Friday, March 14, 2025
Homeडेली पल्सभास्कर जाधव आणि...

भास्कर जाधव आणि आशिष शेलार यांच्यात हमरीतुमरी..

मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचा प्रभाग करण्याबद्दलचे विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकावरील चर्चेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भास्कर जाधव आणि भारतीय जनता पार्टीचे आशिष शेलार यांच्यात हमरीतुमरी आणि खडाजंगी झाली.

भास्कर जाधव यांची अवस्था नाचता येईना, अंगण वाकडे, अशी झाली आहे, अशी शेरेबाजी शेलार यांनी केली तर भास्कर जाधव यांनी शेलार यांना अपशब्द वापरले. कायद्यावर, विधेयकावर किती चर्चा झाली, हा मुद्दा उपस्थित करणाऱ्या भास्कर जाधव यांनी तुमचे नेते मुख्यमंत्री असताना मुळात अधिवेशनाचे कामकाज किती दिवस झाले, हे तपासून बघावे, असे आव्हान शेलार यांनी दिले. त्यावर जाधव प्रक्षुब्ध झाले.

मंत्री उदय सामन्त यांनी त्याबद्दलचे विधेयक मांडले. त्यावर चर्चा करताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केवळ महापालिकाच नव्हे तर नगरपरिषदांसह सर्व स्थानिक संस्थांमध्ये हा बदल का करत नाही, असा सवाल केला. केवळ राजकीय स्वार्थासाठी निवडणुकांवर डोळा ठेवून हा निर्णय घेतला जात आहे, अशी टीका करत महापालिकांच्या निवडणुका कधी घेणार, असा सवालही त्यांनी केला. तसेच, न्यायालयात जाऊन या रखडलेल्या निवडणुका लवकरात लवकर घेण्यासाठी प्रयत्न करणार का, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला.

हे विधेयक आणण्यामागचे कारण काय, हेतू काय, हे मंत्रिमहोदयांनी स्पष्ट करायला हवे होते. पण, त्यांनी फक्त पूर्वी तीन प्रभाग होते, ते आता चार करण्यासाठी हे विधेयक आणले आहे, असे सांगितले. पण, मुळात हे विधिमंडळ कायदे करण्यासाठीचे आहे आणि राज्यातील जनतेला घटनेनुसार अधिकार प्रदान आम्ही लोकप्रतिनिधी कायदे करून करत असतो. त्यामुळे विधिमंडळाचे अधिवेशन हे आमदारांच्या फायद्यापेक्षा जनतेला काय फायदा करून देतो, यासाठी असते. त्यामुळे आज अधिवेशनाचा समारोप होईल तेव्हा किती काळ सभागृह चालले, काय कामकाज झाले, याचा आढावा अध्यक्ष मांडतील. पण, समारोपाच्या भाषणात आज अध्यक्षमहोदयांनी विधिमंडळाच्या कामकाजात प्रत्यक्ष कायदे करण्यासाठीच्या चर्चेला किती वेळ मिळाला, हेही सांगावे, असे भास्कर जाधव म्हणाले.

भास्कर

भास्कर जाधव यांनी केवळ राजकीय भमिकेतून हे विधेयक आणले गेले आहे, अशी टीका केली. शेलार यांनी लोकशाहीत सातत्याने बदल हीच गोष्ट अपेक्षित आहे, याकडे लक्ष वेधले. नगरविकासमंत्री असताना एकनाथ शिन्दे यांना तत्कालीन मुख्यमंत्री आणि त्यांच्या चिरंजीवांनी काम करू दिले नाही, हे सांगितलेले आहे. त्यामुळे एकनाथ शिन्दे आज मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्यातील स्थितीचा आढावा पुन्हा घेतल्यानंतर त्यांना मुंबई वगळता सर्व महापालिकांमध्ये चार लोकप्रतिनिधींचा प्रभाग असावा, असे लक्षात आले तर ते करणे योग्यच आहे, असे सांगून शेलार यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरे यांनी दीर्घकालीन धोरण आखून शहरांचे विकास व्हावेत, असे सांगत या विधेयकाला विरोध केला. मंत्री उदय सामन्त यांनी सर्व सदस्यांच्या आक्षेपांना उत्तर देत विधेयकाला पाठिंबा देण्याची विनंती केली. त्यानंतर विधेयक मंजूर करण्यात आले.

विरोधकांचा सभात्याग

अंतरिम अर्थसंकल्पावरील चर्चा शुक्रवारी दुपारी १२.२५ला अजित पवार यांच्या उत्तरानंतर संपली. त्यावेळी अर्थमंत्री पवार यांच्या उत्तरावर असमाधान व्यक्त करत विरोधी पक्षांनी सभात्याग केला. ईडी सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत विरोधकांनी अर्ध्या मिनिटासाठी सभात्याग केला. 

Continue reading

‘शातिर..’मधून अभिनेत्री रेश्मा वायकर करणार पदार्पण

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या महिलाप्रधान चित्रपटाला चांगले दिवस आल्याचे दिसते. मात्र मराठीत महिलाप्रधान सस्पेन्स थ्रिलर प्रकारातील चित्रपटांचा अभाव आहे. आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रीयांस आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या वतीने ‘शातिर THE BEGINNING’ या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या...

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...
Skip to content