Homeचिट चॅटपुराणिक स्मृती क्रिकेटः...

पुराणिक स्मृती क्रिकेटः वेंगसरकर फाउंडेशन विजेता

क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने विजेतेपद पटकाविले. निर्णायक सामन्यात दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने सलामी फलंदाज सारा सामंत (४५ धावा) व कप्तान पूनम राऊत (नाबाद ४७ धावा) यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे एमआयजी क्रिकेट क्लबचा ८ विकेटने पराभव करून अजिंक्यपदाला गवसणी घातली.

माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंतिम  सामन्यात दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने नाणेफेक जिंकून एमआयजी क्रिकेट क्लबला प्रथम फलंदाजी दिली. प्रारंभ २ बाद १५ धावा असा निराशाजनक होऊनही मिताली म्हात्रे (५२ चेंडूत ५२ धावा, ५ चौकर) व महेक मिस्त्री (३० चेंडूत २७ धावा, ४ चौकार) यांनी डाव सावरला. त्यामुळे एमआयजी क्लबने मर्यादित २० षटकात ६ बाद १२० धावांचा टप्पा गाठला. मध्यमगती गोलंदाज सिद्धी पवारने २६ धावांत ३ बळी घेतले. सलामी फलंदाज सारा सामंत (२२ चेंडूत ४५ धावा, ९ चौकार) व अष्टपैलू पूनम राऊत (३४ चेंडूत नाबाद ४७ धावा, ८ चौकार) यांच्या फटकेबाजीमुळे दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने विजयी लक्ष्य १३.५ षटकात २ बाद १२३ धावा झळकावून साध्य केले. परिणामी एमआयजी क्रिकेट क्लबला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

अंतिम सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार वेंगसरकर फाउंडेशनची कप्तान पूनम राऊतने पटकाविला. माजी कसोटीपटू करसन घावरी यांच्या हस्ते बक्षीस समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, सेक्रेटरी अभय हडप, खजिनदार अरमान मलिक, जॉईंट सेक्रेटरी दीपक पाटील तसेच अपेक्स कौन्सिल मेंबर, विजय येवलेकर, संजू खानोलकर, सुनील रामचंद्रन, सुनील पाटील, महेश शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

Continue reading

राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज, रविवारी मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल...

मुंबईत रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर!

येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद निश्चित मिळेल. रिपब्लिकन पक्षाला उत्तर मुंबई जिल्ह्यात किमान 7 जागा आणि संपूर्ण मुंबईत किमान 24 जागा महायुतीने सोडाव्यात असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडे देण्यात यावा. त्यातील काही जागा रिपब्लिकन पक्ष...

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...
Skip to content