Homeचिट चॅटपुराणिक स्मृती क्रिकेटः...

पुराणिक स्मृती क्रिकेटः वेंगसरकर फाउंडेशन विजेता

क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने विजेतेपद पटकाविले. निर्णायक सामन्यात दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने सलामी फलंदाज सारा सामंत (४५ धावा) व कप्तान पूनम राऊत (नाबाद ४७ धावा) यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे एमआयजी क्रिकेट क्लबचा ८ विकेटने पराभव करून अजिंक्यपदाला गवसणी घातली.

माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंतिम  सामन्यात दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने नाणेफेक जिंकून एमआयजी क्रिकेट क्लबला प्रथम फलंदाजी दिली. प्रारंभ २ बाद १५ धावा असा निराशाजनक होऊनही मिताली म्हात्रे (५२ चेंडूत ५२ धावा, ५ चौकर) व महेक मिस्त्री (३० चेंडूत २७ धावा, ४ चौकार) यांनी डाव सावरला. त्यामुळे एमआयजी क्लबने मर्यादित २० षटकात ६ बाद १२० धावांचा टप्पा गाठला. मध्यमगती गोलंदाज सिद्धी पवारने २६ धावांत ३ बळी घेतले. सलामी फलंदाज सारा सामंत (२२ चेंडूत ४५ धावा, ९ चौकार) व अष्टपैलू पूनम राऊत (३४ चेंडूत नाबाद ४७ धावा, ८ चौकार) यांच्या फटकेबाजीमुळे दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने विजयी लक्ष्य १३.५ षटकात २ बाद १२३ धावा झळकावून साध्य केले. परिणामी एमआयजी क्रिकेट क्लबला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

अंतिम सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार वेंगसरकर फाउंडेशनची कप्तान पूनम राऊतने पटकाविला. माजी कसोटीपटू करसन घावरी यांच्या हस्ते बक्षीस समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, सेक्रेटरी अभय हडप, खजिनदार अरमान मलिक, जॉईंट सेक्रेटरी दीपक पाटील तसेच अपेक्स कौन्सिल मेंबर, विजय येवलेकर, संजू खानोलकर, सुनील रामचंद्रन, सुनील पाटील, महेश शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content