Homeएनसर्कल'वीरा'ने वाचवले नऊ...

‘वीरा’ने वाचवले नऊ मच्छिमारांचे प्राण

बोटीला आग लागल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या नऊ मच्छिमारांना आंध्र किनारपट्टीवर गस्तीवर असलेल्या भारतीय तटरक्षक जहाज “वीरा”ने तातडीने पाऊले उचलत नुकतेच वाचवले. 5 एप्रिल 2024 रोजी या बोटीला आग लागली होती. त्यानंतर या बोटीला जलसमाधी मिळाली होती.

आयसीजीएस वीराला विशाखापट्टणम बंदरापासून सुमारे 65 आणि नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या भारतीय मासेमारी नौका (आयएफबी) दुर्गा भवानीला आग लागल्याचा जवळच्या मासेमारी बोटीकडून रेडिओ संदेश मिळाला होता. आयएफबी दुर्गा भवानी ही आंध्र नोंदणीकृत बोट 26 मार्च 2024 रोजी काकीनाडा बंदरातून नऊ कर्मचाऱ्यांसह निघाली होती. 5  एप्रिलला बोटीला आग लागल्याने जहाजावरील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. सर्व नऊ मच्छिमारांनी जीव वाचण्यासाठी पाण्यात उडी मारली. परंतु काहींना गंभीर दुखापत झाली. स्फोटामुळे नुकसान झालेली मासेमारी बोट काही मिनिटांतच त्या ठिकाणी बुडाली. आग आणि स्फोटाची माहिती जवळच्या बोटीद्वारे तटरक्षक दलाच्या जहाजाला देण्यात आली.

परिस्थितीची निकड ओळखून आयसीजीएस वीरा वेगाने पुढे निघाले आणि वाचलेल्यांना मदत देण्यासाठी काही तासांतच त्या ठिकाणी पोहोचले. सर्व नऊ जणांना तटरक्षक दलाच्या जहाजात हलवण्यात आले तिथे वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर तातडीने प्रथमोपचार केले. दरम्यान, तटरक्षक दलाच्या जिल्हा मुख्यालय क्रमांक 6ने जेडी फिशरीज विशाखापट्टणम यांच्या समन्वयाने आयएफबीच्या गंभीर जखमी कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी वैद्यकीय पथकांसह रुग्णवाहिकांची तातडीने व्यवस्था केली. सर्व जखमी मच्छिमारांना पुढील उपचारांसाठी विशाखापट्टणम येथील किंग जॉर्ज रुग्णालयात हलवण्यात आले.

आयसीजी जहाजाने दिलेल्या जलद प्रतिसादामुळे संपूर्ण बचाव मोहीम सहा तासांच्या अल्प कालावधीत पूर्ण झाली. भारतीय तटरक्षक दल ही समुद्रातील मच्छिमारांना मदत पुरवणारी प्रमुख संस्था आहे तसेच समुद्रात शोध आणि बचाव कार्यासाठीची राष्ट्रीय समन्वय संस्था आहे.

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content