Homeचिट चॅटजवानांच्या कुटुंबियांना विडीसीएफचा...

जवानांच्या कुटुंबियांना विडीसीएफचा हात..

प्रत्येक व्यक्तिला आपले कुटुूंब प्रिय असते. परंतु सैन्यदलातील व्यक्तींना दोन कुटुंबे असतात. पहिले स्वत:चे कुटूंब तर देशातील जनता हे दुसरे कुटूंब.जेव्हा ते सैन्यदलात भरती होतात, तेेव्हा ते आपल्या कुटुंबापेक्षा देशसेवेला अधिक प्राधान्य देत आपले सर्वस्व अर्पण करतात. आपल्या देशाचे रक्षण करताना जेव्हा हेच जवान शहीद होतात अथवा गंभीर जखमी होतात तेव्हा त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात होतो. सरकार आपल्या परीने अशा कुटुंबांच्या पाठीशी उभी राहते. परंतु सरकारच्या काही मर्यादा आहेत. त्यामुळे शहीद व गंभीर जायबंदी झालेल्या कुटुंबांची स्वप्ने त्यांच्या कुटुंबाचे घटक समजुन पूर्ण करण्याचा संकल्प ‘विनायक दळवी चॅरीटेबल फाऊंडेशन’ने (विडीसीएफ) केला आहे. ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ट्रस्टकडून ‘लाख’ मोलाची साथ मिळणार आहे. ट्रस्टला प्रतीक्षा आहे अशा कुटुंबांच्या माहितीची..

सैन्यदलातील जवानांबरोबर लग्नगाठ बांधताना नवविवाहिता अनेक स्वप्नं उराशी बाळगून असते. लग्नाला काही दिवस होत नाहीत तोच जवानाला सीमेवर देशरक्षणासाठी कर्तव्यावर हजर राहवे लागते. गेल्या काही वर्षांमध्ये सीमेवरील घुसखोरी, अतिरेकी हल्ले यांचा सामना करताना अनेक तरुण जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. शहीद झालेल्या अशा सैनिकांची आपल्या कुटुंबाप्रतीची स्वप्ने अपूर्ण राहतात. मग आई-वडिलांची सेवा, पत्नी व मुलांप्रती कर्तव्य असो, ही शहिदांची स्वप्ने काही अंशी का असेना पूर्ण करण्याचा विडीसीएफचा संकल्प आहे.

स्वरमानस, या संस्थेतर्फे मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे एका गाण्याच्या कार्यक्रमाचे व स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा झालेला ‘लाख’ मोलाचा निधी मानसी केळकर यांनी विनायक दळवी चॅरीटेबल फाऊंडेशनकडे सुपूर्द केला. या निधीद्वारे अशा कुटुंबियांची एखादी ईच्छा पूर्ण करुन आनंद देण्याचा विडीसीएफचा प्रयत्न आहे.

योग्य विनियोग व्हावा यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयात अर्जाचे नमुने व माहिती 13 फेब्रुवारीच्या पत्राद्वारे मेल केली गेली असून 15 मार्च अंतिम तारीख ठरविण्यात आली होती. office@dalvie-foundarion.org ह्या इमेल आयडीवर आपला अर्ज विहित नमुन्यात पोहोचणे अपेक्षित आहे. तेही शक्‍य न झाल्यास कुटुंबाने ९८२०७५७२७४ ह्या नंबरवर WhatsApp मेसेजद्वारे माहिती घेतल्यास शंका निरसन केले जाईल असे विडीसीएफचे अध्यक्ष विनायक दळवी यांनी कळविले आहे. 

Continue reading

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६...

देश चालवणे ही मोदींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले...

पेट्रोल-डिझेलची दरवाढ अटळ?

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि मध्य-पूर्वेतील तणावामुळे भारतातील सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांच्या तोट्यात मोठी वाढ झाली आहे. इंडियन ऑईल, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांसारख्या कंपन्यांना सध्या दरमहा सुमारे ३०,००० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे....
Skip to content