Homeचिट चॅटयेत्या सोमवारपासून बोरीवलीत...

येत्या सोमवारपासून बोरीवलीत वसंत व्याख्यानमाला

दिवंगत ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथे गेली ४२ वर्षे चालविलेली जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला त्यांच्या निधनानंतर यंदाही, ४३व्या वर्षी सुरू राहणार आहे. सोमवार, २८ एप्रिल ते बुधवार, ३० एप्रिल असे तीन दिवस ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. याच व्याख्यानमालेत मंगला खाडिलकर, रुचिरा दिघे आणि हेमंत पाटकर यांना जय महाराष्ट्र नगर भूषण, शारदा आणि प्रेरणा हे तीन पुरस्कारसुद्धा समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.

सोमवार, २८ एप्रिलला या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प जीवनविद्या मिशनचे व्याख्याते प्रा. शैलेश रेगे ‘मनाचे व्यवस्थापन’ या विषयावर गुंफणार असून मंगळवार, २९ एप्रिलला हत्तीमित्र आनंद शिंदे ‘एक संवाद हत्तीशी’ या विषयावर अत्यंत वेगळा विषय मांडणार आहेत. सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या बॅंकिंग क्षेत्रातील अडचणीसंदर्भात ‌बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ विश्वास उटगी ‘आज अर्थव्यवस्थेत आपले उत्पन्न, खर्च, गुंतवणूक व बचत सुरक्षित आहे का?’ या विषयावर बुधवार, ३० एप्रिलला मार्गदर्शन करणार आहेत. एकता विनायक चौक, टाटा पॉवर हाऊससमोर, जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथे रोज सायंकाळी ७.३० वाजता ही वसंत व्याख्यानमाला होणार आहे.

विजय वैद्य यांनी सुरु केलेल्या परंपरेप्रमाणे यंदा जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार मागाठाणे मित्र मंडळाचे खंदे कार्यकर्ते हेमंत पाटकर यांना, शारदा पुरस्कार आपल्या सुमधूर वाणीने रसिकांना गेली ४५ वर्षे मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ सुसंवादिनी मंगला खाडिलकर यांना तसेच प्रेरणा पुरस्कार बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या मनमिळावू, मितभाषी अध्यक्षा रुचिरा दिघे यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. ही व्याख्यानमाला विनामूल्य असून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून याचा आनंद घ्यावा, असे आवाहन कार्यकर्त्यांच्या वतीने सचिन वगळ आणि प्रा. नयना रेगे यांनी केले आहे. विजय वैद्य यांनी सुरू केलेली ही वसंत व्याख्यानमाला यापुढेही सुरू ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन वैद्य कुटुंबियांनी दिले आहे.

Continue reading

‘ब्रँड एकनाथ’ला मान्यता! मोदींनी दिले तब्बल 2 तास!!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, 7-लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या या...

बिहारमध्ये महागठबंधनचे आमदारच लापता! नितीश कुमार राज्यसभेत!!

देशाच्या दहा राज्यांमधील 37 राज्यसभा जागांसाठी सोमवारी मतदान झाले. यापैकी 26 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. खरी चुरस बिहारच्या 5 जागा, ओडिशातील 4 जागा आणि हरियाणा (2 जागा) या तीन राज्यांपुरतीच उरली. या 2026 राज्यसभा निवडणुकीत 'एनडीए'चा देशभर...

ओपिनियन पोल: ममतांचा चौथा विजय निश्चित; तामिळनाडूत स्टालिनना धक्का!

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आणि त्याचदिवशी मॅट्रिज-आयएएनएस या संस्थेने या पाचही राज्यांसाठी आपला बहुप्रतिक्षित ओपिनियन पोल जाहीर केला. त्यानुसार, ममतांचा चौथा विजय जवळपास निश्चित मानला जात...
Skip to content