Homeमुंबई स्पेशलमंगळवारी सकाळी फक्त...

मंगळवारी सकाळी फक्त विद्यार्थी व शिक्षकांचे लसीकरण!

कोविड १९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत, मुंबई महापालिकेच्या वतीने मुंबईतील सर्व शासकीय आणि पालिका कोविड १९ लसीकरण केंद्रांवर, सोमवारी, २७ सप्टेंबरला सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत, फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र राबवले जाणार आहे. तसेच, मंगळवारी, २८ सप्टेंबरला सकाळी ९ ते दुपारी २ या पहिल्या सत्रात, शिक्षक तसेच १८ वर्षे व त्यावरील वयाचे विद्यार्थी यांचे कोविड लसीकरण होईल. याचदिवशी दुसऱ्या सत्रात म्हणजे दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत, दुसरी मात्रा (डोस) देय असणाऱ्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या दुपारच्या सत्रात कोणालाही कोविड लसीचा पहिला डोस दिला जाणार नाही, असे मुंबई महापालिकेने जाहीर केले आहे.

महिला तसेच शिक्षक व विद्यार्थी यांना पहिली किंवा पहिली मात्रा घेऊन विहित कालावधी पूर्ण झाला असेल तर (कोविशिल्‍ड संदर्भात पहिल्या डोसनंतर ८४ दिवस आणि कोव्‍हॅक्‍सिन असल्यास पहिल्या डोसनंतर २८ दिवस पूर्ण झाल्‍यास) दुसरी मात्रादेखील घेता येईल. त्याचप्रमाणे, दुसरी मात्रा घेण्यासाठी येणाऱ्यांना, पहिला डोस घेतला असल्याचे प्रमाणपत्रदेखील सोबत आणणे आवश्यक असेल.

या दोन्ही दिवशी, मुंबईतील सर्व शासकीय व महापालिका लसीकरण केद्रांवर थेट येऊन (वॉक इन) संबंधित घटकातील पात्र नागरिकांना लस घेता येईल. त्यासाठी ऑनलाईन पूर्वनोंदणीची आवश्यकता नाही. पात्र लाभार्थ्यांनी येताना, शासकीय ओळखपत्र आणणे आवश्यक असेल. तसेच शिक्षक व विद्यार्थी यांनी शैक्षणिक संस्थांचे ओळखपत्रदेखील सोबत आणणे आवश्यक आहे.

कोविड-१९ विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी मुंबई महापालिकादेखील प्रयत्नशील आहे. त्यासाठी या विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. कोविड-१९चा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने कोविड लसीचे दोन्ही डोस घेऊन लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. सबब, पात्र नागरिकांनी या सत्रांचा जास्‍तीतजास्‍त प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहनही पालिका प्रशासनाने केले आहे.

Continue reading

निसर्ग वाचवण्यासाठी अनेक हातांची गरज!

देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेल्या जंगलाचाही विपर्यास होत आहे. झाडे, नद्या आणि निसर्ग वाचवण्यासाठी अनेक हातांची गरज आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी निसर्ग अभ्यासक श्रीरंग फडके लिखित 'रानसावल्या' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात व्यक्त केले. निसर्ग...

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...
Skip to content