Homeडेली पल्सआरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या...

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या लेखी परीक्षा २२ मार्चपासून

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी – २०२४ सत्रातील टप्पा-४च्या लेखी परीक्षेला येत्या शनिवारपासून, २२ मार्चपासून प्रारंभ होत आहेत. या परीक्षेत वैद्यकीय विद्याशाखेतील दुसऱ्या वर्षाच्या (Old /2019 Supplementary), 1 year BAMS/BUMS (2021) and BHMS (CBDC-2022) या अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षांचे संचलन २२ मार्च २०२५ ते ०९ एप्रिल २०२५दरम्यान होणार आहे.

राज्यातील एकूण १०४ परीक्षा केंद्रावर संचलीत होणार आहे. सदर परीक्षेसाठी उक्त अभ्यासक्रमांचे एकूण १६४१४ विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. हिवाळी-२०२४ टप्पा-३मधील तृतीय वर्ष एम.बी.बी.एस. व अंतिम वर्ष एम.बी. बी.एस. अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका प्रायोगिक तत्त्वावर (Pilot Basis) ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षाकेंद्रावर पेपर सुरु होण्याआधी पाठविण्यात आलेल्या आहेत. तसेच ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करुन तपासण्याचे कार्यही यशस्वीरीत्या केलेले आहे. हिवाळी २०२४ टप्पा-४ परीक्षांच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षाकेंद्रावर परीक्षेच्या दिवशी पाठवून, लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेंचेही संपूर्ण डीजीटलायझेशन करण्याचा मानस असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले.

वैद्यकीय विद्याशाखेच्या दुसऱ्या वर्षातील (Old /2019 Supplementary), 1 year BAMS/BUMS (2021) and BHMS (CBDC-2022) या अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षाकेंद्रावर परीक्षेच्या दिवशी पाठविण्यात येणार असल्याने सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षाकेंद्रावर एक तास अगोदर म्हणजेच सकाळ सत्रासाठी सकाळी ९.०० वाजता व दुपारच्या सत्रासाठी दुपारी १.०० वा. परीक्षाकेंद्रावर हजर राहणे आवश्यक असल्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content