Homeटॉप स्टोरीदेशात समान नागरी...

देशात समान नागरी कायदा व वन नेशन, वन इलेक्शन…

भारतीय जनता पार्टीचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयात पक्षाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. या जाहीरनाम्याला भाजपाने संकल्पपत्र असे नाव दिले असून त्यात सत्तेवर आल्यानंतर देशात समान नागरी कायदा लागू करण्याची तसेच देशात लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका एकाचवेळी घेण्याची ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची घोषणा केली.

समान नागरी

भाजपाच्या संकल्पपत्रातले महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे-

  1. मुद्रा योजनेतील कर्जांची लिमिट 10 लाखांवरुन 20 लाख.
  2. लखपती दीदी योजनेचा विस्तार करून 3 कोटी महिलांना लखपती बनवणार.
  3. आयुष्मान भारत योजना सर्व वर्गातील 70 वर्षे वयावरील नागरिकांना लागू करणार.
  4. पीएम आवास योजनेत नवीन 3 कोटी घरे बनवणार.
  5. एकलव्य शाळांची संख्या वाढवणार.
  6. तमिळ भाषा जगातील सर्वात प्राचीन भाषा आहे. तिचा विस्तार करणार.
  7. महिलांना अनेक क्षेत्रात कौशल्यविकास प्रशिक्षण देणार.
  8. टूरिझम क्षेत्राला बळ देणार. रोजगार वाढणार. अनेक क्षेत्राना संधी.
  9. इको टूरिजममध्ये आदिवासींना संधी.
  10. सोशल इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणार.
  11. फिजिकल व डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणार.
  12. इंडस्ट्री 4.0साठी अनेक उपाय.
  13. नवीन रोजगार संधी उपलब्ध करुन देणार.
  14. वंदे भारत- 3 प्रकार स्लीपर, चेअर, मेट्रो.
  15. बुलेट ट्रेन- उत्तर, दक्षिण, पूर्व भारतात करणार.
  16. देशाला प्रत्येक क्षेत्रात आत्मनिभर करणार. एनर्जी, खाद्यतेल प्राधान्य.
  17. सूर्यघर योजनेचा विकास.
  18. ग्रीन एनर्जी हब, फार्मा हब, इलेक्ट्रॉनिक हब, सरंक्षण आयुधे हब.
  19. विश्वबंधू भारत. सर्व जगातील मानवतेचं रक्षण ही भारताची जबाबदारी.
  20. वन नेशन, वन इलेक्शन.
  21. समान नागरी कायदा.
  22. भ्रष्टाचारविरोधी मोहीम चालूच राहणार.
  23. देशात ऑलिम्पिकचे आयोजन करणार.

Continue reading

महाराष्ट्रात कोरडे हवामान सुरू!

आयएमडी बुलेटिननुसार, ओदिशा आणि छत्तीसगडच्या काही भागांमधून आणि ईशान्येकडील राज्यांच्या उर्वरित भागातूनही मान्सून माघारला आहे. आतापर्यंत देशाच्या एकूण परतीच्या क्षेत्रापैकी 85 टक्के भागातून मान्सून परतलेला आहे. पुढील 2 दिवसांत देशाच्या उर्वरित भागातून मान्सून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. महाराष्ट्रातून मान्सून...

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...
Skip to content