Homeचिट चॅटश्री स्वामी समर्थ...

श्री स्वामी समर्थ मंदिरात तुलसी विवाह संपन्न!

मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात तुलसी विवाह शनिवारी पारंपरिक पद्धतीने मंगलअष्टकाच्या सुरात, भक्त आणि नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. महेश नाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरातील पुजाऱ्यांनी धार्मिक विधी पार पाडले.

मंदिरावर रंगबेरंगी दिव्यांच्या आकर्षक रोषणाईबरोबर एक भव्य रांगोळी मंदिराच्या प्रांगणात घालण्यात आली होती. ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. तुलसी विवाह म्हणजे तुळशीच्या रोपाचे विष्णू किंवा त्यांचा अवतार श्रीकृष्णाशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजोत्सव प्रथा आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात, तेव्हा तुळशीशी लग्न लावतात. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला “प्रबोध” उत्सव असे म्हणतात.भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत, तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते.

तुलसी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फल मिळते. शिवाय तुलसी विवाह केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. तसेच धनलाभही होतो, असेही मानले जाते.

दिवाळी संपली की, सर्वांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे… शुभंकर पावलांनी येणारी दिवाळी सुखाचा रेशीम धागा जगण्याला जोडून देते. प्रत्येकाची जगण्यासाठी रोजची धावपळ सुरूच असते. मग त्यात चिंता, व्यथा या तर नेहमीच्याच असतात. दिनक्रमामधील धावपळ, दगदग, ताणतणाव यांनी व्यापलेल्या आयुष्यात हे सण मनाला उभारी देतात. त्यात दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव मनातील अंधार दूर करून प्रकाशाकडे वाटचाल करा, असा संदेश देणारा आणि मग ती संपली की लगबग सुरू होते ती तुळशीच्या लग्नाची… कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुलसी विवाह प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा विधी चालतो. या वर्षी मंगळवारपर्यंत तुळशी विवाह साजरा केला जाईल. तुलसी विवाह महाराष्ट्राच्या बरोबरीने शेजारील गोव्यातदेखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

Continue reading

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...

भारत-पाक-अफगाणिस्तानच्या डोक्यावर हजार किमीचा असामान्य पाऊसपट्टा!

भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली हवामानप्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचा एक सलग पाऊसपट्टा या तीन देशांवर पसरला असून हवामानतज्ज्ञांनी याला अत्यंत असामान्य घटना म्हणून संबोधले आहे. साधारणपणे अशा हवामानप्रणाली वक्राकार...

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...
Skip to content