Homeचिट चॅटअमिताभसोबत काम करताना...

अमिताभसोबत काम करताना कधी भीती वाटली नाही!

मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले असल्यामुळे अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करताना भीती वाटली नाही, असे उद्गार सीआयडीफेम प्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या “वार्तालाप” कार्यक्रमात नुकतेच काढले.

भायखळा येथील चाळीतील बालनाटकांतून सुरू झालेला प्रवास, गुन्हेगारी जगतावर आधारित एकशून्यशून्य मराठी मालिका ते आज अनेक चित्रपट, टीव्ही मालिका या सर्व आठवणींना उजाळा देत आज वयाच्या ७४ वर्षांच्या प्रवासातील घटनाक्रम त्यांनी यावेळी उलगडला. लवचिक काठीच्या तलवारीला नारळाच्या करवंटीची मूठ तयार करून शूर शिवाजी पात्राचा अभिनय ते  सीआयडीपर्यंत बंदुकीची गोळी व त्याचा शोध या सर्व पार्श्वभूमीवर बदललेले तंत्रज्ञान त्यांनी सांगितले.

अभिनेता ते नेता अशी संधी आली तर? या थेट प्रश्नाला उत्तर देताना साटम म्हणाले की, नाही.. आता आहे ते ठिक आहे. नको ते राजकारण. “नेता” मी अभिनय करत चित्रपटात साकारला आहे.. तेवढे पुरे.

मुंबई दूरदर्शनवर प्रथम मला कॅमेरा पाहता आला. एकशून्यशून्य या गुन्हे मालिकेने जो अनुभव दिला तो सीआयडीसाठी मोलाचा ठरला. अभिनयाची कारकीर्द आनंदाने पार पाडली व आनंदाने पार पाडणार. मागे न पाहता पुढे पाहत हसतखेळत सर्वांनी राहिले पाहिजे तरच जीवनाचा आनंद घेता येतो. दिग्दर्शक हा चित्रकार असतो. कलाकार त्यातील एक रंग असतो. त्याला आनंद झाला की मला आनंद होतो, असे अनेक किस्से त्यांनी सांगितले.

यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे म्हणाले की, शिवाजी साटम यांचे पाय जमिनीवर आहेत. त्यांच्या अभिनयाचे कौतुक जगभर होत असते. एकदा ट्रॅफिक पोलिसांनी माझी कार अडवली. यावेळी माझ्या मोटारीत पोलिसांनी शिवाजी साटम यांना पाहिले आणि त्यांना सलाम ठोकला.

कार्यवाह संदीप चव्हाण यांनी शिवाजी साटम यांच्या सीआयडी मालिकेतील भूमिकेबद्दल भरभरून कौतुक केले. त्यांच्या या मालिकेमुळे कोणी गुन्हेगारीकडे वळले असे झाले नाही, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

Continue reading

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ सर्वोत्कृष्ट!

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या 'दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५'चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेत राज्यभरातील १२१ एकांकिकांमधून निवडलेल्या अंतिम फेरीतल्या १६ सर्वोत्कृष्ट कलाकृतींनी दमदार सादरीकरण केले. या वर्षी चुरशीच्या लढतीत...
Skip to content