Homeएनसर्कलशिवसेनेच्या ठाकरे गटाची...

शिवसेनेच्या ठाकरे गटाची झाली उठबस सेना!

सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आलेल्या महाविकास आघाडीत शिवसेनेच्या उबाठा गटाची अवस्था उठबस सेना झाली आहे. सिल्व्हर ओक म्हणाला की उठ आणि काँग्रेस म्हणाला की बस, अशी केविलवाणी अवस्था उद्धव ठाकरेंची झाल्याची टीका शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

बुलढाण्यातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधी पक्षांत स्वत:वर प्रेम करणारे स्वार्थी नेते आहेत. त्यांना त्यांचीच पडलेली आहे. ‘मला पाहा आणि फुले वाहा’, यात विरोधक मग्न आहेत. विदर्भात एक म्हण आहे, ‘मले कोन माने मीच माने’, अशी अवस्था विरोधकांची झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी नकली शिवसेना आणि असली शिवसेनेतील फरक स्पष्ट केला आहे. शेवटी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण कोणाकडे आहे तीच खरी शिवसेना आहे.

उठबस सेना

लोकशाहीमध्ये ज्याच्यांकडे बहुमत असते तो पक्ष मोठा असतो. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली, पक्षाच्या ध्येयधोरणांवर पाणी सोडले आणि स्वतःच्या स्वार्थ आणि खुर्चीसाठी तडजोड केली अशांना जनता माफ करणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारने बंद पाडलेल्या विकासकामांना महायुती सरकारने चालना दिली. मराठवाडा, विदर्भ या दुष्काळग्रस्त भागातले पाणी त्यांनी बंद केले होते. मोठमोठे प्रकल्प बंद केले होते. राज्यात सत्तांतर होताच सर्व कामांवरील स्थगिती उठवली. त्यामुळे आज समृद्धी महामार्गाने इथल्या शेतकऱ्यांना एका दिवसात शेतमाल घेऊन मुंबईत पोहोचता येते, असे शिंदे यांनी सांगितले.  

काँग्रेस पक्षानेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसला जळक्या घराची उपमा देऊन जनतेला या पक्षापासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता. बाबासाहेबांनी तयार केलेली राज्यघटना कोणी बदलणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content