Homeपब्लिक फिगरमागचे सरकारच मराठा...

मागचे सरकारच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी! 

मराठा आरक्षणाचे खरे मारकरी कोण आहेत, यावर चर्चा व्हायला हवी ही, अशी अपेक्षा व्यक्त करून आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे सरकारवर मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवण्यात अपयश आल्याचा आरोप केला. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला आमचा विरोध आहे, हे स्पष्ट करून मराठा हा शब्द मिटवून टाकायचा हा प्रयत्न आहे का, असा सवालही त्यांनी केला.   

मुखपत्रातून मराठा मोर्चांचा उल्लेख मुका मोर्चा असा करणाऱ्या लोकांचे सरकार मराठा आरक्षण देतील का, असा सवालही राणे यांनी केला. माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना व्हिलन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगून राणे म्हणाले की, मनोज जरांगे यांचा आज उदोउदो करणारे जरांगे अडचणीत होते, तेव्हा कुठे होते. त्यांना वकील आम्ही दिला होता, हे सांगून राणे म्हणाले की, देवेन्द्रजींनी आरक्षण टिकून दाखवले. त्याप्रकारे प्रामाणिक प्रयत्न या लोकांनी केले असते तर हिंसक प्रकारही झाले नसते आणि मराठा युवकांना जीवही गमवावे लागले नसते.

मराठा

एक व्यक्ती आरक्षणासाठी उपोषणाला बसतो, तो स्वतः बोलतोय की त्याच्या हातात कोणी स्क्रीप्ट दिलीय, हा प्रश्न उपस्थित करून राणे म्हणाले की, एकाच व्यक्तीवर टीका केली जातेय. एका बाजूला नेत्यांना गावबंदी आणि दुसरीकडे संघर्षयात्रा, हे कसे होते, हा सवाल करून राणे म्हणाले की, ही मँचफिक्सिंग आहे का… याचे उत्तर मिळाले पाहिजे.

भुजबळसाहेब, एक व्यक्ती म्हणजे मराठा समाज नाही. बहुजन समाज म्हणून सर्व जातींचे लोक सलोख्याने राहतो. त्यामुळे उगाच वातावरण बिघडता कामा नये आणि आपण एकत्र व्यासपीठ तयार करू. इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण हवे, हे सांगू. ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले जावे, हेच आमचे मत आहे, असेही ते म्हणाले.  

पडघा गावात गावाचे नाव अल शान केले आणि इस्लामीकरण सुरू झाले, असे सांगून राणे म्हणाले की, आपण जातीजातींमध्ये भांडतोय आणि तिकडे अतिरेकी दहशतवादी कारवाया करताहेत, याकडे लक्ष द्यायला हवे, अशी मागणीही राणे यांनी केली.

Continue reading

बहुभाषिक ॲक्शन चित्रपट ‘राजा शिवाजी’ महाराष्ट्रदिनी होणार प्रदर्शित!

जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीने आज एक अत्यंत महत्वाकांक्षी घोषणा केली आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत, भव्य ऐतिहासिक ॲक्शन ड्रामा 'राजा शिवाजी' हा चित्रपट येत्या महाराष्ट्रदिनी, १ मे २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठी,...

पटकथेसाठीचे वनलाईनर गुंफून लिहिलेले ‘फिल्मी कथा’चे प्रकाशन

सुमारे ३० ते ३५ वनलाईनर एकत्र गुंफून अभिनेते आणि सिद्धहस्त लेखक प्रकाश राणे यांनी लिहिलेला "फिल्मी कथा" हा कथासंग्रह डिंपल प्रकाशनच्या वतीने अंधेरी येथे प्रकाशित करण्यात आला. या पुस्तकाचे प्रकाशन सुसंवादिनी मंगला खाडिलकर, निर्माती दिग्दर्शिका कांचन अधिकारी, अभिनेत्री गायिका रसिका धामणकर (अबोली मालिकेमधील...

‘कप बशी’त दिसणार पूजा सावंत आणि ऋषी मनोहर!

नवनवे प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत होत असतात. आता आगामी "कप बशी" या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उलगडणार असून सध्या मुंबईत या चित्रपटाचे चित्रिकरण...
Skip to content