Homeपब्लिक फिगरमागचे सरकारच मराठा...

मागचे सरकारच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी! 

मराठा आरक्षणाचे खरे मारकरी कोण आहेत, यावर चर्चा व्हायला हवी ही, अशी अपेक्षा व्यक्त करून आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे सरकारवर मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवण्यात अपयश आल्याचा आरोप केला. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला आमचा विरोध आहे, हे स्पष्ट करून मराठा हा शब्द मिटवून टाकायचा हा प्रयत्न आहे का, असा सवालही त्यांनी केला.   

मुखपत्रातून मराठा मोर्चांचा उल्लेख मुका मोर्चा असा करणाऱ्या लोकांचे सरकार मराठा आरक्षण देतील का, असा सवालही राणे यांनी केला. माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना व्हिलन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगून राणे म्हणाले की, मनोज जरांगे यांचा आज उदोउदो करणारे जरांगे अडचणीत होते, तेव्हा कुठे होते. त्यांना वकील आम्ही दिला होता, हे सांगून राणे म्हणाले की, देवेन्द्रजींनी आरक्षण टिकून दाखवले. त्याप्रकारे प्रामाणिक प्रयत्न या लोकांनी केले असते तर हिंसक प्रकारही झाले नसते आणि मराठा युवकांना जीवही गमवावे लागले नसते.

मराठा

एक व्यक्ती आरक्षणासाठी उपोषणाला बसतो, तो स्वतः बोलतोय की त्याच्या हातात कोणी स्क्रीप्ट दिलीय, हा प्रश्न उपस्थित करून राणे म्हणाले की, एकाच व्यक्तीवर टीका केली जातेय. एका बाजूला नेत्यांना गावबंदी आणि दुसरीकडे संघर्षयात्रा, हे कसे होते, हा सवाल करून राणे म्हणाले की, ही मँचफिक्सिंग आहे का… याचे उत्तर मिळाले पाहिजे.

भुजबळसाहेब, एक व्यक्ती म्हणजे मराठा समाज नाही. बहुजन समाज म्हणून सर्व जातींचे लोक सलोख्याने राहतो. त्यामुळे उगाच वातावरण बिघडता कामा नये आणि आपण एकत्र व्यासपीठ तयार करू. इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण हवे, हे सांगू. ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले जावे, हेच आमचे मत आहे, असेही ते म्हणाले.  

पडघा गावात गावाचे नाव अल शान केले आणि इस्लामीकरण सुरू झाले, असे सांगून राणे म्हणाले की, आपण जातीजातींमध्ये भांडतोय आणि तिकडे अतिरेकी दहशतवादी कारवाया करताहेत, याकडे लक्ष द्यायला हवे, अशी मागणीही राणे यांनी केली.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content