Homeचिट चॅटचुनाभट्टीत २३ फेब्रुवारीपासून...

चुनाभट्टीत २३ फेब्रुवारीपासून रंगणार हिंदुहृदयसम्राट चषक कबड्डी स्पर्धा

मुंबईतल्या चुनाभट्टीत येत्या २३ ते २६ फेब्रुवारीदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्रमांक ६ शाखा क्रमांक १७०, १७१ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि दत्तात्रय संघ, चुनाभट्टी यांच्यावतीने हिंदुहृदयसम्राट चषकासाठी प्रथम श्रेणी पुरुष गट आणि महिला गटाच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे‌ आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेतील सामने साई मंदिर पटांगण, व्ही. एन. पुरव मार्ग, चुनाभट्टी येथे होतील. रवी म्हात्रे व मनिष मोरजकर (विधानसभा प्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मलकित सिंग संधु, शाखा प्रमुख, शाखा क्रमांक १७० आणि प्रकाश साळुंके शाखाप्रमुख, शाखा क्रमांक १७१ यांनी या स्पर्धेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. पुरुष गटात उत्कर्ष, सत्यम, चेंबूर क्रीडा केंद्र, टागोर नगर मित्र मंडळ, स्वस्तिक, शूर संभाजी, अंबिका, ओवळी, अमरज्योत, श्री साई तर महिला विभागात स्वराज्य, महात्मा फुले, सत्यम, स्नेहविकास, नवशक्ती, महात्मा गांधी हे मुंबई उपनगरातील बलाढ्य संघ भाग घेत आहेत.

मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धेत पुरुष विजेत्या संघाला दहा हजार रुपये रोख आणि उपविजेत्या संघाला सात हजार रुपये रोख तसेच आर्कषक हिंदुहृदयसम्राट चषक मिळेल. महिला विजेत्या संघाला आठ हजार रुपये रोख आणि उपविजेत्या संघाला‌ पाच हजार रुपये रोख व आर्कषक हिंदुहृदयसम्राट चषक भेट मिळेल. याशिवाय स्पर्धेतील सर्वोत्तम पकडपटू, चढाईपटू आणि अष्टपैलू खेळाडूंनादेखील खास पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील सामने मॅटवर होतील.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content