Homeचिट चॅटचुनाभट्टीत २३ फेब्रुवारीपासून...

चुनाभट्टीत २३ फेब्रुवारीपासून रंगणार हिंदुहृदयसम्राट चषक कबड्डी स्पर्धा

मुंबईतल्या चुनाभट्टीत येत्या २३ ते २६ फेब्रुवारीदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्रमांक ६ शाखा क्रमांक १७०, १७१ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि दत्तात्रय संघ, चुनाभट्टी यांच्यावतीने हिंदुहृदयसम्राट चषकासाठी प्रथम श्रेणी पुरुष गट आणि महिला गटाच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे‌ आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेतील सामने साई मंदिर पटांगण, व्ही. एन. पुरव मार्ग, चुनाभट्टी येथे होतील. रवी म्हात्रे व मनिष मोरजकर (विधानसभा प्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मलकित सिंग संधु, शाखा प्रमुख, शाखा क्रमांक १७० आणि प्रकाश साळुंके शाखाप्रमुख, शाखा क्रमांक १७१ यांनी या स्पर्धेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. पुरुष गटात उत्कर्ष, सत्यम, चेंबूर क्रीडा केंद्र, टागोर नगर मित्र मंडळ, स्वस्तिक, शूर संभाजी, अंबिका, ओवळी, अमरज्योत, श्री साई तर महिला विभागात स्वराज्य, महात्मा फुले, सत्यम, स्नेहविकास, नवशक्ती, महात्मा गांधी हे मुंबई उपनगरातील बलाढ्य संघ भाग घेत आहेत.

मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धेत पुरुष विजेत्या संघाला दहा हजार रुपये रोख आणि उपविजेत्या संघाला सात हजार रुपये रोख तसेच आर्कषक हिंदुहृदयसम्राट चषक मिळेल. महिला विजेत्या संघाला आठ हजार रुपये रोख आणि उपविजेत्या संघाला‌ पाच हजार रुपये रोख व आर्कषक हिंदुहृदयसम्राट चषक भेट मिळेल. याशिवाय स्पर्धेतील सर्वोत्तम पकडपटू, चढाईपटू आणि अष्टपैलू खेळाडूंनादेखील खास पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील सामने मॅटवर होतील.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content