Homeडेली पल्सराज्याचा अर्थसंकल्प म्हणजे...

राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे व्हा रे सारे खूष…

अजित पवार यांनी मुंबईत सध्या चालू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात अर्थसंकल्प मांडला, त्यावर विधानसभेत चर्चाही झाली. अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडला त्या दिवशीच म्हणजे शुक्रवारी संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरकडे निघाली. त्याचा संदर्भ देत अजित पवार यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे उल्लेख त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात केले होते. तोच धागा पकडून आमदार अतुल बेनके यांनी अजित पवार यांच्या अर्थसंकल्पाचे समर्थन केले. त्यांनीही संत तुकारामांच्या अभंगांचा वापर करत हा अर्थसंकल्प कसा उत्तम आहे हे सांगितले.

अजित पवारांचे पुण्यातील समर्थक चेतन तुपे यांनी अर्थसंकल्पाचे समर्थन करताना सांगितले की, काही

अर्थसंकल्प

आमदारांनी अर्थसंकल्पावर बोलताना शेरोशायरी केली, काहींनी संत तुकाराम महाराजांचे अभंग सांगितले पण मी संस्कृतमधील श्लोक सर्वांना ऐकवणार आहे. सर्वे सन्तु निरामयः, याचा उल्लेख करत तुपे यांनी त्याचा अर्थही सांगितला.

हे सगळं सभागृहात ऐकताना अजित पवार यांना सुखद धक्के बसत होते. त्यामुळेच त्यांनी बेनके यांना बसल्या जागेवरूनच हात जोडून त्यांचे खुणेनेच आभार मानले. तोवर चेतन तुपे यांनी संस्कृत सुरू केले. त्यावेळी अजित पवारांनी चेहरा असा केला की जणू अर्थसंकल्प मांडून काय करून बसलो आपण… कारण हे लोक शेरोशायरी करताहेत, अभंग उद्धृत करून त्यातले वर्णन अर्थसंकल्पाला लागू होते सांगताहेत तर तुपे यांनी सर्वे सन्तु निरामयः असेही सांगत आहेत. पण ते पाहून अजित पवार मात्र कृतकृत्य झाले.

Continue reading

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....

वाटाणा वाटाणा पे लिखा है `खाने’वाले का…

वाटाण्यावाटाण्यात काय फरक असणार, असे कोणी विचारले तर हा प्रश्न निरर्थक मानू नका. हिरव्या आणि पांढऱ्या वाटाण्यात फरक असतो आणि या फरकातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही सरकारवर होऊ शकतो, हे मंगळवारी राज्याच्या विधानसभेत दिसून आले. आमदार कैलास घाडगे-पाटील...

मुनगंटीवार वन्स अगेन!

सरकारी काम म्हणजे सहा महिने थांब... असं कायम म्हटलं जातं आणि नेमका त्याचाच अनुभव राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आल्याचे गुरुवारी राज्याच्या विधानसभेत स्पष्ट झाले. सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आपल्या वृद्ध पालकांची तसेच कुटुंबातील दिव्यांग व्यक्तींची जबाबदारी घ्यावी, याची...
Skip to content