Homeडेली पल्सनंदुरबारचे ठाकरे गटाचे...

नंदुरबारचे ठाकरे गटाचे आमदार आमश्या पाडवी शिवसेनेत

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नंदुरबारमधील विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या नंदनवन, या निवासस्थानी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी पाडवी यांच्यासह आदिवासी पारधी क्रांती सेनेचे अध्यक्ष मुकेश साळुंखे आणि 10 महिला सरपंच, 48 पुरुष सरपंच, 2 जिल्हा परिषद सभापती, 2 उपजिल्हाप्रमुख, 4 पंचायत समिती सदस्य आणि एका युवासेना जिल्हाधिकारी आणि असंख्य पदाधिकारी-कार्यकर्त्यांनाही शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

आमश्या पाडवी यांनी आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी समाजासाठी कायम संघर्ष केला. या समाजाला न्याय देण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. आज त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे या भागातील नागरिकांना दिलासा देणे शक्य होणार आहे. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दोनदा विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे त्यांनी विधान परिषदेचा मार्ग निवडला. त्यांच्या येण्याने या मागास आणि आदिवासीबहुल भागातील लोकांना न्याय देता येणे शक्य होईल, असे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.

हा भाग शेतीसंपन्न भाग आहे. कालच राज्यशासनाने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 4 हजार कोटी रुपयांची तरतूद केली. आजवर कुणीही केल्या नाहीत एवढया उपाययोजना शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी केल्या. शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देणारे आपले पहिले राज्य आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेद्वारे त्यांच्या खात्यात केंद्र सरकार प्रमाणे राज्यशासनाकडून अजून 6 हजार देण्याचा निर्णय घेतला. राज्यातील शेतकऱ्यांना वेळोवेळी झालेले नुकसान, अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस यातून दिलासा देण्यासाठी तसेच वेगवेगळ्या योजनांद्वारे 45 हजार कोटींची तरतूद केली. माता-भगिनींना न्याय देण्यासाठी बचतगटांना बळ दिले. त्यांच्या भागभांडवलात 50 हजारांनी वाढ केली. महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत दिली तसेच मुलींसाठी लेक लाडकी योजना सुरू केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, एमएसआरडीसी मंत्री दादाजी भुसे, खासदार भावना गवळी, आमदार संजय शिरसाट, शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी उपस्थित होते.

Continue reading

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...

साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-साईनगर शिर्डी रेल्वे उद्यापासून!!

पुणे-साईनगर शिर्डी दैनंदिन रेल्वेसेवा उद्यापासून सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उद्या दुपारी साडेतीन वाजता पुणे रेल्वेस्थानकावरून पुणे-साईनगर शिर्डी डेली एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करतील. पुणे आणि साईनगर, शिर्डीदरम्यानची ही पहिलीच थेट रेल्वेसेवा असेल, ज्यामुळे...
Skip to content