Homeचिट चॅटसूर्यवंशी क्षत्रिय समाज...

सूर्यवंशी क्षत्रिय समाज क्रिकेट स्पर्धा 18 नोव्हेंबरपासून

मुंबईच्या सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाच्यावतीने सीझन क्रिकेटची एस के सी एल टी-२० स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या लीगमध्ये सहा संघ भाग घेत आहेत. 18 नोव्हेंबरला या स्पर्धेची सुरुवात होणार असून अंतिम सामना 28 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. 196 खेळाडूंनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. दोन नोव्हेंबर रोजी दादरच्या सूर्यवंशी क्षत्रिय सभागृहात, एका दिमागदार सोहळ्यात लिलाव पद्धतीने सहा संघमालकांनी नव्वद खेळाडूंची निवड केली. सूर्यवंशी वॉरियर, सिंबा सिक्सर, इन्स्पायर रॉयल, स्वराज इलेव्हन, आरडी ब्लास्टर आणि प्राइड ऑफ पालघर या संघांनी प्रत्येकी 15 खेळाडूंचा संघ तयार केला.

दीपक पाटील हे या स्पर्धेचे संचालक आहेत. सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाचे अध्यक्ष प्रवीण महाले आणि चिटणीस जयंत पाटील यांचा यात मोलाचा वाटा आहे. या स्पर्धा पोलीस जिमखाना, मरीन लाइन्स येथे खेळवल्या जातील. अंतिम सामना रात्री प्रकाशझोतात खेळवला जाईल. विजेत्या संघास करंडक व एक लाख रुपयाचे बक्षीस तसेच उपविजेत्याला करंडक आणि पन्नास हजारांचे पारितोषिक असेल. इतर अनेक बक्षिसेही यावेळी दिली जाणार आहेत. याचे नियोजन जीआर स्पोर्ट्स यांनी केले आहे. सूर्यवंशी क्षत्रिय समाजातर्फे या क्रिकेट उत्सवाची सांगता 28 नोव्हेंबरला रात्री जल्लोषात केली जाईल, असे संघाचे चिटणीस जयंत पाटील यांनी कळवले आहे.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content