Homeचिट चॅटसूर्यवंशी क्षत्रिय समाज...

सूर्यवंशी क्षत्रिय समाज क्रिकेट स्पर्धा 18 नोव्हेंबरपासून

मुंबईच्या सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाच्यावतीने सीझन क्रिकेटची एस के सी एल टी-२० स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या लीगमध्ये सहा संघ भाग घेत आहेत. 18 नोव्हेंबरला या स्पर्धेची सुरुवात होणार असून अंतिम सामना 28 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. 196 खेळाडूंनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. दोन नोव्हेंबर रोजी दादरच्या सूर्यवंशी क्षत्रिय सभागृहात, एका दिमागदार सोहळ्यात लिलाव पद्धतीने सहा संघमालकांनी नव्वद खेळाडूंची निवड केली. सूर्यवंशी वॉरियर, सिंबा सिक्सर, इन्स्पायर रॉयल, स्वराज इलेव्हन, आरडी ब्लास्टर आणि प्राइड ऑफ पालघर या संघांनी प्रत्येकी 15 खेळाडूंचा संघ तयार केला.

दीपक पाटील हे या स्पर्धेचे संचालक आहेत. सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाचे अध्यक्ष प्रवीण महाले आणि चिटणीस जयंत पाटील यांचा यात मोलाचा वाटा आहे. या स्पर्धा पोलीस जिमखाना, मरीन लाइन्स येथे खेळवल्या जातील. अंतिम सामना रात्री प्रकाशझोतात खेळवला जाईल. विजेत्या संघास करंडक व एक लाख रुपयाचे बक्षीस तसेच उपविजेत्याला करंडक आणि पन्नास हजारांचे पारितोषिक असेल. इतर अनेक बक्षिसेही यावेळी दिली जाणार आहेत. याचे नियोजन जीआर स्पोर्ट्स यांनी केले आहे. सूर्यवंशी क्षत्रिय समाजातर्फे या क्रिकेट उत्सवाची सांगता 28 नोव्हेंबरला रात्री जल्लोषात केली जाईल, असे संघाचे चिटणीस जयंत पाटील यांनी कळवले आहे.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content