Homeब्लॅक अँड व्हाईटमुंबईत 'कम्प्लायन्स अँड...

मुंबईत ‘कम्प्लायन्स अँड गव्हर्नन्स..’चे यशस्वी आयोजन

टीमलीज रेगटेकने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्स आणि द फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या संयुक्त विद्यमाने ‘कम्प्लायन्स अँड गव्हर्नन्स सिम्पोझियम’ नावाची एक परिषद मुंबईत नुकतीच आयोजित करण्यात आली.

या परिषदेमध्ये सेबी नियमन आणि प्रशासन प्रक्रियांमध्ये तंत्रज्ञानाच्या बदलत्या भूमिकांवर बोलण्यासाठी उद्योगक्षेत्रातील धुरंधरांची उपस्थिती लाभल्याचे दिसले. चर्चेसाठीच्या पॅनलमध्ये मॅरिकोचे कंपनी सेक्रेटरी व कम्प्लायन्स ऑफिसर विनय एमए; ईपीएल लि.च्या लीगल विभागाचे प्रमुख, कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स ऑफिसर ओंकार आणि टीमलीज रेगटेकचे सहसंस्थापक आणि सीईओ ऋषी अग्रवाल यांच्यासारख्या विख्यात व्यावसायिकांचा समावेश होता. त्यांनी व्यवसाय करण्यात सुलभता येण्याच्या कामी तंत्रज्ञानातील प्रगतीच्या अविभाज्य भूमिकेवर प्रकाशझोत टाकला.

देशाच्या विविध उद्योगक्षेत्रांमध्ये नियमनांचे सुलभीकरण करण्याच्या आणि प्रशासनाचा दर्जा सुधारण्याच्या कामी रेगटेक क्षेत्राच्या लक्षणीय प्रभावाबाबत या बैठकीमध्ये सखोल चर्चा करण्यात आली. नियामक परिसंस्थेची दुसरी बाजू मांडत व्यावसायिक समुदायाच्या प्रतिनिधींनी नियमनांमधील जटिलतेविषयी कॉर्पोरेट क्षेत्राचा दृष्टिकोन व कायदेशीर नियमनांच्या पालनामधील तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका यावर चर्चा केली.

बीएसईचे एमडी आणि सीईओ सुंदररामन राममूर्ती यांनी चर्चेचा विषय प्रस्थापित केला. ते म्‍हणाले की, तंत्रज्ञानामुळे नियमनातील सुलभतेची हमी मिळते हे खरे आहे. मात्र त्याचबरोबर सध्याच्या सायबर धमक्यांच्या काळात सावध राहण्याची जबाबदारीही येते.

नियामकांकडून आपली कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि नियमनांचा भार हलका करण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ कशाप्रकारे घेतला जात आहे याविषयीच्या चर्चासत्राला सेबीच्या जनरल मॅनेजर रिचा गोएल अगरवाल, एनएसईचे व्हाईस प्रेसिडंट अविनाश नाईक; आयटी–सिडीएसएलचे सीनिअर व्हाइस प्रेसिडंट विश्वास नागले, एनएसडीएलच्या टेक्नोलॉजी विभागाचे व्हाइस प्रेसिडंट विशाल गुप्ता आणि एनएसईच्या इन्स्पेक्शन विभागाच्या व्हाइस प्रेसिडंट रेणू भंडारी या पाहुण्यांचा सहभाग लाभला.

टीमलीज रेगटेकचे सहसंस्थापक आणि सीईओ ऋषी अग्रवाल यांनी या चर्चासत्रादरम्यान आपला दृष्टिकोन मांडला. ते म्हणाले की, अनुपालनाच्या जगामध्ये नियामत तंत्रज्ञानामध्ये परिवर्तन घडून येत आहे. यामुळे संस्थांना माहितीमधील असमतोल कमी करता येत आहे आणि तिच्यावरील नियंत्रण वाढविता येत आहे. फिक्की रेगटेक मंच सूचीबद्ध कंपन्यांसाठी अनुपालनातील सुलभता आणेल.

टीमलीज रेगटेकचे सह-संस्थापक आणि डिरेक्टर संदीप अग्रवाल यांनी सेबीला अनुपालनाच्या स्वयंचलित यंत्रणा पुरविणाऱ्या रेगटेक मंचांचे प्रात्यक्षिक सादर केले आणि तंत्रज्ञानामुळे कशाप्रकारे दृश्यमानता वाढू शकेल व अनुपालनाच्या कामांवरील नियंत्रण वाढू शकेल हे दाखवून दिले.

Continue reading

महाराष्ट्रात कोरडे हवामान सुरू!

आयएमडी बुलेटिननुसार, ओदिशा आणि छत्तीसगडच्या काही भागांमधून आणि ईशान्येकडील राज्यांच्या उर्वरित भागातूनही मान्सून माघारला आहे. आतापर्यंत देशाच्या एकूण परतीच्या क्षेत्रापैकी 85 टक्के भागातून मान्सून परतलेला आहे. पुढील 2 दिवसांत देशाच्या उर्वरित भागातून मान्सून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. महाराष्ट्रातून मान्सून...

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...
Skip to content