Homeडेली पल्सराज्य सरकारी अधिकाऱ्यांचे...

राज्य सरकारी अधिकाऱ्यांचे नेते ग. दि. कुलथे यांचे निधन

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांचे काल, सोमवारी रात्री नऊ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नवी मुंबईच्या नेरूळ येथील राहत्या घरी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या संघटनेचे मार्गदर्शक म्हणून ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले. मात्र, राज्य सरकारी कर्माचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न त्यांच्या हयातीत फलद्रूप होऊ शकले नाहीत.

गेल्या ५० वर्षाँच्या संघटनात्मक वाटचालीत त्यांनी विक्रीकर कर्मचारी-अधिकारी संघटना, राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनांचे  नेतृत्व करताना विविध पदांची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आहे. राज्य शासनाच्या सेवेतील तब्बल ७२ खात्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनांची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार म्हणून ते तहहयात कार्यरत होते. १९७० च्या दशकात त्यांनी विक्रीकर कर्मचारी संघटनेतून सुरू केलेली प्रवासगाथा पुढे विविध मध्यवर्ती कर्मचारी संघटनांमध्ये नेतृत्त्व करत अखेर “महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ” या शिखर संघटनेच्या स्थापनेपर्यंत पोहोचली. कोणत्याही प्रश्नात दोन्ही बाजू समजून घेऊन तोडगा काढणे, हे त्यांचे वैशिष्ट्यं होते. त्यांनी २०पेक्षा अधिक कर्मचारी संघटनांना एकत्र आणले. राज्यस्तरीय चर्चासत्र, प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करून अनेक नेतृत्त्वांना संधी दिली. प्रशासन आणि कर्मचाऱ्यांतला संवाद सतत चालू राहवा यासाठी सांघिक बैठका व तंत्रशुद्ध सादरीकरणाचा आग्रह त्यांनी धरला.

कुलथे यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी बुनियाद को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, दुसरा मजला, सेक्टर १५ , नेरूळ (पूर्व), नवी मुंबई येथे सकाळी ९ ते १२.३० दरम्यान ठेवण्यात येणार आहे. पार्थिवावर दुपारी १.०० वाजता नेरूळ स्मशानभूमी, सेक्टर-४, नेरुळ (पश्चिम), नवी मुंबई येथे अंत्यसंस्कार होतील. ग. दि. कुलथे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे.

Continue reading

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...

‘ब्रँड एकनाथ’ला मान्यता! मोदींनी दिले तब्बल 2 तास!!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, 7-लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या या...
Skip to content