Homeब्लॅक अँड व्हाईटशिक्षक-पदवीधर मतदानासाठी विशेष...

शिक्षक-पदवीधर मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा

महाराष्ट्रात येत्या २६ जूनला होणाऱ्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी विशेष नैमित्तिक रजा (स्पेशल कॅज्युअल लिव्ह) घेता येणार आहे. या कर्मचाऱ्यांना नियमित मिळणाऱ्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त ही नैमित्तिक रजा असेल.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१च्या कलम १३५-बनुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा देण्याची तरतूद आहे. विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाकरिता मर्यादित स्वरुपात मतदार असल्याने, त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या २३ जून २०११ रोजीच्या शासन निर्णयान्वये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये मतदार असलेल्या व्यक्तीला विशेष नैमित्त‍िक रजा जाहीर करण्यात आली आहे. ही रजा त्यांच्या अनुज्ञेय असलेल्या नैमित्त‍िक रजेव्यतिरिक्त असणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या २४ मे २०२४ रोजी जारी झालेल्या प्रसिद्धीपत्रकान्वये विधान परिषदेच्या कोकण व मुंबई पदवीधर तसेच नाशिक व मुंबई या शिक्षक मतदारसंघांच्या व्दैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी येत्या बुधवारी २६ जूनला सकाळी ७.०० ते सायं ६.०० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सोमवारी, १ जुलै २०२४ रोजी याची मतमोजणी होणार आहे.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content