Homeचिट चॅटश्री मावळी राज्यस्तरीय...

श्री मावळी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २५ एप्रिलपासून

ठाणे येथील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त तसेच शिवजयंती उत्सवानिमित्त राज्य पातळीवरील पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धा शुक्रवार, २५-०४-२०२५ ते मंगळवार, २९-०४-२०२५ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत.

या स्पर्धेत एकूण रू. ५,००,०००/- ची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. पुरुष गटात विजेत्या संघाला ₹ १,००,०००/-, उपविजेत्या संघाला ₹ ७५,०००/- व उपांत्य फेरीतील पराभूत संघाला ₹ २५,०००/- रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. महिला गटात विजेत्या संघाला ₹ ५५,०००/-, उपविजेत्या संघाला ₹ ४४,०००/- व उपांत्य फेरीतील पराभूत संघाला ₹ २२,०००/- रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरुष व महिला गटात उत्कृष्ट खेळाडूस ₹ १०,०००/-, उत्कृष्ट चढाईपट्टू खेळाडूस ₹ ५,०००/- व उत्कृष्ट पक्कड करणाऱ्या खेळाडूस ₹ ५,०००/- रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक दिवसाच्या उत्कृष्ट खेळाडूस ₹ २,०००/- रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेचे प्रवेशअर्ज श्री मावळी मंडळ कार्यालय (ठाणे) व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या maharashtrakabaddi.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्पर्धेचे अर्ज श्री मावळी मंडळ कार्यालय, ठाणे येथे शुक्रवार, १८/०४/२०२५पर्यंत स्वीकारले जातील.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content