Homeएनसर्कलवृक्षछाटणीवर झाले वैज्ञानिक...

वृक्षछाटणीवर झाले वैज्ञानिक प्रशिक्षण

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कुशल कामगार, ठेकेदारांचे उद्यानतज्ज्ञ आणि पालिका अधिकाऱ्यांना वैज्ञानिक पद्धतीने वृक्षसंवर्धन व छाटणीचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले. वृक्षतज्ज्ञ विवेक राणे यांनी टी-वॉर्ड येथील सभागृहात परिमंडळ पाच व परिमंडळ सहाच्या कार्यक्षेत्रासाठी हे प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेत सर्व ठेकेदार, त्यांचे उद्यानतज्ज्ञ, उद्यान सहाय्यक, कनिष्ठ वृक्ष अधिकारी, सहाय्यक उद्यान अधीक्षक तसेच परिमंडळ पाच आणि सहाचे उप उद्यान अधीक्षक उपस्थित होते.

वृक्षछाटणी

कार्यशाळेत वृक्षछाटणीच्या वैज्ञानिक पद्धती, झाडांच्या जोखमीचे मूल्यमापन करून अनावश्यक वृक्षतोड टाळण्याचे उपाय आणि असंघटित छाटणी टाळण्याच्या योग्य पद्धती शिकविण्यात आल्या. राणे यांनी थ्री-कट पद्धत, कॅनोपी कपात पद्धत तसेच इतर वृक्षसंवर्धन तंत्रज्ञानांचे प्रात्यक्षिक दाखवले. प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्षस्थळी झाडांचे मूल्यमापन कसे करावे आणि योग्यप्रकारे फांद्या कशा छाटाव्या याचे मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्ष व्यवस्थापनासाठी जबाबदार असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात आला.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content