Homeएनसर्कलवृक्षछाटणीवर झाले वैज्ञानिक...

वृक्षछाटणीवर झाले वैज्ञानिक प्रशिक्षण

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कुशल कामगार, ठेकेदारांचे उद्यानतज्ज्ञ आणि पालिका अधिकाऱ्यांना वैज्ञानिक पद्धतीने वृक्षसंवर्धन व छाटणीचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले. वृक्षतज्ज्ञ विवेक राणे यांनी टी-वॉर्ड येथील सभागृहात परिमंडळ पाच व परिमंडळ सहाच्या कार्यक्षेत्रासाठी हे प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेत सर्व ठेकेदार, त्यांचे उद्यानतज्ज्ञ, उद्यान सहाय्यक, कनिष्ठ वृक्ष अधिकारी, सहाय्यक उद्यान अधीक्षक तसेच परिमंडळ पाच आणि सहाचे उप उद्यान अधीक्षक उपस्थित होते.

वृक्षछाटणी

कार्यशाळेत वृक्षछाटणीच्या वैज्ञानिक पद्धती, झाडांच्या जोखमीचे मूल्यमापन करून अनावश्यक वृक्षतोड टाळण्याचे उपाय आणि असंघटित छाटणी टाळण्याच्या योग्य पद्धती शिकविण्यात आल्या. राणे यांनी थ्री-कट पद्धत, कॅनोपी कपात पद्धत तसेच इतर वृक्षसंवर्धन तंत्रज्ञानांचे प्रात्यक्षिक दाखवले. प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्षस्थळी झाडांचे मूल्यमापन कसे करावे आणि योग्यप्रकारे फांद्या कशा छाटाव्या याचे मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्ष व्यवस्थापनासाठी जबाबदार असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात आला.

Continue reading

राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज, रविवारी मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल...

मुंबईत रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर!

येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद निश्चित मिळेल. रिपब्लिकन पक्षाला उत्तर मुंबई जिल्ह्यात किमान 7 जागा आणि संपूर्ण मुंबईत किमान 24 जागा महायुतीने सोडाव्यात असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडे देण्यात यावा. त्यातील काही जागा रिपब्लिकन पक्ष...

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...
Skip to content