Homeएनसर्कलवृक्षछाटणीवर झाले वैज्ञानिक...

वृक्षछाटणीवर झाले वैज्ञानिक प्रशिक्षण

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कुशल कामगार, ठेकेदारांचे उद्यानतज्ज्ञ आणि पालिका अधिकाऱ्यांना वैज्ञानिक पद्धतीने वृक्षसंवर्धन व छाटणीचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले. वृक्षतज्ज्ञ विवेक राणे यांनी टी-वॉर्ड येथील सभागृहात परिमंडळ पाच व परिमंडळ सहाच्या कार्यक्षेत्रासाठी हे प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेत सर्व ठेकेदार, त्यांचे उद्यानतज्ज्ञ, उद्यान सहाय्यक, कनिष्ठ वृक्ष अधिकारी, सहाय्यक उद्यान अधीक्षक तसेच परिमंडळ पाच आणि सहाचे उप उद्यान अधीक्षक उपस्थित होते.

वृक्षछाटणी

कार्यशाळेत वृक्षछाटणीच्या वैज्ञानिक पद्धती, झाडांच्या जोखमीचे मूल्यमापन करून अनावश्यक वृक्षतोड टाळण्याचे उपाय आणि असंघटित छाटणी टाळण्याच्या योग्य पद्धती शिकविण्यात आल्या. राणे यांनी थ्री-कट पद्धत, कॅनोपी कपात पद्धत तसेच इतर वृक्षसंवर्धन तंत्रज्ञानांचे प्रात्यक्षिक दाखवले. प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्षस्थळी झाडांचे मूल्यमापन कसे करावे आणि योग्यप्रकारे फांद्या कशा छाटाव्या याचे मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्ष व्यवस्थापनासाठी जबाबदार असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात आला.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content